शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने भारताच्या आरोपावर प्रश्न विचारला, अन् ट्रम्प यांचे तोंड बंद झाले...
2
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
3
प्रियकरासोबत संबंध बनवताना प्रायव्हेट पार्टला इजा; महिलेने मुंबई पोलिसांना गंडवलं, सत्य भलतेच निघाले
4
वाहन विमा नाही? मग भरा पाचपट दंड...! ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणासाठीही नवीन अटी
5
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा
6
फक्त रशियचां तेल नाही, तर 'या' ३ कारणामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा तिळपापड; भारताला पुन्हा धमकी
7
'पाच महिन्यात पाच युद्ध थांबवली आता...'; ट्रम्प यांनी पुन्हा घेतले भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय
8
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
9
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
10
हिंगोली रेल्वेस्टेशनवरील उभ्या बोगीला आग; संपूर्णतः जळून खाक
11
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
12
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
13
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
14
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
15
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
16
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
17
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
18
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
19
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
20
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान

‘सोफिया’ने आदेश झुगारला

By admin | Updated: March 23, 2016 00:17 IST

नांदगाव पेठ पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत साकारण्यात आलेले पूर्वीचे सोफिया आणि आताच्या रतन इंडिया औष्णिक वीज प्रकल्पाने २७ शेतकऱ्यांवर अन्याय चालविला आहे

२७ शेतकऱ्यांवर अन्याय : एमआयडीसी प्रधान सचिवांच्या पत्राला बगलअमरावती : नांदगाव पेठ पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत साकारण्यात आलेले पूर्वीचे सोफिया आणि आताच्या रतन इंडिया औष्णिक वीज प्रकल्पाने २७ शेतकऱ्यांवर अन्याय चालविला आहे. एमआयडीसीच्या प्रधान सचिवांनी प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी अधिग्रहित करण्याचे आदेश दिले असताना या आदेशाची अंमलबजावणी वीज प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी केली नाही. त्यामुळे अन्यायग्रस्त शेतकरी न्यायासाठी जिल्हाकचेरीवर येरझारा मारत आहेत.सोफिया वीज प्रकल्पाने कोळसा वाहतुकीसाठी रेल्वे ट्रॅक निर्माण केला. त्याकरिता १९० शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित केल्यात. मात्र, रेल्वे ट्रॅक पूर्ण झाल्यानंतर २० आर. पेक्षा अधिक जमिनींच्या अधिग्रहणास सोफियाने नकार दिला. २० आर.पेक्षा अधिक जमिनीवर कोणतेही पीक घेता येत नाही. कारण, रेल्वे ट्रॅकसाठी वलगाव ते वाघोली दरम्यानच्या अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेण्यात आल्या होत्या. रेल्वे ट्रॅक निर्मितीसाठी आवश्यक जमीन सोफियाने ताब्यात घेतली. मात्र, २० आर. पेक्षा अधिक जमीन घेण्यास सोफियाने चक्क नकार दिला. ही बाब अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी पालकमंत्री प्रवीण पोटे, जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या दरबारात मांडली. याप्रकरणात सत्यता तपासण्यात आली. ज्यावेळी रेल्वे ट्रॅक निर्मितीसाठी जमीन अधिग्रहित करण्यात आली तेव्हा एमआयडीसी, जिल्हाधिकारी व सोफिया वीज कंपनीत संयुक्त करार झाला होता. २० आर. पेक्षा अधिक जमीन शिल्लक राहिल्यास ती जमीन सोफिया खरेदी करेल, असे ठरविण्यात आले होते. मात्र, रेल्वे ट्रॅकसाठी जमीन अधिग्रहित केल्यानंतर २७ शेतकऱ्यांजवळ २२ ते २९ आर.पर्यंत जमीन शिल्लक राहिली आहे. जमिनीच्या या छोट्या तुकड्यावर पेरणी करता येत नाही. त्यामुळे ही जमीन सोफिया वीज कंपनीने अधिग्रहित करावी, अशी मागणी प्रकल्पग्रस्त २७ शेतकऱ्यांनी केली होती.रक्कम जमा करण्याचे आदेशअमरावती : महसूल विभागाने या जमिनीचे सर्वेक्षण करून ती पेरणी योग्य नसल्याचा विशेष प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. यानुसार एमआयडीसी प्रधान सचिवांनी २९ सप्टेंबर२०१५ रोजी सोफियाला पत्राद्वारे जमीन अधिग्रहणासाठी १ कोटी ४७ लाख रुपये जमा करण्याचे आदेश दिले होते. परंतु अजूनही सोफिया वीज कंपनीने २७ शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहणासाठी महसूल विभागाकडे रक्कम अदा केली नाही. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयानेसुद्धा वारंवार पत्रव्यवहार केला आहे. मात्र, या निकामी ठरलेल्या जमिनीचा मोबदला मिळावा, यासाठी २७ प्रकल्पग्रस्त शेतकरी न्यायासाठी पायपीट करीत आहेत. (प्रतिनिधी)-ही तर चक्क फसवणूकसोफिया औष्णिक वीज प्रकल्प स्थापन होताना शेतकऱ्यांना मोठे स्वप्न दाखविण्यात आले होते. जिल्ह्यात रोजगाराचे साधन उपलब्ध होईल, याकरिता शेतकऱ्यांनी वीज प्रकल्पासाठी जमिनी दिल्यात. मात्र, रेल्वे ट्रॅक तयार करताना २० आर. पेक्षा अधिक जमीन शिल्लक राहिल्यास ती खरेदी करण्यास नकार देणे म्हणजे शुद्ध फसवणूक होय, असे अन्यायग्रस्त शेतकरी रामेश्वर अभ्यंकर हे ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले.२७ शेतकऱ्यांच्या २० आर.पेक्षा अधिक शिल्लक जमिनी खरेदी करण्यासाठी सोफिया वीज प्रकल्पाला नोटीसद्वारे अवगत केले होते. याप्रकरणी एमआयडीसी प्रधान सचिवांचे आदेश होेते. अद्याप याप्रकरणी तोडगा निघालेला नाही.- सुरेश बगळे, तहसीलदार, अमरावती.