शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

नागपंचमीच्या दिवशी सापाला पुजले जाते, मग इतर दिवशी का मारले जाते?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:17 IST

नागपंचमी विशेष, साप हा शेतकऱ्यांचा मित्र, साप निघाल्यास घाबरू नका अमरावती : साप हा शेतकऱ्यांच्या मित्र आहे. साप ...

नागपंचमी विशेष, साप हा शेतकऱ्यांचा मित्र, साप निघाल्यास घाबरू नका

अमरावती : साप हा शेतकऱ्यांच्या मित्र आहे. साप निघाल्यास त्याला मारू नका. नजीकच्या सर्पमित्रांना पाचारण करून त्याला सुखरूप पकडून देण्यासाठी सर्पमित्रांना सहकार्य करा. सापाला इजा पोहोचेल, जीव जाईल असले कृत्य करू नये, असे आवाहन वनविभागाने नागपंचमीचे औचित्याने नागरिकांना केले आहे.

दरवर्षी पावसाळ्यात साप बिळाबाहेर पडतात. परंतु, बरेचदा साप बिनविषारी असतानासुद्धा अनेक जण घाबरतात. स्वत:च्या सुरक्षिततेसाठी त्याला मारतात. मात्र, कोणत्याही प्रजातीचा साप निघाला तरी घाबरू नका. वनविभागाच्या १९२६ हेल्पलाईनवर संपर्क साधा. सर्पमित्र येईपर्यंत सापाजवळ जाऊ नका, असा सल्ला सर्पमित्रांनी दिला.

जिल्ह्यातील नागरी वस्त्यांमध्ये मण्यार, नाग, घोणस, फुरसे अशा सापाच्या चार प्रजाती प्रामुख्याने आढळतात. याशिवाय अन्य साप हे बिनविषारी असून, या सापांना घाबरण्याचे काहीही कारण नाही, हे वास्तव आहे. साप हा शेतकऱ्यांचा मित्र असून, पिकांचे संरक्षण करण्यात त्याची मोठी मदत मिळते. त्यामुळे घरी अथवा शेतात साप आढळून आल्यास त्याला इजा न पोहचविता सुखरूपपणे त्याला वावर करू द्या, असे आवाहन वडाळीचे वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास भुंबर यांनी केले.

----------------

जिल्ह्यात आढळणारे विषारी साप

मण्यार, नाग, घोणस, फुरसे

----------

जिल्ह्यात आढळणारे बिनविषारी साप

धामण, कवड्या, दिवड, नानेटी, धूळनागीण, बँडेड कुकरी, तस्कर, गवत्या, डुरक्या घोणस, मांडुळ

-------------

साप आढळला तर...

साप आढळला तर सर्पमित्राला बोलावा. तोपर्यंत सापाच्या जवळ जाऊ नका.

वनविभागाशी संपर्क साधून अधिकृत सर्पमित्राला घरी बोलवा. तेथपर्यंत लहान मुलांनी काळजी घ्यावी.

साप असलेल्या भागात किमान सात ते आठ फूट अंतर राखावे. कोणीही त्या भागात प्रवेश करू नये.

पावसाळ्यात साप हमखास निघतात. घाबरून न जाता सर्पमित्राला बोलावून सापाला पकडून द्यावे.

--------

साप शेतकऱ्यांचा मित्र

साप हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. उभ्या पिकांना घुशी, उंदरांपासूनही नुकसान होते. साप हा पिकांचे नुकसान करणाऱ्या या प्राण्यांसह मोठे कीटक फस्त करण्यात मोठी मदत करतात. त्यामुळे घरी अथवा शेतात साप निघाल्यास त्याला मारू नका, तो खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा मित्र आहे, यात दुमत नाही.

-------------------

साप चावल्यास घाबरू नये. ज्या भागात दंश केला असेल, त्याच्या वरील भागात घट्ट कापड बांधावे. शासकीय रुग्णालयातच उपाचारासाठी जावे. तथाकथित बुवांकडे औषधासाठी धाव घेऊ नये. वेळीच वैद्यकीय उपचार महत्त्वाचा आहे.

- नीलेश कंचनपुरे, सर्पमित्र, वार संघटना