शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

‘स्मार्ट सिटी’त का माघारलो? चिंतन करा

By admin | Updated: April 22, 2016 23:59 IST

शहराचा ‘स्मार्ट सिटी’मध्ये समावेश करण्यासाठी मोठा गाजावाजा करण्यात आला. मात्र, केंद्र सरकारच्या निवड यादीत शहराचे नाव रँकिंगमध्ये ६४ व्या क्रमांकावर असून ‘फास्ट ट्रॅक’ यादीत स्थानच मिळाले नाही.

सुनील देशमुखांचा सल्ला : फास्ट ट्रॅकमध्ये समावेश नाहीअमरावती : शहराचा ‘स्मार्ट सिटी’मध्ये समावेश करण्यासाठी मोठा गाजावाजा करण्यात आला. मात्र, केंद्र सरकारच्या निवड यादीत शहराचे नाव रँकिंगमध्ये ६४ व्या क्रमांकावर असून ‘फास्ट ट्रॅक’ यादीत स्थानच मिळाले नाही. ही बाब अमरावतीसाठी नुकसानदायक असून ‘स्मार्ट सिटी’त माघारण्याच्या कारणांवर चिंतन करण्याचा सल्ला आ. सुनील देशमुख यांनी दिला. तसेच महापालिका प्रशासनाचा एककल्ली कारभार संबोधून त्यांनी यावर ताशेरे ओढले. ‘स्मार्ट सिटी’त शहर माघारण्याच्या कारणांवरुन ते ‘लोकमत’शी बोलत होते.आ. देशमुख यांच्या मते, जानेवारी २०१६ मध्ये केंद्र सरकारने देशातील ९७ शहरांपैकी पहिल्या टप्प्यात २० शहरांची ‘स्मार्ट सिटी’ उपक्रमात निवड केली आहे. यात राज्यातील पुणे, सोलापूर शहरांचा समावेश आहे. अमरावतीचे नाव ‘स्मार्ट सिटी’त सहभागी व्हावे, यासाठी महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी प्रयत्न केलेत. मात्र, त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. हा उपक्रम राबविताना प्रशासनाने कोणालाही विश्वासात न घेतल्याने ही स्थिती उदभवली आहे. या उपक्रमात शहराचा समावेश न झाल्याने नागरिकांचे नुकसान झाले. ‘स्मार्ट सिटी’ उपक्रम अल्प शहरांसाठी होता. यासाठी प्रस्ताव तयार करताना लोकप्रतिनिधी, तज्ज्ञ, आदींना सोबत घेऊन काम केले असते तर वेगवेगळे अनुभव कामी आले असते. मात्र, आयुक्त गुडेवार यांनी एककल्ली कारभार करून प्रस्ताव सादर केल्यानेच या प्रस्तावाला ४७.५७ गुणांक मिळाले, असा आरोपही देशमुखांनी केला. ‘स्मार्ट सिटी’चा एवढा गाजावाजा केला असतानाही पहिल्या यादीत नाव का आले नाही? अन्य शहरांच्या तुलनेत आपण का माघारलो?, याचे चिंतन झाले पाहिजे. अमरावतीकरांना ‘स्मार्ट सिटी’बाबत नेमके काय झाले, हे कळले पाहिजे. पहिल्या यादीत नाव नसले तरी अगदी काठावर काही गुणांनी माघारलेल्या २३ शहरांचा ‘फास्ट ट्रॅक’ यादीत समावेश करण्यात आला आहे. या ‘फास्ट ट्रॅक’ यादीतसुद्धा अमरावतीचे नाव नसल्याबाबत आ. देशमुखांनी आश्चर्य व्यक्त केले. आ.देशमुखांच्या मते अद्यापही काही बिघडले नाही. मात्र, आयुक्त गुडेवार यांनी सर्वसमावेशक विचार करून ‘स्मार्ट सिटी’करिता नव्याने प्रस्ताव तयार करताना एकट्याने रथ ओढण्याऐवजी सर्वांना सोबत घेतले पाहिजे. म्हणजे किमान दुसऱ्या टप्प्यात तरी अमरावतीचे नाव यायला हवे. याकरिता काही बाबी लपवून न ठेवल्या तर बरे होईल, असा सूचक सल्ला त्यांनी दिला. केंद्र सरकारने नेमलेल्या एजन्सीमार्फतच डीपीआर तयार करणे अपेक्षित आहे. मात्र, आयुक्तांनी नियम गुंडाळून एजन्सी नेमण्याचा प्रताप केल्याचेही ते म्हणाले. विकासकामे करायचे असतील तर सर्वांना सोबत घ्यावे लागेल. अन्यथा अपयश पदरी पडते. नेमके हेच ‘स्मार्ट सिटी’बाबत झाले आहे. दुसऱ्या टप्प्यात शहराचे नाव आणण्याची आणखी एक संधी आहे अन्यथा ‘स्मार्ट सिटी’पासून अमरावतीकरांना वंचित रहावे लागेल, असेही आ.देशमुख म्हणाले. आयुक्तांनी ‘स्मार्ट सिटी’त जे काही केले ते आपल्या मर्जीनुसार केले आहे. (प्रतिनिधी)‘ताली कप्तान को, तो गाली भी कप्तान को’- सुनील देशमुखअमरावती शहराचे नाव ‘स्मार्ट सिटी’च्या पहिल्या यादीत झळकणार, असा मोठा गाजावाजा करण्यात आला. ‘स्मार्ट सिटी’साठी मी अमूक केले, तमूक केले, अशी बतावणी करून महापालिका आयुक्तांनी शहरवासीयांची दिशाभूल केली. त्यामुळे यादीत नाव का आले नाही, काय चुकले? हे जनतेला कळले पाहिजे. ‘ताली कप्तान को, तो गाली भी कप्तान को’ या म्हणीनुसार आयुक्तांनी अपयशदेखील स्वीकारले पाहिजे, असा प्रहारही आ. सुनील देशमुख यांनी केला.२० शहरांची 'स्मार्ट सिटी'त निवडकेंद्र सरकारने ‘स्मार्ट सिटी’ उपक्रमात पहिल्या टप्प्यात देशातील २० शहरांची निवड केली आहे. यात भुवनेश्वर, पुणे, जयपूर, सुरत, कोची, अहमदाबाद, जबलपूर, विशाखापट्टणम्, सोलापूर, देवनगरी, इंदूर, कोर्इंबतूर, काकिनाडा, बेलगावी, उदयपूर, गुवाहाटी, चेन्नई, लुधियाना, भोपाळ, दिल्ली या शहरांचा समावेश आहे.‘फास्ट ट्रॅक’मध्ये समाविष्ट शहरे४वारंगल, चंदीगड, लखनऊ, न्यू कोलकाता, पणजी, पासीघाट, धर्मशाळा, फरिदाबाद, रायपूर, दीव, भावनगर, शिलाँग, नामची, पोर्ट ब्लेअर, ओलग्रेट, सिल्व्हासा, इंफाल, रांची, अगरतला, कोहिमा, ऐझवल, कर्वटी, देहरादूनचा समावेश आहे.