शहरं
Join us  
Trending Stories
1
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
2
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
3
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
4
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
5
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
6
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
7
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
8
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
9
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
10
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
11
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
12
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
13
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
14
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
15
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
16
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
17
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
18
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
19
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
20
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर

कृषी महोत्सवाचा ‘आत्मा’च हरविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 00:30 IST

शेतकऱ्यांना प्रगत कृषीतंत्रज्ञानाचा लाभ व्हावा यासाठी आयोजित पाच दिवसीत कृषी महोत्सवाचा जिल्ह्यात प्रचार, प्रसार न झाल्याने शेतकऱ्यांपर्यत हा महोत्सव पोहोचलाच नाही, त्यामुळे कार्यक्रमात खुुर्च्या रिकाम्या अशी नामुष्की ‘आत्मा’ विभागावर ओढावली, शेतकऱ्यांनीच पाठ फिरवील्यामुळे २० लाखांचा खर्च कुणासाठी, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे.

ठळक मुद्देढिसाळ नियोजन : शेतकऱ्यांची पाठ, २० लाखांचा खर्च कुणासाठी ?

आॅनलाईन लोकमतअमरावती- शेतकऱ्यांना प्रगत कृषीतंत्रज्ञानाचा लाभ व्हावा यासाठी आयोजित पाच दिवसीत कृषी महोत्सवाचा जिल्ह्यात प्रचार, प्रसार न झाल्याने शेतकऱ्यांपर्यत हा महोत्सव पोहोचलाच नाही, त्यामुळे कार्यक्रमात खुुर्च्या रिकाम्या अशी नामुष्की ‘आत्मा’ विभागावर ओढावली, शेतकऱ्यांनीच पाठ फिरवील्यामुळे २० लाखांचा खर्च कुणासाठी, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे.ज्यांच्यासाठी लाखो रूपयांचा खर्च सुरू आहे, त्या शेतकऱ्यांचीच या महोत्सवात नगण्य स्थिती असल्याने, हा महोत्सव शेतकºयांसाठी की कृषी विभागाचे गोडवे गाण्यासाठी असा सवाल विचारल्या जात आहे. सलग चार वर्षाच्या दुष्काळ, नैसगीक आपत्ती व लहरी पाऊस यामुळे जिल्ह्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या आत्महत्याचे सत्र थांबलेले नाही. अश्या परिस्थितीत शेतकऱ्यांना पर्यायी पिकांसंदर्भात मार्गदर्शन करणे, शेतकरी व प्रयोगशील शेतकऱ्यांच्या अनुभवाचे बोल महत्वाचे ठरत असतांना याविषयीची माहीती शेतकऱ्यांपर्यत पोहोचलीच नाही. कार्यक्रमास्थळी असलेल्या रिकाम्या खुर्चा आयोजकांच्या ढिसाळ नियोजनाचे प्रतिक बनल्या आहेत.अश्या प्रकारच्या कृषीमहोत्सवात नवीण वाणांची माहीती, शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, कृषी उद्योजक, कृषी तज्ञ यांची थेट भेट, परिसंवाद, चर्च्चा व याद्वारे शेतकºयांच्या शंकाचे निरसन तसेच शेतकरी ते थेट ग्राहक विक्री याविषयीचे मार्गदर्शन महत्वपुर्ण ठरत असतांना प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही मागील महिण्यात एका खासगी संस्थेद्वारा कृषी प्रदर्शन आयोजित होते. त्याला शेतकºयांचा प्रतिसाद लाभला, या पार्श्वभुमीवर प्रत्यक्ष कृषी विभागाचे असलेल्या या प्रदर्शनात आकर्षणाचे मुख्य केंद्रबिंदुच असलेला शेतकरीच हरविला असल्याचे वास्तव आहे..शहरात असूनही कृषिमंत्र्याची महोत्सवाकडे पाठउद्घाटनाला कृषीमंत्री,गृहराज्यमंत्री,पालकमंत्री,खासदार जिल्ह्यातील सर्वच आमदारांना निमंत्रित करण्यात आले.प्रत्यक्षात ना.पांडुरंग फुंडकर पक्षाच्या बैठकीनिमित्य शहरात उपस्थित असताना फिरकलेच नाही. ना. रणजीत पाटील यांच्यासह बहुतेक आमदार अनुपस्थित होते. ना. प्रवीण पोटे यांच्यासह खासदार आनंदराव अडसूळ, आमदार रमेश बुंदिले उपस्थित होते. त्यामुळे उद्घाटनाची नियोजित वेळ पाच तासांनी वाढवूनदेखील कृषी विभाग तोंडघसी पडल्याचे वास्तव आहे.