शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
पाकिस्तानविरुद्ध कारवाई सुरूच, भारतीय हवाई हद्दीत कोणतेही विमान उड्डाण करू शकणार नाही; बंदी २४ सप्टेंबरपर्यंत वाढवली
3
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
4
TikTok Ban: टिकटॉक खरंच भारतात पुन्हा सुरू होणार आहे का? केंद्र सरकारनेच दिलं उत्तर
5
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
6
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
7
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
8
Ganesh Chaturthi 2025: धर्मशास्त्रानुसार गणपती विसर्जनाचा योग्य दिवस कोणता? ते जाणून घ्या!
9
हरितालिका तृतीया २०२५: व्रत पूजेचे सगळे साहित्य घेतले ना, काही राहिले तर नाही? पाहा, यादी
10
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
11
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
12
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
13
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
14
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
15
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
16
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
17
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
18
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
19
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
20
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका

ग्रामीणमध्ये आतापर्यंत २२ हजार ३२३ कोरोना संक्रमितांची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:13 IST

अमरावती; कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव शहरापेक्षा ग्रामीण भागात अधिक तीव्र आहे. दिवसागणिक रुग्णांची संख्या वाढत असून बाधितांचा आतापर्यंतचा आकडा ...

अमरावती; कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव शहरापेक्षा ग्रामीण भागात अधिक तीव्र आहे. दिवसागणिक रुग्णांची संख्या वाढत असून बाधितांचा आतापर्यंतचा आकडा २२ हजार ३२३ वर पोहोचला आहे. यात ३५८ नागरिकांचा जीव कोरोनारूपी राक्षसाने घेतल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे.

ग्रामीण भागात कोरोनासंबंधी नियमांचे पालन प्रभावीपणे होत नसल्याने बाधितांची संख्या वाढत आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत उपलब्ध आकडेवारीनुसार अचलपूर तालुक्यात आतापर्यत सर्वाधिक ३६७१रुग्णांनी नोंद करण्यात आली आहे. यातील ३३५७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर ३५२ रूग्ण उपचार घेत आहेत. त्यापाठोपाठ वरूड तालुक्यात २७८१ रुग्ण आढळून आले होते. त्यातील २२६९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ४४५ जण उपचार घेत आहेत. अंजनगाव सुर्जी तालुक्यात १८८० कोराेनाबाधित आढळून आले होते. त्यापैकी १५४८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर २३८ जण उपचार घेत आहेत. तिवसा तालुक्यात १८५८ कोरोना संक्रमित आढळून आले होते. यापैकी १६०७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर २५ ८ जण उपचार घेत आहेत. मोशी तालुक्यात १६५७ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यापैकी १४०९ रुग्ण बरे झाले आहेत. तर २९४ जण उपाचार घेत आहेत. धामणगाव रेल्वे तालुक्यात १४६६ रुग्ण आढळले आहेत. यातील ११०६ जण बरे झाले असून ३४९ जण उपचार घेत आहेत. अमरावती तालुक्यात १३९२ रुग्ण आढळून आले असून त्यापैकी ११२२ रुग्ण बरे झाले असून १३७ जण उपचार घेत आहेत. याशिवाय इतरही तालुक्यात कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यापैकी अनेक जणांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत ग्रामीण भागात ३५८ जणांचा कोरोनामुळे मुत्यू झाल्याची नोंद आहे.

बॉक्स

नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक

प्रशासकीय स्तरावर जनजागृती करूनसुद्धा बहुतांश नागरिक नियमांकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. परिणामी, बाधितांचा आकडा शहरापेक्षा ग्रामीण भागात अधिक वाढत असल्याचे पुढे आले येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सर्वच तालुक्यांतील बहुतांश गावांत कोरोनाने शिरकाव केला आहे. सातत्याने अनेक गावांत रुग्ण आढळून येत आहेत. तरीही आतापर्यंत कोरोनाला जिल्ह्यातील अनेक गावांत प्रवेश करू दिला नसल्याची उदाहरणे आहेत.

कोट

ग्रामीण भागात कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी आरोग्य विभागाकडून आवश्यक खबरदारीच्या उपाययोजना वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली केल्या जात आहे. नागरिकांनी प्रशासनाने केलेल्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे.

डाॅ. दिलीप रणमले,

जिल्हा आरोग्य अधिकारी