शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

कृषी महोत्सवाचा ‘आत्मा’च हरविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 00:30 IST

शेतकऱ्यांना प्रगत कृषीतंत्रज्ञानाचा लाभ व्हावा यासाठी आयोजित पाच दिवसीत कृषी महोत्सवाचा जिल्ह्यात प्रचार, प्रसार न झाल्याने शेतकऱ्यांपर्यत हा महोत्सव पोहोचलाच नाही, त्यामुळे कार्यक्रमात खुुर्च्या रिकाम्या अशी नामुष्की ‘आत्मा’ विभागावर ओढावली, शेतकऱ्यांनीच पाठ फिरवील्यामुळे २० लाखांचा खर्च कुणासाठी, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे.

ठळक मुद्देढिसाळ नियोजन : शेतकऱ्यांची पाठ, २० लाखांचा खर्च कुणासाठी ?

आॅनलाईन लोकमतअमरावती- शेतकऱ्यांना प्रगत कृषीतंत्रज्ञानाचा लाभ व्हावा यासाठी आयोजित पाच दिवसीत कृषी महोत्सवाचा जिल्ह्यात प्रचार, प्रसार न झाल्याने शेतकऱ्यांपर्यत हा महोत्सव पोहोचलाच नाही, त्यामुळे कार्यक्रमात खुुर्च्या रिकाम्या अशी नामुष्की ‘आत्मा’ विभागावर ओढावली, शेतकऱ्यांनीच पाठ फिरवील्यामुळे २० लाखांचा खर्च कुणासाठी, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे.ज्यांच्यासाठी लाखो रूपयांचा खर्च सुरू आहे, त्या शेतकऱ्यांचीच या महोत्सवात नगण्य स्थिती असल्याने, हा महोत्सव शेतकºयांसाठी की कृषी विभागाचे गोडवे गाण्यासाठी असा सवाल विचारल्या जात आहे. सलग चार वर्षाच्या दुष्काळ, नैसगीक आपत्ती व लहरी पाऊस यामुळे जिल्ह्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या आत्महत्याचे सत्र थांबलेले नाही. अश्या परिस्थितीत शेतकऱ्यांना पर्यायी पिकांसंदर्भात मार्गदर्शन करणे, शेतकरी व प्रयोगशील शेतकऱ्यांच्या अनुभवाचे बोल महत्वाचे ठरत असतांना याविषयीची माहीती शेतकऱ्यांपर्यत पोहोचलीच नाही. कार्यक्रमास्थळी असलेल्या रिकाम्या खुर्चा आयोजकांच्या ढिसाळ नियोजनाचे प्रतिक बनल्या आहेत.अश्या प्रकारच्या कृषीमहोत्सवात नवीण वाणांची माहीती, शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, कृषी उद्योजक, कृषी तज्ञ यांची थेट भेट, परिसंवाद, चर्च्चा व याद्वारे शेतकºयांच्या शंकाचे निरसन तसेच शेतकरी ते थेट ग्राहक विक्री याविषयीचे मार्गदर्शन महत्वपुर्ण ठरत असतांना प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही मागील महिण्यात एका खासगी संस्थेद्वारा कृषी प्रदर्शन आयोजित होते. त्याला शेतकºयांचा प्रतिसाद लाभला, या पार्श्वभुमीवर प्रत्यक्ष कृषी विभागाचे असलेल्या या प्रदर्शनात आकर्षणाचे मुख्य केंद्रबिंदुच असलेला शेतकरीच हरविला असल्याचे वास्तव आहे..शहरात असूनही कृषिमंत्र्याची महोत्सवाकडे पाठउद्घाटनाला कृषीमंत्री,गृहराज्यमंत्री,पालकमंत्री,खासदार जिल्ह्यातील सर्वच आमदारांना निमंत्रित करण्यात आले.प्रत्यक्षात ना.पांडुरंग फुंडकर पक्षाच्या बैठकीनिमित्य शहरात उपस्थित असताना फिरकलेच नाही. ना. रणजीत पाटील यांच्यासह बहुतेक आमदार अनुपस्थित होते. ना. प्रवीण पोटे यांच्यासह खासदार आनंदराव अडसूळ, आमदार रमेश बुंदिले उपस्थित होते. त्यामुळे उद्घाटनाची नियोजित वेळ पाच तासांनी वाढवूनदेखील कृषी विभाग तोंडघसी पडल्याचे वास्तव आहे.