शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

माती परीक्षण होणार दारात, शेतकऱ्यांना दिलासा

By admin | Updated: February 28, 2017 00:09 IST

जिल्हास्तरावर एक वा दोन मृदा तपासणी प्रयोगशाळा असल्याने शेतकऱ्यांना तेथे जाणे शक्य होत नाही, ...

प्रत्येक तालुक्यात प्रयोगशाळा : कृषी विभाग घेणार ‘पोर्टेबल’ मृदा चाचणी यंत्रअमरावती : जिल्हास्तरावर एक वा दोन मृदा तपासणी प्रयोगशाळा असल्याने शेतकऱ्यांना तेथे जाणे शक्य होत नाही, यासाठी कृषी विभाग शेतकऱ्यांच्या दारातच प्रयोगशाळा पोहोचविणार आहे. यासाठी निर्माण ‘पोर्टेबल’ मृदा चाचणी यंत्राची मदत घेतली जाणार आहे. येत्या वर्षात शेतकऱ्यांना त्यांच्या गावात, तालुक्यात मातीची तपासणी करणे शक्य होणार आहे.मातीमध्ये दिवसेंदिवस कमी होत असलेली पोषक मुल्याची कमतरतेमुळे उत्पादनात कमी येत आहे. त्यामुळे शेतकरी बेसुमार रासायनिक खतांचा वापर करतो यामुळे जमिनीचे आरोग्य आणखी बिघडते. पिकांना हवे ते अन्नघटक मातीतून न मिळाल्याने दिवसेंदिवस उत्पन्न कमी होत आहे. मातीमध्ये कोणत्या अन्नद्रव्याची कमी आहे, यासाठी प्रत्येक जिल्ह्यात मृदा सर्वेक्षण व चाचणी प्रयोगशाळा उभारण्यात आल्या आहेत. सद्या राज्यात अशा एकूण २९ प्रयोगशाळा आहेत. जिल्ह्यांचा विस्तार होत असल्याने अनेकदा या ठिकाणी मातीचे नमुने जिल्हास्तरीय प्रयोगशाळेत घेऊन जाणे शक्य होत नाही. त्यामुळे शेतामधील मातीत कशाची कमतरता आहे, याची माहिती शेतकऱ्यांना होत नाही. ही अडचण लक्षात घेऊन कृषी विभाग आता पुढे सरसावला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून काही खासगी कंपन्यांद्वारा कोठेही नेता येणाऱ्या (पोर्टेबल) माती परिक्षण मशीन्स बनविल्या आहेत त्यामुळे हे तंत्रज्ञान वापरण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे. या मशीन्स ७५ हजार रुपयापर्यंत उपलब्ध आहेत व आर्थिकदृष्ट्या परवडणाऱ्या असल्यामुळे प्रत्येक तालुकास्तरावर या मशीन्स बसविण्यात येणार आहे. याबाबतची बैठक मागील वर्षी पुणे येथे पार पडली व याविषयीचा निर्णय घेण्यात आला आहे. (प्रतिनिधी)- म्हणून माती परीक्षण आवश्यकजमिनीची सुपिकता व उत्पादकता या दोन्ही महत्त्वाच्या बाबी उत्पादन वाढीसाठी महत्त्वाच्या आहे. रासायनिक खतांची अवाजवी व असंतुलीत वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सिंचनासाठी जमीन सतत पाण्याखाली राहणे, यामुळे मातीचे आरोग्य दिवसेंदिवस खराब होत आहे. त्यामुळे पिकांची वाढ खुंटने, उत्पादनात कमी येणे या बाबी प्रकर्षाने समोर आल्या आहेत. म्हणून पेरणीपूर्व जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्ये जाणून घेणे व त्यानुसार आवश्यक अन्नद्रव्यांचा पुरवठा करणे महत्वाचा आहे.माती नमुना घेण्याच्या पद्धतीवर यश अवलंबूनमाती परीक्षणाचे महत्त्व, त्याची सत्यता, त्यापासून मिळणारे फायदे हे शेतातील मातीचा नमुना पद्धतीवर अवलंबून आहे. चुकीच्या पद्धतीने नमुना घेतल्यास माती परीक्षणाच्या इतर पैलुचे महत्त्व कमी होते. त्यापासून अपेक्षित फायदा मिळत नाही. त्यामुळे मातीचा नमुना शास्त्रीय पद्धतीनेच होणे हितावह आहे.नियोजन समितीकडे देणार प्रस्तावजिल्हा नियोजन समितीच्या निधींतर्गत या मशीन्स घेण्याविषयी कृषी विभागाचा खल सुरू आहे. सोईचे व्हावे, यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या नियोजन समितीकडे कृषी विभागाद्वारा प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती आहे.