शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
2
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
3
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
4
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
5
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
6
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
7
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
8
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
9
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
10
भाजपा नगसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
11
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
12
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
13
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
14
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
15
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
16
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
17
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
18
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना
19
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
20
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?

माती होतेय वांझ !

By admin | Updated: February 26, 2017 00:04 IST

पीक उत्पादनवाढीसाठी शेतजमिनीचा पोत हा नैसर्गिक घटक आहे. यासाठी जमिनीची सुपीकता हा घटक महत्त्वाचा ठरतो.

नियमित परीक्षण महत्त्वाचे : जमिनीचा पोत सुधारणे आवश्यकअमरावती : पीक उत्पादनवाढीसाठी शेतजमिनीचा पोत हा नैसर्गिक घटक आहे. यासाठी जमिनीची सुपीकता हा घटक महत्त्वाचा ठरतो. मात्र. अलीकडे उत्पादनवाढीसाठी बेसुमार रासायनिक खतांचा वापर होत आहे. तिहेरी पीक घेण्यासाठी संकल्पना अलीकडेच रूजल्याने जमिनी सतत पाण्याखाली राहते. यामुळे जमिनीचे आरोग्य बिघडत चालले आहे. दिवसेंदिवस जमिनीची उत्पादकता कमी होऊन जमीन वांझ होत आहे. अधिक उत्पादनवाढीसाठी शेतकऱ्यांद्वारा बेसुमारपणे रासायनिक खतांचा वापर केला. कीटकनाशकांची फवारणी अधिक होत आहे. मात्र मातीचे परीक्षण करून कमी असलेल्या घटकाचा वापर करीत आधुनिक पद्धतीने शेती करणे आवश्यक आहे. जमिनीच्या पुनरुज्जीवनासोबत संवर्धनासाठी वास्तविकता जैविक घटकांचा वापर करणे महत्त्वाचे आहे. मात्र तसे होत नसल्याने उत्पादन वाढीसाठी भविष्यातील शेती मात्र साथ देणार नाही, अशी स्थिती आहे. खतांचा बेसुमार वापर धोक्याचाअमरावती : मातीचा पोत सुधारण्यासह आधुनिक पद्धतीत परंपरागत शेती पद्धतीची जोड देणे महत्त्वाचे आहे व हे आव्हान अलीकडेच शेतकऱ्यांना जाणवू लागले आहे. वास्तविकता माती ही एक प्रकारची जैविक संरचना आहे. मातीमध्ये अनेक सूक्ष्म जीव असतात. जे हवेतून नत्र व सूक्ष्म अन्नाचे तत्त्व घेऊन मातीला सुपीक करीत असतात. गांढूळासारखे जीवदेखील मातीची गुणवत्ता वाढवीत असतात. मात्र, रासायनिक खतांच्या बेसुमार वापरामुळे मातीची जैविक संरचना बिघडली आहे. मातीचे नैसर्गिक गुणधर्म कमी होऊन काही ठिकाणी माती वांझ झाली आहे. काही ठिकाणी सतत रासायनिक खतांचा वापर अधिक होत असला तरी मातीचे गुणधर्म लोप पावल्याने उत्पादनवाढीमध्ये मात्र उत्पादकता स्थिर झालेली नाही. देशी वाणात रोग प्रतिकारक क्षमता असते व रोगास कमी बळी पडतात. मात्र, रासायनिक खते व कीटकनाशकांच्या बेसुमार वापरामुळे पिकांची रोग प्रतिबंधक क्षमता कमी होत आहे. कीड रोगांची क्षमता वाढली. येथील मातीचा नमुना घेऊ नयेमाती परीक्षणासाठी शेतात झाडाखालील, विहीरीजवळील, निवास स्थानाजवळ, जनावरे बसण्याची जागा, पाणी साचत असलेले भाग या ठिकाणच्या मातीचा नमुना घेऊ नये व मातीचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यासाठी रासायनिक खतांच्या रिकाम्या थैलीचा वापर करू नये, पॉलिथीन किंवा कापडी पिशवीत नमुना घेणे महत्वाचा आहे. नियमित पाणी परीक्षण, समृद्धीचे लक्षणजमिनीची रासायनिक व भौतिक तपासणी करणे गरजेचे आहे. यामध्ये जमिनीचा सामू (पी.एच.), विद्राव्य क्षारांचे प्रमाण, सेंद्रीय कर्ब, उपलब्ध नत्र, स्फूरद, पालाश याचे गुणधर्म तपासणीसाठी मातीचे परीक्षण आवश्यक आहे व त्यानुसार सेंद्रीय रासायनिक खतांचा वापर केल्यास पिकांची उत्पादकता वाढते.नमुना घेण्याच्या पद्धतीवर परीक्षणाचे यश अवलंबूनमाती परीक्षणाचे महत्व त्याची सत्यता व त्यापासून मिळणारे फायदे मुख्यत: शेतातील मातीचा नमुना घेण्याचे पद्धतीवर अवलंबून आहे. मातीचा नमुना चुकीच्या पद्धतीने घेतल्यास परीक्षणाच्या इतर पैलूचे महत्त्व कमी होते व त्यापासून अपेक्षित फायदा होत नाही. त्यामुळे मातीचा नमुना शास्त्रीय पद्धतीने घेणे महत्त्वाचे आहे.जैविक श्रुंखला बाधितरासायनिक खतांच्या अधिक वापरामुळे जमिनीची पाणी धरण करण्याची क्षमता कमी होत आहे. कीटकनाशकाच्या अतिवापरामुळे जैविक श्रुंखलाच बाधित झाली आहे. माणसांसह सर्व गुरांमध्ये याचा अंश पोहोचतो. अगदी आईच्या दुधातदेखील कीटकनाशकांचे अंश आढळल्याचे निष्कर्ष जैविक विभागाच्या संशोधनात आढळून आले आहेत. क्षारतेच्या प्रमाणात वाढबागायती शेतीमध्ये सिंचनासाठी सतत पाळीद्वारे पाणी दिले जात असल्याने जमिनीतील क्षार वाढली आहे. पाणी साठणे, दलदल होणे याचा थेट परिणाम जमिनीच्या आरोग्यावर होतो. कीटकनाशकाची फवारणी केल्यानंतर पाण्याद्वारे या विषाचे अंश नदिनाल्यात पाहोचतात. तसेच कीटकनाशकांचा परिणाम हवेमुळे वातावरणातदेखील पोहोचतो.