शहरं
Join us  
Trending Stories
1
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
2
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
3
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
4
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
5
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
6
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
7
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा
8
Nashik Crime: टोळी संघर्षातून गोळीबार, भाजप नेत्यानंतर म्होरक्या विकी वाघसह साथीदार अडकला जाळ्यात
9
रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवण्यामागचं 'गंभीर' कनेक्शन; जाणून घ्या सविस्तर
10
Rape Case: पार्टीसाठी बोलावलं, शिक्षकेवर चार जीम ट्रेनर्संनी केला सामूहिक बलात्कार; आरोपींची नावे आली समोर
11
रशियाकडून पाकिस्तानला फायटर जेट इंजिनचा पुरवठा? काँग्रेसच्या दाव्यावर भाजपचा पलटवार...
12
आधार अपडेटसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय, देशभरातील 6 कोटी मुलांना होणार फायदा
13
Nashik Kumbh Mela: सिंहस्थ कुंभमेळ्यात 'गुगल' दाखवणार गर्दीतून वाट; अडीच हजार CCTV ची शहरावर नजर
14
गुडन्यूज! ५८व्या वर्षी दुसऱ्यांदा बाबा झाला अरबाज खान, पत्नी शूराने दिला गोंडस बाळाला जन्म
15
पश्चिम बंगालमध्ये पावसाचा हाहाकार, दार्जिलिंगमध्ये पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू; बघा Video 
16
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
17
पेट्रोलची चिंता मिटली! 2026 मध्ये येणार मारुतीची पहिली फ्लेक्स-फ्युएल कार, जाणून घ्या डिटेल्स...
18
गेल्या ७ वर्षात किती वाढला भारतीयांचा पगार?; सरकारी रिपोर्टमधील आकडेवारी पाहून व्हाल हैराण
19
Viral Video: दोघे भिडले, लाथा-बुक्क्या मारत एकमेकांवर तुटून पडले; मेट्रोतील राडा व्हायरल
20
Napal Landslide: निसर्ग कोपला! नेपाळमध्ये ढगफुटी, भूस्खलनामुळे २२ जणांचा मृत्यू, विमानतळं महामार्ग बंद

‘सोफिया’मुळे रस्त्यांवर खड्ड्यांचे जाळे!

By admin | Updated: October 30, 2014 22:44 IST

नांदगाव पेठ येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत साकारण्यात आलेल्या इंडिया बुल्स कंपनीच्या सोफिया औष्णिक वीज प्रकल्पात वलगाव येथून दरदिवसाला शंभराहून अधिक ट्रकमधून कोळशाची वाहतूक होते.

अमरावती : नांदगाव पेठ येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत साकारण्यात आलेल्या इंडिया बुल्स कंपनीच्या सोफिया औष्णिक वीज प्रकल्पात वलगाव येथून दरदिवसाला शंभराहून अधिक ट्रकमधून कोळशाची वाहतूक होते. या ओव्हरलोड वाहतुकीमुळे हा रस्ता पूर्णपणे उखडला आहे. सतत रस्ता दुरुस्ती करावी लागत असल्याने रेल्वे प्रशासनही हतबल झाले आहे.सोफियामध्ये वीज निर्मिती सुरु झाली आहे. यासाठी लागणारा कोळसा वलगाव रेल्वेस्थानकावर मालगाडीने आणला जातो. कोळसा रेल्वे स्थानकावर उतरविल्यानंतर तो ट्रकव्दारे वलगाव येथून नांदगाव पेठ येथील सोफिया औष्णिक वीज प्रकल्पात पोहोचविला जातो. मात्र, ज्या मार्गावरुन हा कोळसा नेला जातो तो रस्ता सततच्या अवजड वाहतुकीमुळे ठिकठिकाणी उखडला आहे. ही बाब रेल्वे प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांच्या नजरेसही आणून दिली. मात्र, वाहतुकीवर अंकुश लागलेला नाही. वलगाव रेल्वे स्थानकावरुन ट्रकमध्ये कोळसा भरला की तो पुढे रिंगरोडवर चांदूरबाजार मार्गे नांदगाव पेठ एमआयडीसीकडे पाठविला जातो. या गंभीर प्रकाराकडे प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी लक्षच देत नाहीत, असे रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. अमरावती ते अचलपूर मार्गावर वलगावनजीक रेल्वे पुलाचे बांधकाम सुरु आहे. सततच्या ओव्हरलोड वाहतुकीमुळे तात्पुरत्या स्वरूपात तयार केलेला वळण रस्ता नादुरुस्त झाला आहे. यापूर्वी चार ते पाच वेळा हा वळण रस्ता तयार करण्यात आला. मात्र, काही दिवसांनंतर हा रस्ता पुन्हा जैसे थे होतो.वळण रस्त्याच्या दुरुस्तीसाठी रेल्वेकडे आर्थिक तरतूद नसल्याने हा वळण रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करता येत नसल्याची माहिती आहे. यापूर्वी रेल्वेच्या बांधकाम कंत्राटदाराने दोनदा या रस्त्याची दुरुस्ती केली. मात्र, ओव्हरलोड वाहतूक कमी करण्यासाठी प्रशासन मदत करीत नसल्याने सोफिया औष्णिक वीज प्रकल्पात कोळसा वाहतूक करणाऱ्या कंत्राटदारांचे फावत आहे. वलगाव रेल्वे स्थानक परिसराला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याची ओव्हरलोड ट्रक वाहतुकीमुळे अक्षरश: चाळणी झाली असताना ही बाब इंडिया बुल्स कंपनीचे अधिकारी गांभिर्याने घेत नाहीत, हे खरे आहे. पावसाळ्यापूर्वीच लाखो रुपये खर्चून वलगाव रेल्वे स्थानक मार्ग आणि अचलपूर मार्गावरील रेल्वे पूलाचे बांधकाम करण्यात आले. वळण मार्गाची दुरुस्ती करण्यात आली. मात्र, अवजड वाहतुकीमुळे या रस्त्यांची पूरती वाट लागली आहे. क्षमतेपेक्षा जास्त कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकांविरुद्ध कारवाईची मागणी रेल्वे प्रशासनाने केली आहे. या मार्गावरील अपघातांची वाढती संख्या लक्षात घेता या रस्त्यावरील कोळशाची ओव्हरलोड वाहतूक बंद करणे अत्यंत गरजेचे असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.