शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

‘एसओएस’चा पुष्कर जिल्ह्यात प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 23:16 IST

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) बोर्ड नवी दिल्ली अंतर्गत घेण्यात आलेल्या १२ वीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर झाला. जिल्ह्यात या अभ्यासक्रमाच्या पाच शाळा आहेत.

ठळक मुद्देसीबीएसई १२वीचा निकाल नवोदयचा राहुल आगरकर, ‘एसओएस’चा चैतन्य वानखडे द्वितीय

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) बोर्ड नवी दिल्ली अंतर्गत घेण्यात आलेल्या १२ वीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर झाला. जिल्ह्यात या अभ्यासक्रमाच्या पाच शाळा आहेत. यामध्ये स्कूल आॅफ स्कॉलर्सचा पुष्कर मानकर ९३.६ टक्के गुण मिळवूण जिल्ह्यात प्रथम आला, तर जवाहर नवोदय केंद्रीय विद्यालयाचा राहुल अगारकर व स्कूल आॅफ स्कॉलर्सचा चैतन्य वानखडे ९३.४ टक्के गुण घेऊन व्दितीय, तर नवोदयचीच पायल राठोड ९३.२ टक्के गुण मिळवून तृतीय राहिली. सीबीएसई बोर्डामार्फत ५ मार्च ते २७ एप्रिल दरम्यान परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा आॅनलाइन निकाल शनिवारी दुपारी जाहीर झाला. सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.स्कूल आॅफ स्कॉलर्सचा १०० टक्के निकालसीबीएसई बोर्ड अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या इयत्ता १२ वीच्या परीक्षेत येथील स्कूल आॅफ स्कॉलर्सचा निकाल १०० टक्के लागला. यामध्ये पुष्कर मानकर ९३.६, चैतन्य वानखेडे ९३.४ व अंकित अग्रवाल ९२ टक्के गुण मिळाले. प्राचार्य सुरेश लकडे, उपप्राचार्य समिधा नहर आदींनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.महर्षी पब्लिक स्कूलचा शतप्रतिशत निकालसीबीएसई बोर्ड अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या इयत्ता १२ वीच्या परीक्षेत महर्षी पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली. यावर्षीसुद्धा १२ वी तिसऱ्या बॅचचा निकाल शंभर टक्के लागला आहे. त्यामध्ये दीपांशू कडू ९१ टक्के, राघव सोमानी ८६ टक्के, रुग्वेद वाट ८४ टक्के, अस्मिता हजारी ८४ टक्के, शगून अग्रवाल ८० टक्के, तनय कोहळे ७९ टक्के या विद्यार्थ्यांचे यशाचे कौतुक केले जात आहे.पोटे इंटरनॅशनल स्कूलचे उल्लेखनीय यशपी. आर. पोटे पाटील इंटरनॅशनल स्कूलच्या गुणवत्ता यादीत विद्यार्थ्यांमध्ये सृष्टी भारती ९१ टक्के, प्रतीक देऊळकर ९० टक्के या व्यतिरिक्त ८० टक्केच्यावर चिरायुष निकोसे ८४ टक्के, विनीत काळे ८४ टक्के, रसिका सावरकर ८३ टक्के, सय्यद ओसामा काशीद ८१ टक्के तसेच ७० टक्केच्यावर एकूण २२ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. २०१७-१८ मध्ये एकूण ७३ विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले होते. यापैकी शाळेचा निकाल ८१ टक्के लागला. विशेष म्हणजे सी.बी.एस.ई. बारावीची ही पहिलीच बॅच होती. यामुळे पहिल्याच वर्षी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तसेच उत्तीर्ण होणाºया विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.जवाहर नवोदय केंद्रीय विद्यालययेथील जवाहर नवोदय केंद्रीय विद्यालयाचा निकाल ७९.७१ टक्के लागला. यावर्षी ६७ विद्यार्थ्यांनी इयत्ता १२ वीची परीक्षा दिली असून, सर्वच पास झाल्याची माहिती प्राचार्य मेश्राम यांनी दिली. यामध्ये राहुल आगरकर ९३.४, पायल राठोड ९३.२, शशीकांत तायडे ९२.२, देवेश देशमुख याला ९०.६ टक्के गुण मिळाले. यासाळेत ४ विद्यार्थी ९० ते ९५ टक्के, ४८ विद्यार्थी ७५ ते ८९ टक्के व १५ विद्यार्थी ६० ते ७४ श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले.