शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीणमध्ये आतापर्यंत २२ हजार ३२३ कोरोना संक्रमितांची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:13 IST

अमरावती; कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव शहरापेक्षा ग्रामीण भागात अधिक तीव्र आहे. दिवसागणिक रुग्णांची संख्या वाढत असून बाधितांचा आतापर्यंतचा आकडा ...

अमरावती; कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव शहरापेक्षा ग्रामीण भागात अधिक तीव्र आहे. दिवसागणिक रुग्णांची संख्या वाढत असून बाधितांचा आतापर्यंतचा आकडा २२ हजार ३२३ वर पोहोचला आहे. यात ३५८ नागरिकांचा जीव कोरोनारूपी राक्षसाने घेतल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे.

ग्रामीण भागात कोरोनासंबंधी नियमांचे पालन प्रभावीपणे होत नसल्याने बाधितांची संख्या वाढत आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत उपलब्ध आकडेवारीनुसार अचलपूर तालुक्यात आतापर्यत सर्वाधिक ३६७१रुग्णांनी नोंद करण्यात आली आहे. यातील ३३५७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर ३५२ रूग्ण उपचार घेत आहेत. त्यापाठोपाठ वरूड तालुक्यात २७८१ रुग्ण आढळून आले होते. त्यातील २२६९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ४४५ जण उपचार घेत आहेत. अंजनगाव सुर्जी तालुक्यात १८८० कोराेनाबाधित आढळून आले होते. त्यापैकी १५४८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर २३८ जण उपचार घेत आहेत. तिवसा तालुक्यात १८५८ कोरोना संक्रमित आढळून आले होते. यापैकी १६०७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर २५ ८ जण उपचार घेत आहेत. मोशी तालुक्यात १६५७ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यापैकी १४०९ रुग्ण बरे झाले आहेत. तर २९४ जण उपाचार घेत आहेत. धामणगाव रेल्वे तालुक्यात १४६६ रुग्ण आढळले आहेत. यातील ११०६ जण बरे झाले असून ३४९ जण उपचार घेत आहेत. अमरावती तालुक्यात १३९२ रुग्ण आढळून आले असून त्यापैकी ११२२ रुग्ण बरे झाले असून १३७ जण उपचार घेत आहेत. याशिवाय इतरही तालुक्यात कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यापैकी अनेक जणांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत ग्रामीण भागात ३५८ जणांचा कोरोनामुळे मुत्यू झाल्याची नोंद आहे.

बॉक्स

नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक

प्रशासकीय स्तरावर जनजागृती करूनसुद्धा बहुतांश नागरिक नियमांकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. परिणामी, बाधितांचा आकडा शहरापेक्षा ग्रामीण भागात अधिक वाढत असल्याचे पुढे आले येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सर्वच तालुक्यांतील बहुतांश गावांत कोरोनाने शिरकाव केला आहे. सातत्याने अनेक गावांत रुग्ण आढळून येत आहेत. तरीही आतापर्यंत कोरोनाला जिल्ह्यातील अनेक गावांत प्रवेश करू दिला नसल्याची उदाहरणे आहेत.

कोट

ग्रामीण भागात कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी आरोग्य विभागाकडून आवश्यक खबरदारीच्या उपाययोजना वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली केल्या जात आहे. नागरिकांनी प्रशासनाने केलेल्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे.

डाॅ. दिलीप रणमले,

जिल्हा आरोग्य अधिकारी