शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
4
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
5
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
6
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
7
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
8
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
9
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
11
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
12
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
13
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
14
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
15
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
16
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
17
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
18
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
19
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
20
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन

‘स्मार्ट सिटी’त नागरिकांचे मोबाईल होणार 'कनेक्ट'

By admin | Updated: January 4, 2015 23:03 IST

महापालिका अमरावती शहराला ‘स्मार्ट सिटी’त समाविष्ट करण्यासाठी अत्याधुनिक सोयीसुविधा नागरिकांना देण्यासाठी प्रयत्नशील आहे. याच श्रृंखलेत एम मित्र नावाच्या अ‍ॅप्सचा अंगीकार करुन

अमरावती : महापालिका अमरावती शहराला ‘स्मार्ट सिटी’त समाविष्ट करण्यासाठी अत्याधुनिक सोयीसुविधा नागरिकांना देण्यासाठी प्रयत्नशील आहे. याच श्रृंखलेत एम मित्र नावाच्या अ‍ॅप्सचा अंगीकार करुन महानगरातील साडेआठ लाख नागरिकांना मोबाईलच्या माध्यमातून 'कनेक्ट' केले जाणार आहेत.प्रत्येकवेळी महापालिकेत येऊन समस्या, तक्रार देणे हे काही सर्वांना संयुक्तीक नाही. त्यामुळे महापालिका आणि नागरिक यांच्यात क्षणात सुसंवाद साधता यावा, याकरिता ‘स्मार्ट सिटी’ला साजेसा असा नवा उपक्रम आयुक्त अरुण डोंगरे यांच्या संकल्पनेतून साकारला जात आहे. यात आपत्कालीन व्यवस्था, अग्निशमन, अपघात, स्वच्छता, मार्गदर्शन, पर्यटन, अ‍ॅम्बुलन्स सेवा, सर्प मित्र, वैयक्तिक सुरक्षा, रस्त्याचे अंतर, मार्गाचे नाव आदी नागरिकांशी संबंधित सेवेला प्राधान्या दिले जाणार आहे. या नव्या प्रयोगाने मेट्रोपॉलिटन शहरात मिळणाऱ्या सुविधा अमरावतीत मिळणे सुकर होईल. विकासकामे करताना काही भागात नागरिकांच्या आवश्यकतेनुसार ती कामे करावी, अशा सूचना करण्याचे या अ‍ॅप्समध्ये अंतर्भूत राहणार आहेत. परिणामी एखाद्या भागात रस्ता निर्माण करणे अतिशय गरजेचे आहे, हे मोबाईलद्वारेच मार्गदर्शनातून आयुक्तांना क्षणात कळविण्याची या उपक्रमात व्यवस्था राहणार आहे. थेट महापालिकेत येऊन तक्रार करण्याची आता भानगड राहणार नसून नागरिकांकडे असलेल्या मोबाईलमधूनच एका क्लिकने तक्रार देता येणार आहे. नागरिकांना या सुविधांचा कोणताही खर्च लागणार नाही, हे विशेष. ही प्रणाली वर्धा येथील लॉजिक सिस्टिम प्रा. लि. ने तयार केली आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतही विकसित करण्यात आली आहे. विशेषत: शहरातील पर्यटनक्षेत्र आणि प्राचीन मंदिरांची माहिती दर्शविणारे जागोजागी फलक लावले जाणार आहे. हे फलक लावताना त्या स्थळांचे कि.मी. दर्शविणारे अंतर शहराच्या ठिकठिकाणी राहणार आहेत. रस्ता, मार्ग ठळकपणे नमूद केले जाणार असून पर्यटकांना काहीच विचारण्याची गरज राहणार नाही, अशी सुविधा ‘स्मार्ट सिटी’ या उपक्रमात राहणार आहे.