शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीणमध्ये आतापर्यंत २२ हजार ३२३ कोरोना संक्रमितांची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:13 IST

अमरावती; कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव शहरापेक्षा ग्रामीण भागात अधिक तीव्र आहे. दिवसागणिक रुग्णांची संख्या वाढत असून बाधितांचा आतापर्यंतचा आकडा ...

अमरावती; कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव शहरापेक्षा ग्रामीण भागात अधिक तीव्र आहे. दिवसागणिक रुग्णांची संख्या वाढत असून बाधितांचा आतापर्यंतचा आकडा २२ हजार ३२३ वर पोहोचला आहे. यात ३५८ नागरिकांचा जीव कोरोनारूपी राक्षसाने घेतल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे.

ग्रामीण भागात कोरोनासंबंधी नियमांचे पालन प्रभावीपणे होत नसल्याने बाधितांची संख्या वाढत आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत उपलब्ध आकडेवारीनुसार अचलपूर तालुक्यात आतापर्यत सर्वाधिक ३६७१रुग्णांनी नोंद करण्यात आली आहे. यातील ३३५७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर ३५२ रूग्ण उपचार घेत आहेत. त्यापाठोपाठ वरूड तालुक्यात २७८१ रुग्ण आढळून आले होते. त्यातील २२६९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ४४५ जण उपचार घेत आहेत. अंजनगाव सुर्जी तालुक्यात १८८० कोराेनाबाधित आढळून आले होते. त्यापैकी १५४८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर २३८ जण उपचार घेत आहेत. तिवसा तालुक्यात १८५८ कोरोना संक्रमित आढळून आले होते. यापैकी १६०७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर २५ ८ जण उपचार घेत आहेत. मोशी तालुक्यात १६५७ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यापैकी १४०९ रुग्ण बरे झाले आहेत. तर २९४ जण उपाचार घेत आहेत. धामणगाव रेल्वे तालुक्यात १४६६ रुग्ण आढळले आहेत. यातील ११०६ जण बरे झाले असून ३४९ जण उपचार घेत आहेत. अमरावती तालुक्यात १३९२ रुग्ण आढळून आले असून त्यापैकी ११२२ रुग्ण बरे झाले असून १३७ जण उपचार घेत आहेत. याशिवाय इतरही तालुक्यात कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यापैकी अनेक जणांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत ग्रामीण भागात ३५८ जणांचा कोरोनामुळे मुत्यू झाल्याची नोंद आहे.

बॉक्स

नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक

प्रशासकीय स्तरावर जनजागृती करूनसुद्धा बहुतांश नागरिक नियमांकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. परिणामी, बाधितांचा आकडा शहरापेक्षा ग्रामीण भागात अधिक वाढत असल्याचे पुढे आले येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सर्वच तालुक्यांतील बहुतांश गावांत कोरोनाने शिरकाव केला आहे. सातत्याने अनेक गावांत रुग्ण आढळून येत आहेत. तरीही आतापर्यंत कोरोनाला जिल्ह्यातील अनेक गावांत प्रवेश करू दिला नसल्याची उदाहरणे आहेत.

कोट

ग्रामीण भागात कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी आरोग्य विभागाकडून आवश्यक खबरदारीच्या उपाययोजना वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली केल्या जात आहे. नागरिकांनी प्रशासनाने केलेल्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे.

डाॅ. दिलीप रणमले,

जिल्हा आरोग्य अधिकारी