शहरं
Join us  
Trending Stories
1
...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
2
राहुल गांधी पंतप्रधान मोदींसोबत चर्चेसाठी तयार, भाजपाने दिले प्रत्युत्तर; म्हणाले, ...
3
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
4
वीज आणि पिठाचे भाव गगनाला भिडले, PoK मध्ये संघर्ष; संतप्त जमाव रस्त्यावर, पोलिसाचा मृत्यू
5
Chandrashekhar Bawankule : "उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर..."; चंद्रशेखर बावनकुळे यांचं जाहीर आव्हान
6
तुम्ही औरंगजेबाचे फॅन आहात का?; संजय राऊतांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
7
'धारावी मॉडेल मी यशस्वी केलं, एसीमध्ये बसलेल्यांनी बोलू नये'; राहुल शेवाळेंची ठाकरेंवर टीका
8
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना शुभदायी, लाभाच्या संधी; थकीत येणी मिळतील, सौभाग्याचा काळ!
9
Exclusive: 'बाळासाहेबांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची प्रतिष्ठा मी जपली…', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
10
'या' गोष्टींमुळे सुशांत सिंह राजपूत मृत्यूपूर्वी होता त्रस्त, मनोज वाजपेयी यांचा मोठा खुलासा, म्हणाले....
11
ओला ईलेक्ट्रीक स्कूटरवर वीज कोसळली, रस्त्यावर मोठा खड्डा पडला, एकाचा मृत्यू, दोन गंभीर
12
रेस्टॉरंटमध्ये झाली नजरानजर अन्...; 4 महिने अमिराला डेट करणाऱ्या अब्दु रोजिकची लव्हस्टोरी
13
त्यांची शिवसेना म्हणजे 'एसंशी'; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
14
Exclusive:...म्हणून अजित पवार, एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले; पंतप्रधान मोदींनी सांगितलं नेमकं काय घडलं!
15
Exclusive: राज ठाकरे आमच्यासाठी नवीन नाहीत, केवळ सत्तेसाठी एकत्र आलेलो नाही; पंतप्रधान मोदींची 'मन(से) की बात'
16
राहुल गांधी काय पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत का? मोदींसोबतच्या चर्चेवर स्मृती इराणींचा टोला
17
Exclusive: मेक इन इंडिया योजनेचा देशाला किती फायदा झाला? पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितले
18
आजचे राशीभविष्य - १२ मे २०२४; व्यापारात प्रगती व यश मिळू शकेल; धनलाभ होईल
19
आव्हान स्वीकारले! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जाहीर चर्चेला राहुल गांधी तयार
20
बुलेट्स कसाबच्या नव्हत्या तर कोणाच्या? प्रकाश आंबेडकर यांचा उज्ज्वल निकम यांना खडा सवाल

मनाईहुकूम झुगारून खासदारांची मेळघाटात ‘पेरणी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2019 11:03 PM

खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी दिवसभर मेळघाटातील २० पेक्षा अधिक गावांचा दौरा केला. व्याघ्र प्रकल्पाच्या संबंधित आदिवासींच्या सर्व अडचणी ऐकून जागेवरच सोडविण्याचा प्रयत्न केला. यात सेमाडोह येथे गुरांच्या चराईचा प्रश्न तात्काळ निकाली काढण्याचे आदेश उपस्थित वनाधिकाऱ्यांना दिले.

ठळक मुद्दे२० गावांचा दौरा : आदिवासींच्या समस्या ‘आॅन दी स्पॉट’ सोडविल्या

लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी दिवसभर मेळघाटातील २० पेक्षा अधिक गावांचा दौरा केला. व्याघ्र प्रकल्पाच्या संबंधित आदिवासींच्या सर्व अडचणी ऐकून जागेवरच सोडविण्याचा प्रयत्न केला. यात सेमाडोह येथे गुरांच्या चराईचा प्रश्न तात्काळ निकाली काढण्याचे आदेश उपस्थित वनाधिकाऱ्यांना दिले. तेथीलच व्याघ्र प्रकल्पाने मनाई केलेल्या जमिनीवर पेरणी केली. मनाईहुकूम झुगारून खासदारांनी पेरणी केल्याने आदिवासी शेतकऱ्यांना बळ मिळाले. कावडाझिरी येथील वाघाच्या हल्ल्यात जखमी मुलीला सव्वा लाख रुपयांचा धनादेश दिला.खासदार नवनीत राणा सोमवारी वन, व्याघ्र प्रकल्पांसह महसूल आणि संबंधित विभागाच्या अधिकाºयांना घेऊन धारणी व चिखलदरा तालुक्यातील विविध गावांत पोहोचल्या. वन आणि अन्य प्रकल्पासंदर्भात आदिवासींनी त्यांच्या समस्या राणा यांच्यासमोर मांडल्या. मांडल्या. आदिवासींसाठी अडचण ठरणाऱ्या समस्या निकाली काढण्यासाठी दिल्ली येथे वरिष्ठ अधिकाºयांची बैठकीत आवाज उचलण्याची ग्वाही त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. आदिवासी गावांचे पुनर्वसन करण्यात आले. दहा लाख रुपये घ्या आणि कुठेही जा, या कायद्यातून आदिवासींचे जीवनमान कसे उंचावणार, असा सवाल त्यांनी केला. सेमाडोह येथील आदिवासींना तब्बल सात किलोमीटर दूर अंतरावर चराईसाठी जंगल देण्यात आले. इतक्या दूर अंतरावर चराई शक्य नाही, असे बजावत त्यांना लगतच चराईची सुविधा देण्याचे निेर्देश नवनीत राणा यांनी दिले.धनादेश वाटपगत आठवड्यात वाघिणीच्या हल्ल्यात जखमी झालेल्या संगीता राधेश्याम दावर या आठ वर्षीय चिमुकलीला सव्वा लक्ष रुपयांचा धनादेश देण्यात आला. तेलंगणा येथील एका कंपनीत विद्युत धक्कयाने मरण पावलेल्या अचलपूर तालुक्यातील काळविट गावातील दिनेश संतू चाकोने (१९) यांच्या परिवाराला दोन लाख रुपये मदत रोख स्वरुपात दिली.राणा आणि वाघिणीचे सात किलोमीटर अंतरब्रह्मपुरी येथून डोलार जंगलात सोडण्यात आलेल्या वाघिणीची दहशत परिसरात आहे. नवनीत राणा यांनी दौरा केला. तेव्हा ई-वन वाघीण केवळ सात किलोमीटर अंतरावर असल्याची माहिती होती. त्यामुळे वनाधिकाऱ्यांची चांगली धावपळ झाली. सदर वाघिणीला ट्रॅप करण्यासाठी व्याघ्र प्रकल्पाने प्रयत्न सुरू केल्याचे सांगण्यात आले.व्याघ्र आणि वन विभागासंदर्भात आदिवासींच्या समस्या निकाली काढण्यात येणार आहेत. काहींवर तोडगा काढण्यात आला. वाघिणीला ट्रॅप करण्यासाठी पाच दिवसापासून संबंधित विभाग कार्यरत आहे. दिल्ली येथे एक बैठक लावून उर्वरित समस्या निकाली काढण्यात येईल.- नवनीत राणाखासदार, अमरावती