शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भाजपाने शंभरचा आकडा केला पार, काँग्रेस १९, ठाकरेंची शिवसेना ९; जाणून घ्या नगर पंचायत अन् नगर परिषदेचे निकाल
2
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
3
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
4
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
5
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
6
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
7
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
8
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
9
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
10
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
11
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
12
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
13
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
14
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
15
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
16
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
17
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
18
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
19
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
20
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
Daily Top 2Weekly Top 5

शेतीच्या सुरक्षेसाठी सौर विद्युत कुंपण

By admin | Updated: June 1, 2016 00:49 IST

सौर विद्युत कुंपण पद्धतीत प्राण्यांना मानसिकरीत्या भयभीत करून अडविण्यासाठी एक नियंत्रित व सुरक्षित असा विद्युतप्रवाह तारांमधून वाहत असतो.

अमरावती : सौर विद्युत कुंपण पद्धतीत प्राण्यांना मानसिकरीत्या भयभीत करून अडविण्यासाठी एक नियंत्रित व सुरक्षित असा विद्युतप्रवाह तारांमधून वाहत असतो. एखादा प्राणी या तारेच्या संपर्कात आला, की त्याला सुरक्षित झटका (शॉक) बसतो, त्यामुळे तो प्राणी या विद्युत कुंपणापासून लांब राहतो, या शॉकमुळे प्राण्यांचे शारीरिक नुकसान होत नाही. अशा रीतीने हे कुंपण प्राण्यांना केवळ शारीरिकदृष्ट्या नव्हे, तर मानसिकदृष्ट्या शेताजवळ येण्यास प्रतिबंधित करते. एकदा प्राण्यांच्या मानसिकतेवर परिणाम झाला, की ते कुंपणापासून दूर राहतात, अशावेळी काही काळासाठी वीजपुरवठा खंडित करून वीज बचत करता येते. ज्या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने तारेचे कुंपण अगोदरपासून उपलब्ध असेल, अशा ठिकाणी एका किंवा दोन तारांमध्ये विद्युत प्रवाह सोडून प्रभावी सौर विद्युत कुंपण प्रणाली विकसित करता येते.यामुळे ही विद्युत कुंपण प्रणाली अतिशय सुरक्षित व कार्यक्षम ठेवलेली आहे. अशा कुंपण पद्धतीमध्ये अलार्म बसविल्यास आणि कुंपणाच्या सानिध्यात एखादा प्राणी आल्यास तो लगेच वाजायला सुरुवात होते. सौर विद्युत कुंपणाच्या प्रकारानुसार त्यासाठी लागणारा संभाव्य खर्च थोडाफार कमी-अधिक होऊ शकतो. तो १२ व्होल्ट डी.सी. प्रवाह प्रत्येक १.२ सेकंदानंतर ०.०३ सेकंदासाठी सतत पाठवीत असतो.कुंपण घंटा : ही घंटा ज्ञानेंद्रिय पद्धतीवर काम करते. एखादा प्राणी कुंपण्याच्या संपर्कात आल्यास लगेच ही घंटा वाजायला सुरुवात होते.बॅटरी : १२ व्होल्ट ४२ अ‍ॅपियरची बॅटरी वापरली जाते. ती सौर पॅनेलने चार्ज करता येते.चार्जर : सोलर पॅनेलपासून तयार झालेल्या विद्युतप्रवाह बॅटरीमध्ये व्यवस्थितरीत्या साठवण्यासाठी आणि येणारा विद्युतप्रवाह नियंत्रित करण्यासाठी याचा वापर केला जातो.खांब : खांब हे लाकडाचे, सिमेंटचे किंवा लोखंडापासून बनविलेले असतात. शक्यतो जास्त काळ यंत्रणा टिकून राहावी याचा विचार करूनच खांब खरेदी करावेत. साधारणत: त्यांची उंची ५ फुट एवढी असावी आणि आवश्यकतेनुसार जाडी ठेवावी.कुंपण तारा : कुंपण तारा साधारणत: २.५ मि.मी जाडीची, धातूपासून बनविलेली असते, ती गजू नये यासाठी त्यावर जास्ताचे आवरण दिले जाते.- सदानंद देशपांडे,श्रीनिवास इरिगेशन सर्व्हिसेस,अमरावती