शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
5
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
6
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
7
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
8
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
9
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
10
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
11
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
12
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
20
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग

कुणाला हवे घरकुल, कुणी म्हणतं पाणी द्या; प्रशासकीय यंत्रणेची मेळघाटात वारी

By जितेंद्र दखने | Updated: July 18, 2024 22:46 IST

जिल्हाधिकाऱ्यासह एचओडी पोहोचले आदिवासीच्या दारी

जितेंद्र दखने, अमरावती: कुणाला घरकुल नाही भेटले, तर कुणी म्हणतं पिण्यासाठी पाणी नाही. योजनांचा लाभ भेटत नसल्याची व्यथा मेळघाटातील आदिवासींनी मांडली. या बाबी प्रत्यक्ष जाणून घेण्यासाठी अधिकाऱ्यांची वारी मेळघाटातील आदिवासी बांधवांच्या दारी गुरुवारी पोहोचली. यानिमित्त जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी स्वत: थेट चिखलदरा व धारणी तालुक्यातील विविध गावात जाऊन प्रत्यक्ष आदिवासी बांधवांनी संवाद साधून त्यांच्या समस्या व अडचणी जाणून घेतल्या.

मेळघाटमध्ये विविध समस्या आहेत. त्या सोडवण्यासाठी शासन पातळीवर अनेक प्रयत्न केले जातात. तरीही महत्त्वाचे प्रश्न, समस्या, आदिवासी बांधवाच्या अडचणी तसेच राहून जातात. त्यामुळे मेळघाटातील विविध समस्या जाणून घेऊन ग्रामस्थ आणि प्रशासन यांच्यातील दरी कमी करण्यासाठी, त्याचबरोबर विविध समस्यांवर तोडगा काढण्यासाठी आणि महत्त्वाच्या समस्या प्रशासनाच्या लक्षात आणून देण्यासाठी जिल्हाधिकारी सौरभ कटियार आणि सीईओ संजिता मोहपात्रा यांच्या अध्यक्षतेखाली एक दिवस मेळघाटासाठी हा उपक्रम १८ जुलै रोजी अधिकाऱ्यांची वारी मेळघाटातील जनतेच्या आदी हा नावीण्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला.

या उपक्रमात वेगवेगळ्या विभागांचे अधिकारी मेळघाटातील विविध गावात पोहोचले. चिखलदरा तालुक्यात कोहाना गावात जिल्हाधिकारी साैरभ कटियार व अधिकाऱ्यांची चमू पोहोचली. यावेळी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते या उपक्रमाचा श्रीगणेशा करण्यात आला. याप्रसंगी अतिरिक्त सीईओ संतोष जोशी, डेप्युटी सीईओ डॉ. कैलास घोडके, डीएचओ डॉ. सुरेश असोले उपस्थित होते. जिल्हाधिकारी थेट अंगणवाडी केंद्रात पोहोचले अन् तेथील आहाराबाबतची माहिती जाणून घेतली. याशिवाय रेशन दुकान जाऊन धान्य वितरण व्यवस्था चौकशी केली. सोबत ग्रामस्थासोबत संवाद साधून आदिवासी बांधवांच्या समस्या आस्थेने जाणून घेतल्या. यावर जिल्हाधिकारी यांनी योग्य कारवाईचे आश्वासन दिल्याने आदिवासी बांधवांमध्ये समाधान झाले.

टॅग्स :Amravatiअमरावती