शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याअभावी सुकल्या संत्राबागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 01:40 IST

गत दोन वर्षांपासून पथ्रोट परिसरात कमी पाऊस झाल्यामुळे परिसरातील शहानूर व छोटे-मोठे धरण पूर्ण भरले नसल्याने परिसरातील बोअर आटल्या. विहिरीचे खोदकाम करुनही पाणी लागत नाही. त्या कारणाने पाण्याअभावी पथ्रोट परिसरातील संत्राबागा शेतकऱ्यांच्या नजरेसमोर सुकत चालल्या आहेत.

ठळक मुद्देशहानूर धरणाचे पाणी कधी सोडणार? : पाण्याकरिता दोन महिन्यांपूर्वी अर्जप्रक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्कपथ्रोट : गत दोन वर्षांपासून पथ्रोट परिसरात कमी पाऊस झाल्यामुळे परिसरातील शहानूर व छोटे-मोठे धरण पूर्ण भरले नसल्याने परिसरातील बोअर आटल्या. विहिरीचे खोदकाम करुनही पाणी लागत नाही. त्या कारणाने पाण्याअभावी पथ्रोट परिसरातील संत्राबागा शेतकऱ्यांच्या नजरेसमोर सुकत चालल्या आहेत.शेतकऱ्यांना आपल्या शेतात बागा उभ्या करण्याकरिता वर्षोगनिती मेहनत करुन बागा उभ्या केल्या. जवळचा होता नव्हता पैसा खर्च केला. मेहनत पणाला लागली. मात्र, नजरसेमोर उभ्या असलेल्या संत्राबागा पाण्याअभावी सुकत चालल्यचे पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रूंचा पूर थांबलेला नाही. हे अश्रू थांबविण्याकरिता आणि लाखमोलाच्या संत्राबागा वाचविण्याकरिता शहानूर धरणाचे पाणी सोडण्याची मागणी वारंवार होते. या मागणीकडे लक्ष देण्याची नितांत गरज आहे.यावर्षी शहानूर धरण ७० टक्के भरल्याची नोंद दप्तरी होती. सद्यस्थितीत धरणामध्ये ६० टक्के जलसाठा आहे. यावर्षी पाण्याचा साठा कमी असल्यामुळे रब्बीसारखे येणारे गहू, हरभरा, कांदा या पिकाकरिता पाणी मिळणार नाही, असे शाखा अभियंत्याकडून सांगण्यात आले होते. त्यापूर्वी तुम्ही संत्रापिकांकरिता फॉर्म भरा, आम्ही तुम्हाला संत्रापिकाला पाणी देण्याची व्यवस्था करू, असे सांगितले गेले. यामुळे संत्रा बागायतदारांनी दोन महिन्यांपूर्वी अर्जप्रक्रिया केली. मात्र, अद्यापपर्यंत शहानूर धरणाचे पाणी शेतीकरिता सोडण्यात आलेले नाही.पथ्रोट परिसरात आंबिया बहार मोठ्या प्रमाणात घेतला जातो. त्याकरिता शेतकरी ५ ते १० जानेवारीपासून आंबिया बहर घेण्याकरिता पाणी सोडतात. मात्र, विहिरीतच पाणी नसल्यामुळे संत्राबागांना ते अद्याप देता आलेले नाही. शहानूर धरणाच्या पाच सहा किलोमीटरच्या परिसरातील संत्राबागा सुकत आहे. धरणात पाणी आहे, मात्र त्याचा वापर शेतीसाठी करता येत नाही. शहानूर विभागाने पंधरा दिवसांतून एकवेळा धरणाचे पाणी सोडले, तर शेतकऱ्यांच्या संत्राबागा सुकण्यापासून वाचतील. शहानूर विभागाला या बाबीची दखल घेणे फार गरजेचे आहे. शेतकऱ्यांच्या या जटिल प्रश्नाकडे लक्ष देणे ही शासनाची नितांत गरज आहे. संत्राच्या बागांवर परिसरातील शेतकऱ्यांची भिस्त आहे. चिल्लर पिकांमध्ये शेतकऱ्यांच्या हाती कष्ट वजा जाता काहीच शिल्लक राहत नाही. याशिवाय धरणामध्ये पाणी कमी असल्यामुळे शेतकºयांनी जास्त पाण्याची माया लागणारे गहू, कांदा, हरभऱ्याकडे यंदा दुर्लक्ष केले.आमच्या उभ्या बागा पाण्याअभावी सुकत आहे. शाखा अभियंत्यांनी संत्रा पिकाला पाणी देण्याचे आश्वासन दिले होते. ते अजूनही पूर्ण झाले नाही. दोन महिन्यांपूर्वी पाणी मागणीचा अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली.- श्रीकांत बोबडेशेतकरीशहानूर विभागाने महिन्यातून दोन वेळा पाणी सोडले, तर आमच्या बागा वाचविण्यास मदत होईल. शासनाने आमच्या गंभीर समस्येकडे लक्ष देण्याची नितांत गरज आहे.- गजानन काळमेघशेतकरीशेतकरी हा देशाचा पोशिंदा आहे. शेतकरी व जवान या दोघांवर देशाचे भवितव्य आहे. मात्र, ‘सीमा पर मरे जवान, देश में किसान’ देशात सध्या ही परिस्थिती आहे.- रामेश्वर नागापुरेशेतकरी