शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

भेटीगाठी, विजयी रॅली काहींची मुंबईवारी !

By admin | Updated: October 20, 2014 23:03 IST

१३ व्या विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या जिल्ह्यातील आठपैकी चार आमदारांनी विजयानंतरचा पहिला दिवस मतदारांच्या भेटीगाठीत घालविला. भाजपचे चार आमदार बैठकीसाठी मुंबईला रवाना झाले आहेत.

अमरावती : १३ व्या विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या जिल्ह्यातील आठपैकी चार आमदारांनी विजयानंतरचा पहिला दिवस मतदारांच्या भेटीगाठीत घालविला. भाजपचे चार आमदार बैठकीसाठी मुंबईला रवाना झाले आहेत.रविवारी निकाल जाहीर होताच नवनिर्वाचित आमदारांनी मतदारांचे भरुभरुन आभार मानले. मतमोजणी स्थळापासून विजयी रॅली काढली. मात्र, सोमवार उजाडताच पुन्हा विजयी आमदारांनी मतदारांचे अभिवादन स्वीकारले. तिवस्याच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी सकाळपासूनच मतदारसंघात भेटीगाठी घेतल्या. मतदारांचे आभार मानत असताना भविष्यात जोमाने विकासकामे केली जातील, असे आश्वासन दिले.ग्रामीण भागातही यशोमतींनी भेट देऊन मतदारांचे आशीर्वाद घेतले. गावखेड्यात यशोमतींच्या स्वागतासाठी युवकांची लक्षणीय गर्दी होती. विजयी रॅलीत महिलांनी प्रचंड जल्लोष केला.बडनेऱ्याचे आमदार रवी राणा यांनी सोमवारी सकाळपासूनच घरी येणाऱ्यांचे अभिवादन स्वीकारले. दुपारी शहरी भागात काही ठिकाणी त्यांनी भेटी दिल्या आणि मतदारांचे आभार मानले. नव्याने मतदारसंघातील विकासकामे पूर्णत्वास लावण्याचे अभिवचनही त्यांनी जनतेला दिले. स्लम वस्त्यांमध्ये जाऊन त्यांनी तेथील मतदारांचे आभार मानले. धामणगावरेल्वेचे आमदार वीरेंद्र गजताप यांनी नांदगाव खंडेश्वर येथे विजयी रॅली काढली. रॅलीनंतर सभा घेऊन मतदारांचे आभार मानले. दुपारी चांदूररेल्वे येथे घरीच जेवण घेतले. त्यानंतर मंगरुळ दस्तगिर येथील वीजेच्या धक्काने मरण पावलेल्या युवकाच्या कुटुंबाला भेट देऊन त्यांचे सांत्वन केले त्यानंतर देवदर्शन घेतले. व सायंकाळी मुंबईला रवाना झाले. अचलपुरचे आ. बच्चू कडू सकाळपासून मतदारांच्या भेटीगाठी घेण्यात मग्न होते. घरी येणाऱ्यांचे अभिवादन त्यांनी स्वीकारले. तसेच विकासकामांचा आढावाही घेतला. सायंकाळी मुंबईला रवाना होताना त्यांनी कार्यकर्त्यांना काही गावांना ेभेटी देण्याच्या सूचना दिल्या. आमदार सुनील देशमुख, अनिल बोंडे, रमेश बुंदेले, भिलावेकर पक्षाने बोलावलेल्या बैठकीसाठी मुंबईला गेले आहेत.