शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

पाण्याअभावी सुकल्या संत्राबागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 01:40 IST

गत दोन वर्षांपासून पथ्रोट परिसरात कमी पाऊस झाल्यामुळे परिसरातील शहानूर व छोटे-मोठे धरण पूर्ण भरले नसल्याने परिसरातील बोअर आटल्या. विहिरीचे खोदकाम करुनही पाणी लागत नाही. त्या कारणाने पाण्याअभावी पथ्रोट परिसरातील संत्राबागा शेतकऱ्यांच्या नजरेसमोर सुकत चालल्या आहेत.

ठळक मुद्देशहानूर धरणाचे पाणी कधी सोडणार? : पाण्याकरिता दोन महिन्यांपूर्वी अर्जप्रक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्कपथ्रोट : गत दोन वर्षांपासून पथ्रोट परिसरात कमी पाऊस झाल्यामुळे परिसरातील शहानूर व छोटे-मोठे धरण पूर्ण भरले नसल्याने परिसरातील बोअर आटल्या. विहिरीचे खोदकाम करुनही पाणी लागत नाही. त्या कारणाने पाण्याअभावी पथ्रोट परिसरातील संत्राबागा शेतकऱ्यांच्या नजरेसमोर सुकत चालल्या आहेत.शेतकऱ्यांना आपल्या शेतात बागा उभ्या करण्याकरिता वर्षोगनिती मेहनत करुन बागा उभ्या केल्या. जवळचा होता नव्हता पैसा खर्च केला. मेहनत पणाला लागली. मात्र, नजरसेमोर उभ्या असलेल्या संत्राबागा पाण्याअभावी सुकत चालल्यचे पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रूंचा पूर थांबलेला नाही. हे अश्रू थांबविण्याकरिता आणि लाखमोलाच्या संत्राबागा वाचविण्याकरिता शहानूर धरणाचे पाणी सोडण्याची मागणी वारंवार होते. या मागणीकडे लक्ष देण्याची नितांत गरज आहे.यावर्षी शहानूर धरण ७० टक्के भरल्याची नोंद दप्तरी होती. सद्यस्थितीत धरणामध्ये ६० टक्के जलसाठा आहे. यावर्षी पाण्याचा साठा कमी असल्यामुळे रब्बीसारखे येणारे गहू, हरभरा, कांदा या पिकाकरिता पाणी मिळणार नाही, असे शाखा अभियंत्याकडून सांगण्यात आले होते. त्यापूर्वी तुम्ही संत्रापिकांकरिता फॉर्म भरा, आम्ही तुम्हाला संत्रापिकाला पाणी देण्याची व्यवस्था करू, असे सांगितले गेले. यामुळे संत्रा बागायतदारांनी दोन महिन्यांपूर्वी अर्जप्रक्रिया केली. मात्र, अद्यापपर्यंत शहानूर धरणाचे पाणी शेतीकरिता सोडण्यात आलेले नाही.पथ्रोट परिसरात आंबिया बहार मोठ्या प्रमाणात घेतला जातो. त्याकरिता शेतकरी ५ ते १० जानेवारीपासून आंबिया बहर घेण्याकरिता पाणी सोडतात. मात्र, विहिरीतच पाणी नसल्यामुळे संत्राबागांना ते अद्याप देता आलेले नाही. शहानूर धरणाच्या पाच सहा किलोमीटरच्या परिसरातील संत्राबागा सुकत आहे. धरणात पाणी आहे, मात्र त्याचा वापर शेतीसाठी करता येत नाही. शहानूर विभागाने पंधरा दिवसांतून एकवेळा धरणाचे पाणी सोडले, तर शेतकऱ्यांच्या संत्राबागा सुकण्यापासून वाचतील. शहानूर विभागाला या बाबीची दखल घेणे फार गरजेचे आहे. शेतकऱ्यांच्या या जटिल प्रश्नाकडे लक्ष देणे ही शासनाची नितांत गरज आहे. संत्राच्या बागांवर परिसरातील शेतकऱ्यांची भिस्त आहे. चिल्लर पिकांमध्ये शेतकऱ्यांच्या हाती कष्ट वजा जाता काहीच शिल्लक राहत नाही. याशिवाय धरणामध्ये पाणी कमी असल्यामुळे शेतकºयांनी जास्त पाण्याची माया लागणारे गहू, कांदा, हरभऱ्याकडे यंदा दुर्लक्ष केले.आमच्या उभ्या बागा पाण्याअभावी सुकत आहे. शाखा अभियंत्यांनी संत्रा पिकाला पाणी देण्याचे आश्वासन दिले होते. ते अजूनही पूर्ण झाले नाही. दोन महिन्यांपूर्वी पाणी मागणीचा अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली.- श्रीकांत बोबडेशेतकरीशहानूर विभागाने महिन्यातून दोन वेळा पाणी सोडले, तर आमच्या बागा वाचविण्यास मदत होईल. शासनाने आमच्या गंभीर समस्येकडे लक्ष देण्याची नितांत गरज आहे.- गजानन काळमेघशेतकरीशेतकरी हा देशाचा पोशिंदा आहे. शेतकरी व जवान या दोघांवर देशाचे भवितव्य आहे. मात्र, ‘सीमा पर मरे जवान, देश में किसान’ देशात सध्या ही परिस्थिती आहे.- रामेश्वर नागापुरेशेतकरी