शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

‘सोफिया’मुळे रस्त्यांवर खड्ड्यांचे जाळे!

By admin | Updated: October 30, 2014 22:44 IST

नांदगाव पेठ येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत साकारण्यात आलेल्या इंडिया बुल्स कंपनीच्या सोफिया औष्णिक वीज प्रकल्पात वलगाव येथून दरदिवसाला शंभराहून अधिक ट्रकमधून कोळशाची वाहतूक होते.

अमरावती : नांदगाव पेठ येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत साकारण्यात आलेल्या इंडिया बुल्स कंपनीच्या सोफिया औष्णिक वीज प्रकल्पात वलगाव येथून दरदिवसाला शंभराहून अधिक ट्रकमधून कोळशाची वाहतूक होते. या ओव्हरलोड वाहतुकीमुळे हा रस्ता पूर्णपणे उखडला आहे. सतत रस्ता दुरुस्ती करावी लागत असल्याने रेल्वे प्रशासनही हतबल झाले आहे.सोफियामध्ये वीज निर्मिती सुरु झाली आहे. यासाठी लागणारा कोळसा वलगाव रेल्वेस्थानकावर मालगाडीने आणला जातो. कोळसा रेल्वे स्थानकावर उतरविल्यानंतर तो ट्रकव्दारे वलगाव येथून नांदगाव पेठ येथील सोफिया औष्णिक वीज प्रकल्पात पोहोचविला जातो. मात्र, ज्या मार्गावरुन हा कोळसा नेला जातो तो रस्ता सततच्या अवजड वाहतुकीमुळे ठिकठिकाणी उखडला आहे. ही बाब रेल्वे प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांच्या नजरेसही आणून दिली. मात्र, वाहतुकीवर अंकुश लागलेला नाही. वलगाव रेल्वे स्थानकावरुन ट्रकमध्ये कोळसा भरला की तो पुढे रिंगरोडवर चांदूरबाजार मार्गे नांदगाव पेठ एमआयडीसीकडे पाठविला जातो. या गंभीर प्रकाराकडे प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी लक्षच देत नाहीत, असे रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. अमरावती ते अचलपूर मार्गावर वलगावनजीक रेल्वे पुलाचे बांधकाम सुरु आहे. सततच्या ओव्हरलोड वाहतुकीमुळे तात्पुरत्या स्वरूपात तयार केलेला वळण रस्ता नादुरुस्त झाला आहे. यापूर्वी चार ते पाच वेळा हा वळण रस्ता तयार करण्यात आला. मात्र, काही दिवसांनंतर हा रस्ता पुन्हा जैसे थे होतो.वळण रस्त्याच्या दुरुस्तीसाठी रेल्वेकडे आर्थिक तरतूद नसल्याने हा वळण रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करता येत नसल्याची माहिती आहे. यापूर्वी रेल्वेच्या बांधकाम कंत्राटदाराने दोनदा या रस्त्याची दुरुस्ती केली. मात्र, ओव्हरलोड वाहतूक कमी करण्यासाठी प्रशासन मदत करीत नसल्याने सोफिया औष्णिक वीज प्रकल्पात कोळसा वाहतूक करणाऱ्या कंत्राटदारांचे फावत आहे. वलगाव रेल्वे स्थानक परिसराला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याची ओव्हरलोड ट्रक वाहतुकीमुळे अक्षरश: चाळणी झाली असताना ही बाब इंडिया बुल्स कंपनीचे अधिकारी गांभिर्याने घेत नाहीत, हे खरे आहे. पावसाळ्यापूर्वीच लाखो रुपये खर्चून वलगाव रेल्वे स्थानक मार्ग आणि अचलपूर मार्गावरील रेल्वे पूलाचे बांधकाम करण्यात आले. वळण मार्गाची दुरुस्ती करण्यात आली. मात्र, अवजड वाहतुकीमुळे या रस्त्यांची पूरती वाट लागली आहे. क्षमतेपेक्षा जास्त कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकांविरुद्ध कारवाईची मागणी रेल्वे प्रशासनाने केली आहे. या मार्गावरील अपघातांची वाढती संख्या लक्षात घेता या रस्त्यावरील कोळशाची ओव्हरलोड वाहतूक बंद करणे अत्यंत गरजेचे असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.