शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
2
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
3
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
4
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
5
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
6
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
7
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
8
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
9
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
10
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
11
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
12
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
13
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
14
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
15
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
16
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
18
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
19
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
20
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर

माती परीक्षण होणार दारात, शेतकऱ्यांना दिलासा

By admin | Updated: February 28, 2017 00:09 IST

जिल्हास्तरावर एक वा दोन मृदा तपासणी प्रयोगशाळा असल्याने शेतकऱ्यांना तेथे जाणे शक्य होत नाही, ...

प्रत्येक तालुक्यात प्रयोगशाळा : कृषी विभाग घेणार ‘पोर्टेबल’ मृदा चाचणी यंत्रअमरावती : जिल्हास्तरावर एक वा दोन मृदा तपासणी प्रयोगशाळा असल्याने शेतकऱ्यांना तेथे जाणे शक्य होत नाही, यासाठी कृषी विभाग शेतकऱ्यांच्या दारातच प्रयोगशाळा पोहोचविणार आहे. यासाठी निर्माण ‘पोर्टेबल’ मृदा चाचणी यंत्राची मदत घेतली जाणार आहे. येत्या वर्षात शेतकऱ्यांना त्यांच्या गावात, तालुक्यात मातीची तपासणी करणे शक्य होणार आहे.मातीमध्ये दिवसेंदिवस कमी होत असलेली पोषक मुल्याची कमतरतेमुळे उत्पादनात कमी येत आहे. त्यामुळे शेतकरी बेसुमार रासायनिक खतांचा वापर करतो यामुळे जमिनीचे आरोग्य आणखी बिघडते. पिकांना हवे ते अन्नघटक मातीतून न मिळाल्याने दिवसेंदिवस उत्पन्न कमी होत आहे. मातीमध्ये कोणत्या अन्नद्रव्याची कमी आहे, यासाठी प्रत्येक जिल्ह्यात मृदा सर्वेक्षण व चाचणी प्रयोगशाळा उभारण्यात आल्या आहेत. सद्या राज्यात अशा एकूण २९ प्रयोगशाळा आहेत. जिल्ह्यांचा विस्तार होत असल्याने अनेकदा या ठिकाणी मातीचे नमुने जिल्हास्तरीय प्रयोगशाळेत घेऊन जाणे शक्य होत नाही. त्यामुळे शेतामधील मातीत कशाची कमतरता आहे, याची माहिती शेतकऱ्यांना होत नाही. ही अडचण लक्षात घेऊन कृषी विभाग आता पुढे सरसावला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून काही खासगी कंपन्यांद्वारा कोठेही नेता येणाऱ्या (पोर्टेबल) माती परिक्षण मशीन्स बनविल्या आहेत त्यामुळे हे तंत्रज्ञान वापरण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे. या मशीन्स ७५ हजार रुपयापर्यंत उपलब्ध आहेत व आर्थिकदृष्ट्या परवडणाऱ्या असल्यामुळे प्रत्येक तालुकास्तरावर या मशीन्स बसविण्यात येणार आहे. याबाबतची बैठक मागील वर्षी पुणे येथे पार पडली व याविषयीचा निर्णय घेण्यात आला आहे. (प्रतिनिधी)- म्हणून माती परीक्षण आवश्यकजमिनीची सुपिकता व उत्पादकता या दोन्ही महत्त्वाच्या बाबी उत्पादन वाढीसाठी महत्त्वाच्या आहे. रासायनिक खतांची अवाजवी व असंतुलीत वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सिंचनासाठी जमीन सतत पाण्याखाली राहणे, यामुळे मातीचे आरोग्य दिवसेंदिवस खराब होत आहे. त्यामुळे पिकांची वाढ खुंटने, उत्पादनात कमी येणे या बाबी प्रकर्षाने समोर आल्या आहेत. म्हणून पेरणीपूर्व जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्ये जाणून घेणे व त्यानुसार आवश्यक अन्नद्रव्यांचा पुरवठा करणे महत्वाचा आहे.माती नमुना घेण्याच्या पद्धतीवर यश अवलंबूनमाती परीक्षणाचे महत्त्व, त्याची सत्यता, त्यापासून मिळणारे फायदे हे शेतातील मातीचा नमुना पद्धतीवर अवलंबून आहे. चुकीच्या पद्धतीने नमुना घेतल्यास माती परीक्षणाच्या इतर पैलुचे महत्त्व कमी होते. त्यापासून अपेक्षित फायदा मिळत नाही. त्यामुळे मातीचा नमुना शास्त्रीय पद्धतीनेच होणे हितावह आहे.नियोजन समितीकडे देणार प्रस्तावजिल्हा नियोजन समितीच्या निधींतर्गत या मशीन्स घेण्याविषयी कृषी विभागाचा खल सुरू आहे. सोईचे व्हावे, यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या नियोजन समितीकडे कृषी विभागाद्वारा प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती आहे.