शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

कुणाला हवे घरकुल, कुणी म्हणतं पाणी द्या; प्रशासकीय यंत्रणेची मेळघाटात वारी

By जितेंद्र दखने | Updated: July 18, 2024 22:46 IST

जिल्हाधिकाऱ्यासह एचओडी पोहोचले आदिवासीच्या दारी

जितेंद्र दखने, अमरावती: कुणाला घरकुल नाही भेटले, तर कुणी म्हणतं पिण्यासाठी पाणी नाही. योजनांचा लाभ भेटत नसल्याची व्यथा मेळघाटातील आदिवासींनी मांडली. या बाबी प्रत्यक्ष जाणून घेण्यासाठी अधिकाऱ्यांची वारी मेळघाटातील आदिवासी बांधवांच्या दारी गुरुवारी पोहोचली. यानिमित्त जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी स्वत: थेट चिखलदरा व धारणी तालुक्यातील विविध गावात जाऊन प्रत्यक्ष आदिवासी बांधवांनी संवाद साधून त्यांच्या समस्या व अडचणी जाणून घेतल्या.

मेळघाटमध्ये विविध समस्या आहेत. त्या सोडवण्यासाठी शासन पातळीवर अनेक प्रयत्न केले जातात. तरीही महत्त्वाचे प्रश्न, समस्या, आदिवासी बांधवाच्या अडचणी तसेच राहून जातात. त्यामुळे मेळघाटातील विविध समस्या जाणून घेऊन ग्रामस्थ आणि प्रशासन यांच्यातील दरी कमी करण्यासाठी, त्याचबरोबर विविध समस्यांवर तोडगा काढण्यासाठी आणि महत्त्वाच्या समस्या प्रशासनाच्या लक्षात आणून देण्यासाठी जिल्हाधिकारी सौरभ कटियार आणि सीईओ संजिता मोहपात्रा यांच्या अध्यक्षतेखाली एक दिवस मेळघाटासाठी हा उपक्रम १८ जुलै रोजी अधिकाऱ्यांची वारी मेळघाटातील जनतेच्या आदी हा नावीण्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला.

या उपक्रमात वेगवेगळ्या विभागांचे अधिकारी मेळघाटातील विविध गावात पोहोचले. चिखलदरा तालुक्यात कोहाना गावात जिल्हाधिकारी साैरभ कटियार व अधिकाऱ्यांची चमू पोहोचली. यावेळी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते या उपक्रमाचा श्रीगणेशा करण्यात आला. याप्रसंगी अतिरिक्त सीईओ संतोष जोशी, डेप्युटी सीईओ डॉ. कैलास घोडके, डीएचओ डॉ. सुरेश असोले उपस्थित होते. जिल्हाधिकारी थेट अंगणवाडी केंद्रात पोहोचले अन् तेथील आहाराबाबतची माहिती जाणून घेतली. याशिवाय रेशन दुकान जाऊन धान्य वितरण व्यवस्था चौकशी केली. सोबत ग्रामस्थासोबत संवाद साधून आदिवासी बांधवांच्या समस्या आस्थेने जाणून घेतल्या. यावर जिल्हाधिकारी यांनी योग्य कारवाईचे आश्वासन दिल्याने आदिवासी बांधवांमध्ये समाधान झाले.

टॅग्स :Amravatiअमरावती