शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

कृषी महोत्सवाचा ‘आत्मा’च हरविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 00:30 IST

शेतकऱ्यांना प्रगत कृषीतंत्रज्ञानाचा लाभ व्हावा यासाठी आयोजित पाच दिवसीत कृषी महोत्सवाचा जिल्ह्यात प्रचार, प्रसार न झाल्याने शेतकऱ्यांपर्यत हा महोत्सव पोहोचलाच नाही, त्यामुळे कार्यक्रमात खुुर्च्या रिकाम्या अशी नामुष्की ‘आत्मा’ विभागावर ओढावली, शेतकऱ्यांनीच पाठ फिरवील्यामुळे २० लाखांचा खर्च कुणासाठी, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे.

ठळक मुद्देढिसाळ नियोजन : शेतकऱ्यांची पाठ, २० लाखांचा खर्च कुणासाठी ?

आॅनलाईन लोकमतअमरावती- शेतकऱ्यांना प्रगत कृषीतंत्रज्ञानाचा लाभ व्हावा यासाठी आयोजित पाच दिवसीत कृषी महोत्सवाचा जिल्ह्यात प्रचार, प्रसार न झाल्याने शेतकऱ्यांपर्यत हा महोत्सव पोहोचलाच नाही, त्यामुळे कार्यक्रमात खुुर्च्या रिकाम्या अशी नामुष्की ‘आत्मा’ विभागावर ओढावली, शेतकऱ्यांनीच पाठ फिरवील्यामुळे २० लाखांचा खर्च कुणासाठी, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे.ज्यांच्यासाठी लाखो रूपयांचा खर्च सुरू आहे, त्या शेतकऱ्यांचीच या महोत्सवात नगण्य स्थिती असल्याने, हा महोत्सव शेतकºयांसाठी की कृषी विभागाचे गोडवे गाण्यासाठी असा सवाल विचारल्या जात आहे. सलग चार वर्षाच्या दुष्काळ, नैसगीक आपत्ती व लहरी पाऊस यामुळे जिल्ह्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या आत्महत्याचे सत्र थांबलेले नाही. अश्या परिस्थितीत शेतकऱ्यांना पर्यायी पिकांसंदर्भात मार्गदर्शन करणे, शेतकरी व प्रयोगशील शेतकऱ्यांच्या अनुभवाचे बोल महत्वाचे ठरत असतांना याविषयीची माहीती शेतकऱ्यांपर्यत पोहोचलीच नाही. कार्यक्रमास्थळी असलेल्या रिकाम्या खुर्चा आयोजकांच्या ढिसाळ नियोजनाचे प्रतिक बनल्या आहेत.अश्या प्रकारच्या कृषीमहोत्सवात नवीण वाणांची माहीती, शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, कृषी उद्योजक, कृषी तज्ञ यांची थेट भेट, परिसंवाद, चर्च्चा व याद्वारे शेतकºयांच्या शंकाचे निरसन तसेच शेतकरी ते थेट ग्राहक विक्री याविषयीचे मार्गदर्शन महत्वपुर्ण ठरत असतांना प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही मागील महिण्यात एका खासगी संस्थेद्वारा कृषी प्रदर्शन आयोजित होते. त्याला शेतकºयांचा प्रतिसाद लाभला, या पार्श्वभुमीवर प्रत्यक्ष कृषी विभागाचे असलेल्या या प्रदर्शनात आकर्षणाचे मुख्य केंद्रबिंदुच असलेला शेतकरीच हरविला असल्याचे वास्तव आहे..शहरात असूनही कृषिमंत्र्याची महोत्सवाकडे पाठउद्घाटनाला कृषीमंत्री,गृहराज्यमंत्री,पालकमंत्री,खासदार जिल्ह्यातील सर्वच आमदारांना निमंत्रित करण्यात आले.प्रत्यक्षात ना.पांडुरंग फुंडकर पक्षाच्या बैठकीनिमित्य शहरात उपस्थित असताना फिरकलेच नाही. ना. रणजीत पाटील यांच्यासह बहुतेक आमदार अनुपस्थित होते. ना. प्रवीण पोटे यांच्यासह खासदार आनंदराव अडसूळ, आमदार रमेश बुंदिले उपस्थित होते. त्यामुळे उद्घाटनाची नियोजित वेळ पाच तासांनी वाढवूनदेखील कृषी विभाग तोंडघसी पडल्याचे वास्तव आहे.