शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

भेटीगाठी, विजयी रॅली काहींची मुंबईवारी !

By admin | Updated: October 20, 2014 23:03 IST

१३ व्या विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या जिल्ह्यातील आठपैकी चार आमदारांनी विजयानंतरचा पहिला दिवस मतदारांच्या भेटीगाठीत घालविला. भाजपचे चार आमदार बैठकीसाठी मुंबईला रवाना झाले आहेत.

अमरावती : १३ व्या विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या जिल्ह्यातील आठपैकी चार आमदारांनी विजयानंतरचा पहिला दिवस मतदारांच्या भेटीगाठीत घालविला. भाजपचे चार आमदार बैठकीसाठी मुंबईला रवाना झाले आहेत.रविवारी निकाल जाहीर होताच नवनिर्वाचित आमदारांनी मतदारांचे भरुभरुन आभार मानले. मतमोजणी स्थळापासून विजयी रॅली काढली. मात्र, सोमवार उजाडताच पुन्हा विजयी आमदारांनी मतदारांचे अभिवादन स्वीकारले. तिवस्याच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी सकाळपासूनच मतदारसंघात भेटीगाठी घेतल्या. मतदारांचे आभार मानत असताना भविष्यात जोमाने विकासकामे केली जातील, असे आश्वासन दिले.ग्रामीण भागातही यशोमतींनी भेट देऊन मतदारांचे आशीर्वाद घेतले. गावखेड्यात यशोमतींच्या स्वागतासाठी युवकांची लक्षणीय गर्दी होती. विजयी रॅलीत महिलांनी प्रचंड जल्लोष केला.बडनेऱ्याचे आमदार रवी राणा यांनी सोमवारी सकाळपासूनच घरी येणाऱ्यांचे अभिवादन स्वीकारले. दुपारी शहरी भागात काही ठिकाणी त्यांनी भेटी दिल्या आणि मतदारांचे आभार मानले. नव्याने मतदारसंघातील विकासकामे पूर्णत्वास लावण्याचे अभिवचनही त्यांनी जनतेला दिले. स्लम वस्त्यांमध्ये जाऊन त्यांनी तेथील मतदारांचे आभार मानले. धामणगावरेल्वेचे आमदार वीरेंद्र गजताप यांनी नांदगाव खंडेश्वर येथे विजयी रॅली काढली. रॅलीनंतर सभा घेऊन मतदारांचे आभार मानले. दुपारी चांदूररेल्वे येथे घरीच जेवण घेतले. त्यानंतर मंगरुळ दस्तगिर येथील वीजेच्या धक्काने मरण पावलेल्या युवकाच्या कुटुंबाला भेट देऊन त्यांचे सांत्वन केले त्यानंतर देवदर्शन घेतले. व सायंकाळी मुंबईला रवाना झाले. अचलपुरचे आ. बच्चू कडू सकाळपासून मतदारांच्या भेटीगाठी घेण्यात मग्न होते. घरी येणाऱ्यांचे अभिवादन त्यांनी स्वीकारले. तसेच विकासकामांचा आढावाही घेतला. सायंकाळी मुंबईला रवाना होताना त्यांनी कार्यकर्त्यांना काही गावांना ेभेटी देण्याच्या सूचना दिल्या. आमदार सुनील देशमुख, अनिल बोंडे, रमेश बुंदेले, भिलावेकर पक्षाने बोलावलेल्या बैठकीसाठी मुंबईला गेले आहेत.