शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

मेळघाटातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

By admin | Updated: June 27, 2017 00:12 IST

रोहिणीच्या अल्प सऱ्या आणि मृगाच्या आंखमिचौलीच्या दरम्यान तालुक्यात खरीप पिकाची पेरणी अनेकांनी आटोपती घेतली.

बियाणे झाले मातीमोल : ५० टक्के पेरण्या पूर्ण; शेतकरी आर्थिक विवंचनेत लोकमत न्यूज नेटवर्कधारणी : रोहिणीच्या अल्प सऱ्या आणि मृगाच्या आंखमिचौलीच्या दरम्यान तालुक्यात खरीप पिकाची पेरणी अनेकांनी आटोपती घेतली. मात्र पावसाचा लहरीपणा कायम असल्याने कोरडवाहू शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले असून ओलितांची सोय असणाऱ्यांनी तुषार संचाच्या सहाय्याने पेरलेले धान्य उगवण्याची कसरत सुरू ठेवली आहे.ज्यांची बियाणे ओलसर भागात पडल्या आहेत ते काही प्रमाणात उगवताना दिसत आहे, तर काही बियाणे मातीतच असल्याने दुबार पेरणीची शक्यता वर्तविली जात आहे. साधारणपणे मेळघाटात पाऊस समाधानकारक असतो. मात्र यावर्षी पावसाने टप्प्याटप्प्याने विविध भागांत हजेरी लावत आहे. मात्र हा पाऊस शेतीला पोषक असे दिसून येत नसल्याने यंदा मेळघाटातही पाण्याचे संकट उद्भवण्याची भीती निर्माण झाली आहे. जून महिन्याच्या शेवटपर्यंत १०० टक्के पेरणी पूर्ण करणाऱ्या धारणी तालुक्यात सध्या केवळ ४० ते ५० टक्के पेरणी झाल्या आहेत. तर अनेकांना आजही पेरणीयोग्य पावसाची प्रतीक्षा आहे.आर्द्राच्या म्हशीवर भिस्तरोहिणी व मृग हे दोन पावसाचे नक्षत्र दगाबाज ठरल्यावर आता आर्द्राच्या म्हशी वाहनापासून मोठी अपेक्षा आहे. म्हशीला पाणी आवडते. त्यामुळे आर्द्रात समाधानकारक पाऊस पडण्याची आशा आहे. आता शेतकऱ्यांचे लक्ष पूर्णपणे आर्द्राकडे लागले आहे.‘धोंडी धोंडी पाणी दे’दर्यापूर : तालुक्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात तालुक्यात सर्वत्र पाऊस कोसळला, मात्र धो-धो पडलेला हा पाऊस शेती, नाले खरडून वाहून गेला. या पावसाने जमिनीची तहान मात्र भागलेली नाही. आजही जमिनीत पूर्ण कोरडा ठणठणाट आहे. रोजच आकाशात काळे कुट्ट ढग असल्याने आज ना उद्या पाऊस पडेल, या आशेवर शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र पेरणी होऊन तब्बल १५ दिवस उलटल्यानंतरही पाऊस येत नसल्याने सर्वत्र दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. निसर्गाने शेतकऱ्यांवर दया करून दमदार पाऊस कोसळावा, यासाठी गावागावांत ‘धोंडी धोंडी पाणी दे’ अशी विनवणी होत आहेत.भातकुलीत पाच टक्के पेरणीटाकरखेडा संभू : समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. पावसाच्या प्रतीक्षेत पेरणीचे दिवस जात आहे. सद्यस्थितीत तालुक्यात केवळ ५ टक्के पेरणी झालेली आहे. तालुक्यात काही ठिकाणी पेरणी झाली. पण पाऊस नसल्याने उगवलेले रोप कोमेजण्याची शक्यता आहे.