शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

‘सोफिया’मुळे रस्त्यांवर खड्ड्यांचे जाळे!

By admin | Updated: October 30, 2014 22:44 IST

नांदगाव पेठ येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत साकारण्यात आलेल्या इंडिया बुल्स कंपनीच्या सोफिया औष्णिक वीज प्रकल्पात वलगाव येथून दरदिवसाला शंभराहून अधिक ट्रकमधून कोळशाची वाहतूक होते.

अमरावती : नांदगाव पेठ येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत साकारण्यात आलेल्या इंडिया बुल्स कंपनीच्या सोफिया औष्णिक वीज प्रकल्पात वलगाव येथून दरदिवसाला शंभराहून अधिक ट्रकमधून कोळशाची वाहतूक होते. या ओव्हरलोड वाहतुकीमुळे हा रस्ता पूर्णपणे उखडला आहे. सतत रस्ता दुरुस्ती करावी लागत असल्याने रेल्वे प्रशासनही हतबल झाले आहे.सोफियामध्ये वीज निर्मिती सुरु झाली आहे. यासाठी लागणारा कोळसा वलगाव रेल्वेस्थानकावर मालगाडीने आणला जातो. कोळसा रेल्वे स्थानकावर उतरविल्यानंतर तो ट्रकव्दारे वलगाव येथून नांदगाव पेठ येथील सोफिया औष्णिक वीज प्रकल्पात पोहोचविला जातो. मात्र, ज्या मार्गावरुन हा कोळसा नेला जातो तो रस्ता सततच्या अवजड वाहतुकीमुळे ठिकठिकाणी उखडला आहे. ही बाब रेल्वे प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांच्या नजरेसही आणून दिली. मात्र, वाहतुकीवर अंकुश लागलेला नाही. वलगाव रेल्वे स्थानकावरुन ट्रकमध्ये कोळसा भरला की तो पुढे रिंगरोडवर चांदूरबाजार मार्गे नांदगाव पेठ एमआयडीसीकडे पाठविला जातो. या गंभीर प्रकाराकडे प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी लक्षच देत नाहीत, असे रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. अमरावती ते अचलपूर मार्गावर वलगावनजीक रेल्वे पुलाचे बांधकाम सुरु आहे. सततच्या ओव्हरलोड वाहतुकीमुळे तात्पुरत्या स्वरूपात तयार केलेला वळण रस्ता नादुरुस्त झाला आहे. यापूर्वी चार ते पाच वेळा हा वळण रस्ता तयार करण्यात आला. मात्र, काही दिवसांनंतर हा रस्ता पुन्हा जैसे थे होतो.वळण रस्त्याच्या दुरुस्तीसाठी रेल्वेकडे आर्थिक तरतूद नसल्याने हा वळण रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करता येत नसल्याची माहिती आहे. यापूर्वी रेल्वेच्या बांधकाम कंत्राटदाराने दोनदा या रस्त्याची दुरुस्ती केली. मात्र, ओव्हरलोड वाहतूक कमी करण्यासाठी प्रशासन मदत करीत नसल्याने सोफिया औष्णिक वीज प्रकल्पात कोळसा वाहतूक करणाऱ्या कंत्राटदारांचे फावत आहे. वलगाव रेल्वे स्थानक परिसराला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याची ओव्हरलोड ट्रक वाहतुकीमुळे अक्षरश: चाळणी झाली असताना ही बाब इंडिया बुल्स कंपनीचे अधिकारी गांभिर्याने घेत नाहीत, हे खरे आहे. पावसाळ्यापूर्वीच लाखो रुपये खर्चून वलगाव रेल्वे स्थानक मार्ग आणि अचलपूर मार्गावरील रेल्वे पूलाचे बांधकाम करण्यात आले. वळण मार्गाची दुरुस्ती करण्यात आली. मात्र, अवजड वाहतुकीमुळे या रस्त्यांची पूरती वाट लागली आहे. क्षमतेपेक्षा जास्त कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकांविरुद्ध कारवाईची मागणी रेल्वे प्रशासनाने केली आहे. या मार्गावरील अपघातांची वाढती संख्या लक्षात घेता या रस्त्यावरील कोळशाची ओव्हरलोड वाहतूक बंद करणे अत्यंत गरजेचे असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.