शहरं
Join us  
Trending Stories
1
PM KP Sharma Oli Resign: अखेर नेपाळमध्ये सत्तांतर! पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी दिला राजीनामा; देश सोडून पळाले?
2
'ब्रिक्स देश अमेरिकेसाठी पिशाच्च; लवकरच युती तुटणार', पीटर नवारो यांनी पुन्हा गरळ ओकली
3
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल
4
₹२ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांच्या उड्या; ४३ दिवसांपासून सातत्यानं अपर सर्किट, तुमच्याकडे आहे?
5
"ती स्वभावाने खूप शांत आहे..."; अजित पवारांमुळे चर्चेत आलेल्या IPS अंजना कृष्णाचे वडील काय म्हणाले?
6
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचा जर्मन कंपनीसोबत नवीन व्यवसाय, ६ महिन्यांत शेअरने दिला ४२% परतावा
7
मीच माझ्या रुपाची राणी ग! सेल्फी पाहून लोकांनी उडवली खिल्ली पण 'तिने' डिलीट केला नाही फोटो
8
RBI Recruitment: रिझर्व्ह बँकेत ऑफिसर पदांसाठी भरती, १ लाख पगार! कोण करू शकतं अर्ज?
9
नेपाळमधील आंदोलनाला हिंसक वळण; राष्ट्रपती, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची घरे जमावाने जाळली
10
एसीच्या स्फोटाने दिल्ली हादरली; पिझ्झा आउटलेटमध्ये जोरदार स्फोट!
11
E20 पेट्रोलचा सर्वाधिक फटका सीएनजी कारना; खाडकन् डोळे उघडतील, कसा तो पहा...
12
लाल किल्ल्यावरील कार्यक्रमातून का केली १ कोटींच्या कलशाची चोरी? समोर आलं भलतंच कारण!
13
आज नवे आयफोन लाँच होणार! iPhone 17 मध्ये ५००० एमएएच बॅटरी? आयफोन १६, १५ च्या किंमती कोसळणार
14
नेपाळमधील आंदोलनाने भारत चिंतेत? शेजारी राष्ट्र आपल्यासाठी इतका महत्त्वाचा का?
15
नेपाळमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर, पंतप्रधानांचा राजीनामा, आंदोलकांनी संसद भवन पेटवले
16
रुग्णालयातील आपत्कालीन वॉर्डमध्ये महिला रुग्णावर बलात्कार; गुंगीचं इंजेक्शन दिलं अन्...
17
कोण आहेत बालेन शाह? ज्यांच्याकडे देशाचं नेतृत्व सोपवण्याची मागणी Gen Z आंदोलनकर्ते करतायेत
18
Video - स्वाभिमानापेक्षा पैसा मोठा नाही! पूरग्रस्त भागातील मुलाने जिंकलं मन, पाणी घेतलं अन्...
19
Gen-Z क्रांतीमुळे नेपाळमध्ये सत्तापालट? पंतप्रधान ओली दुबईला पळून जाण्याच्या प्रयत्नात, खाजगी विमान तयार
20
मुंबई विमानतळावरील अधिकारी जप्त नारळ, तेलाच्या बाटल्या नेत होते; १५ जणांना नोकरीवरून काढले

पाण्याअभावी सुकल्या संत्राबागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 01:40 IST

गत दोन वर्षांपासून पथ्रोट परिसरात कमी पाऊस झाल्यामुळे परिसरातील शहानूर व छोटे-मोठे धरण पूर्ण भरले नसल्याने परिसरातील बोअर आटल्या. विहिरीचे खोदकाम करुनही पाणी लागत नाही. त्या कारणाने पाण्याअभावी पथ्रोट परिसरातील संत्राबागा शेतकऱ्यांच्या नजरेसमोर सुकत चालल्या आहेत.

ठळक मुद्देशहानूर धरणाचे पाणी कधी सोडणार? : पाण्याकरिता दोन महिन्यांपूर्वी अर्जप्रक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्कपथ्रोट : गत दोन वर्षांपासून पथ्रोट परिसरात कमी पाऊस झाल्यामुळे परिसरातील शहानूर व छोटे-मोठे धरण पूर्ण भरले नसल्याने परिसरातील बोअर आटल्या. विहिरीचे खोदकाम करुनही पाणी लागत नाही. त्या कारणाने पाण्याअभावी पथ्रोट परिसरातील संत्राबागा शेतकऱ्यांच्या नजरेसमोर सुकत चालल्या आहेत.शेतकऱ्यांना आपल्या शेतात बागा उभ्या करण्याकरिता वर्षोगनिती मेहनत करुन बागा उभ्या केल्या. जवळचा होता नव्हता पैसा खर्च केला. मेहनत पणाला लागली. मात्र, नजरसेमोर उभ्या असलेल्या संत्राबागा पाण्याअभावी सुकत चालल्यचे पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रूंचा पूर थांबलेला नाही. हे अश्रू थांबविण्याकरिता आणि लाखमोलाच्या संत्राबागा वाचविण्याकरिता शहानूर धरणाचे पाणी सोडण्याची मागणी वारंवार होते. या मागणीकडे लक्ष देण्याची नितांत गरज आहे.यावर्षी शहानूर धरण ७० टक्के भरल्याची नोंद दप्तरी होती. सद्यस्थितीत धरणामध्ये ६० टक्के जलसाठा आहे. यावर्षी पाण्याचा साठा कमी असल्यामुळे रब्बीसारखे येणारे गहू, हरभरा, कांदा या पिकाकरिता पाणी मिळणार नाही, असे शाखा अभियंत्याकडून सांगण्यात आले होते. त्यापूर्वी तुम्ही संत्रापिकांकरिता फॉर्म भरा, आम्ही तुम्हाला संत्रापिकाला पाणी देण्याची व्यवस्था करू, असे सांगितले गेले. यामुळे संत्रा बागायतदारांनी दोन महिन्यांपूर्वी अर्जप्रक्रिया केली. मात्र, अद्यापपर्यंत शहानूर धरणाचे पाणी शेतीकरिता सोडण्यात आलेले नाही.पथ्रोट परिसरात आंबिया बहार मोठ्या प्रमाणात घेतला जातो. त्याकरिता शेतकरी ५ ते १० जानेवारीपासून आंबिया बहर घेण्याकरिता पाणी सोडतात. मात्र, विहिरीतच पाणी नसल्यामुळे संत्राबागांना ते अद्याप देता आलेले नाही. शहानूर धरणाच्या पाच सहा किलोमीटरच्या परिसरातील संत्राबागा सुकत आहे. धरणात पाणी आहे, मात्र त्याचा वापर शेतीसाठी करता येत नाही. शहानूर विभागाने पंधरा दिवसांतून एकवेळा धरणाचे पाणी सोडले, तर शेतकऱ्यांच्या संत्राबागा सुकण्यापासून वाचतील. शहानूर विभागाला या बाबीची दखल घेणे फार गरजेचे आहे. शेतकऱ्यांच्या या जटिल प्रश्नाकडे लक्ष देणे ही शासनाची नितांत गरज आहे. संत्राच्या बागांवर परिसरातील शेतकऱ्यांची भिस्त आहे. चिल्लर पिकांमध्ये शेतकऱ्यांच्या हाती कष्ट वजा जाता काहीच शिल्लक राहत नाही. याशिवाय धरणामध्ये पाणी कमी असल्यामुळे शेतकºयांनी जास्त पाण्याची माया लागणारे गहू, कांदा, हरभऱ्याकडे यंदा दुर्लक्ष केले.आमच्या उभ्या बागा पाण्याअभावी सुकत आहे. शाखा अभियंत्यांनी संत्रा पिकाला पाणी देण्याचे आश्वासन दिले होते. ते अजूनही पूर्ण झाले नाही. दोन महिन्यांपूर्वी पाणी मागणीचा अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली.- श्रीकांत बोबडेशेतकरीशहानूर विभागाने महिन्यातून दोन वेळा पाणी सोडले, तर आमच्या बागा वाचविण्यास मदत होईल. शासनाने आमच्या गंभीर समस्येकडे लक्ष देण्याची नितांत गरज आहे.- गजानन काळमेघशेतकरीशेतकरी हा देशाचा पोशिंदा आहे. शेतकरी व जवान या दोघांवर देशाचे भवितव्य आहे. मात्र, ‘सीमा पर मरे जवान, देश में किसान’ देशात सध्या ही परिस्थिती आहे.- रामेश्वर नागापुरेशेतकरी