शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
2
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
3
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
4
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
5
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
7
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
8
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती
9
"कमेंट्समध्ये ट्रोल करतात अन् पर्सनल मेसेजमध्ये लोक...", राजेश्वरी खरातने व्यक्त केला राग
10
विमान अपघातापासून बॉलिवूडच्या सुपरस्टारचा थोडक्यात वाचलेला जीव, काय घडलेलं?
11
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
12
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
13
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
14
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
15
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
16
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
17
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
18
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
19
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
20
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!

काँक्रीट रस्त्यावर मुरूमऐवजी माती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 23:28 IST

तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामात मुरुमाऐवजी मातीचा अतिवापर केला जात आहे. वापरण्यात येणारी पिवळी माती ही रंगाने पिवळी असून, ती बांधकामासाठी उपयोगी नाही, असे स्थनिक नागरिकांचे मत आहे.

ठळक मुद्देबांधकामाचा दर्जा खालावला : नागरिकांकडून उपस्थित होतोय प्रश्न

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर बाजार : तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामात मुरुमाऐवजी मातीचा अतिवापर केला जात आहे. वापरण्यात येणारी पिवळी माती ही रंगाने पिवळी असून, ती बांधकामासाठी उपयोगी नाही, असे स्थनिक नागरिकांचे मत आहे. माती चोपण असल्यामुळे मुरुमाला पर्याय ठरू शकत नाही. तरीही काँक्रीट रस्त्याच्या बांधकामात मुरूमाऐवजी मातीचा वापर का, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.सदर महामार्गावरील बहुतांश जमीन काळी व चोपण असल्याने येथील डांबरी रस्ते वारंवार खराब होण्याचा आजवरचा अनुभव बांधकाम विभागाच्या पाठीशी आहे. तरीदेखील हीच पिवळी चोपण माती रस्त्याच्या बांधकामासाठी वापरण्याचे प्रयोजन का, हेच सामान्य नागरिकांना कळेनासे झाले आहे. महामार्गाचे बांधकाम पक्के होण्यासाठी बांधकामात मुरुमाचा वापर करणेच योग्य आहे. तालुक्यात मुरुम मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतानाही बांधकामासाठी पिवळी माती वापरण्यास एचजी इन्फ्रा कंपनी आग्रही का? याकडे संबंधित विभागाच्या शासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष का, हे न सुटणारे कोडेच आहे.रस्त्याचा बांधकामासाठी वापरण्यात येणाºया चोपण मातीचा विशेष गुण म्हणजे या मातीत ओलावा असेपर्यंतच घट्ट पकड ठेवणारी ही माती आहे. कोरडेपणा सुरू होताच ही माती धसल्या सुरुवात होऊन धुळीत परिवर्तीत होण्याचा या मातीचा विशेष गुणधर्म आहे. यामुळेच परिसरातील शेतकरी आपल्या शेतात विहीर खोदण्यासही पुढे येत नाही. ही माती रस्त्यावरील वाहनांचे वजन सांभाळणार कशी? रस्त्याचा बांधकामासाठी जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभाग कंत्राटदारांना मुरुमाचाच अधिक वापर करायला लावतात. मग हा नियम महामार्गाच्या बांधकामात का लागू होत नाही, असा प्रश्नदेखील उपस्थित केला जात आहे.तालुक्यातील पिवळी माती ही निष्क्रिय चोपण माती असल्याने ती रस्ता बांधकामासाठी वापरणे अयोग्य आहे. या मातीचे धुळीत रूपांतर होते. त्याचा नागरिकांना त्रास होतो.- विनोद जवंजाळ,संचालक, कृषिउत्पन्न बाजारसदर माती बांधकामात उपयुक्त असल्याचे प्रमाणपत्र संबंधित माती परीक्षण विभागाने दिल्यामुळेच ही माती रस्त्याच्या बांधकामात वापरली जात आहे- ऋषिकेश हजारे,उपअभियंता, राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागचोपण मातीत काँक्रीटच्या विहिरीही खचत असल्याचा अनुभव तालुक्यातील शेतकºयांचा पाठीशी आहे. मग या मातीवरील काँक्रीटचा रास्ता कायमस्वरूपी कसा टिकेल?- मदन देशमुख, शेतकरी