शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
4
महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
5
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकमा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
6
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
7
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
8
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
9
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
10
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
11
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
12
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
13
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
14
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
15
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
16
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
17
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
18
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
19
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
20
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं

मेळघाटातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

By admin | Updated: June 27, 2017 00:12 IST

रोहिणीच्या अल्प सऱ्या आणि मृगाच्या आंखमिचौलीच्या दरम्यान तालुक्यात खरीप पिकाची पेरणी अनेकांनी आटोपती घेतली.

बियाणे झाले मातीमोल : ५० टक्के पेरण्या पूर्ण; शेतकरी आर्थिक विवंचनेत लोकमत न्यूज नेटवर्कधारणी : रोहिणीच्या अल्प सऱ्या आणि मृगाच्या आंखमिचौलीच्या दरम्यान तालुक्यात खरीप पिकाची पेरणी अनेकांनी आटोपती घेतली. मात्र पावसाचा लहरीपणा कायम असल्याने कोरडवाहू शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले असून ओलितांची सोय असणाऱ्यांनी तुषार संचाच्या सहाय्याने पेरलेले धान्य उगवण्याची कसरत सुरू ठेवली आहे.ज्यांची बियाणे ओलसर भागात पडल्या आहेत ते काही प्रमाणात उगवताना दिसत आहे, तर काही बियाणे मातीतच असल्याने दुबार पेरणीची शक्यता वर्तविली जात आहे. साधारणपणे मेळघाटात पाऊस समाधानकारक असतो. मात्र यावर्षी पावसाने टप्प्याटप्प्याने विविध भागांत हजेरी लावत आहे. मात्र हा पाऊस शेतीला पोषक असे दिसून येत नसल्याने यंदा मेळघाटातही पाण्याचे संकट उद्भवण्याची भीती निर्माण झाली आहे. जून महिन्याच्या शेवटपर्यंत १०० टक्के पेरणी पूर्ण करणाऱ्या धारणी तालुक्यात सध्या केवळ ४० ते ५० टक्के पेरणी झाल्या आहेत. तर अनेकांना आजही पेरणीयोग्य पावसाची प्रतीक्षा आहे.आर्द्राच्या म्हशीवर भिस्तरोहिणी व मृग हे दोन पावसाचे नक्षत्र दगाबाज ठरल्यावर आता आर्द्राच्या म्हशी वाहनापासून मोठी अपेक्षा आहे. म्हशीला पाणी आवडते. त्यामुळे आर्द्रात समाधानकारक पाऊस पडण्याची आशा आहे. आता शेतकऱ्यांचे लक्ष पूर्णपणे आर्द्राकडे लागले आहे.‘धोंडी धोंडी पाणी दे’दर्यापूर : तालुक्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात तालुक्यात सर्वत्र पाऊस कोसळला, मात्र धो-धो पडलेला हा पाऊस शेती, नाले खरडून वाहून गेला. या पावसाने जमिनीची तहान मात्र भागलेली नाही. आजही जमिनीत पूर्ण कोरडा ठणठणाट आहे. रोजच आकाशात काळे कुट्ट ढग असल्याने आज ना उद्या पाऊस पडेल, या आशेवर शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र पेरणी होऊन तब्बल १५ दिवस उलटल्यानंतरही पाऊस येत नसल्याने सर्वत्र दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. निसर्गाने शेतकऱ्यांवर दया करून दमदार पाऊस कोसळावा, यासाठी गावागावांत ‘धोंडी धोंडी पाणी दे’ अशी विनवणी होत आहेत.भातकुलीत पाच टक्के पेरणीटाकरखेडा संभू : समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. पावसाच्या प्रतीक्षेत पेरणीचे दिवस जात आहे. सद्यस्थितीत तालुक्यात केवळ ५ टक्के पेरणी झालेली आहे. तालुक्यात काही ठिकाणी पेरणी झाली. पण पाऊस नसल्याने उगवलेले रोप कोमेजण्याची शक्यता आहे.