शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘स्मार्ट सिटी’त का माघारलो? चिंतन करा

By admin | Updated: April 22, 2016 23:59 IST

शहराचा ‘स्मार्ट सिटी’मध्ये समावेश करण्यासाठी मोठा गाजावाजा करण्यात आला. मात्र, केंद्र सरकारच्या निवड यादीत शहराचे नाव रँकिंगमध्ये ६४ व्या क्रमांकावर असून ‘फास्ट ट्रॅक’ यादीत स्थानच मिळाले नाही.

सुनील देशमुखांचा सल्ला : फास्ट ट्रॅकमध्ये समावेश नाहीअमरावती : शहराचा ‘स्मार्ट सिटी’मध्ये समावेश करण्यासाठी मोठा गाजावाजा करण्यात आला. मात्र, केंद्र सरकारच्या निवड यादीत शहराचे नाव रँकिंगमध्ये ६४ व्या क्रमांकावर असून ‘फास्ट ट्रॅक’ यादीत स्थानच मिळाले नाही. ही बाब अमरावतीसाठी नुकसानदायक असून ‘स्मार्ट सिटी’त माघारण्याच्या कारणांवर चिंतन करण्याचा सल्ला आ. सुनील देशमुख यांनी दिला. तसेच महापालिका प्रशासनाचा एककल्ली कारभार संबोधून त्यांनी यावर ताशेरे ओढले. ‘स्मार्ट सिटी’त शहर माघारण्याच्या कारणांवरुन ते ‘लोकमत’शी बोलत होते.आ. देशमुख यांच्या मते, जानेवारी २०१६ मध्ये केंद्र सरकारने देशातील ९७ शहरांपैकी पहिल्या टप्प्यात २० शहरांची ‘स्मार्ट सिटी’ उपक्रमात निवड केली आहे. यात राज्यातील पुणे, सोलापूर शहरांचा समावेश आहे. अमरावतीचे नाव ‘स्मार्ट सिटी’त सहभागी व्हावे, यासाठी महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी प्रयत्न केलेत. मात्र, त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. हा उपक्रम राबविताना प्रशासनाने कोणालाही विश्वासात न घेतल्याने ही स्थिती उदभवली आहे. या उपक्रमात शहराचा समावेश न झाल्याने नागरिकांचे नुकसान झाले. ‘स्मार्ट सिटी’ उपक्रम अल्प शहरांसाठी होता. यासाठी प्रस्ताव तयार करताना लोकप्रतिनिधी, तज्ज्ञ, आदींना सोबत घेऊन काम केले असते तर वेगवेगळे अनुभव कामी आले असते. मात्र, आयुक्त गुडेवार यांनी एककल्ली कारभार करून प्रस्ताव सादर केल्यानेच या प्रस्तावाला ४७.५७ गुणांक मिळाले, असा आरोपही देशमुखांनी केला. ‘स्मार्ट सिटी’चा एवढा गाजावाजा केला असतानाही पहिल्या यादीत नाव का आले नाही? अन्य शहरांच्या तुलनेत आपण का माघारलो?, याचे चिंतन झाले पाहिजे. अमरावतीकरांना ‘स्मार्ट सिटी’बाबत नेमके काय झाले, हे कळले पाहिजे. पहिल्या यादीत नाव नसले तरी अगदी काठावर काही गुणांनी माघारलेल्या २३ शहरांचा ‘फास्ट ट्रॅक’ यादीत समावेश करण्यात आला आहे. या ‘फास्ट ट्रॅक’ यादीतसुद्धा अमरावतीचे नाव नसल्याबाबत आ. देशमुखांनी आश्चर्य व्यक्त केले. आ.देशमुखांच्या मते अद्यापही काही बिघडले नाही. मात्र, आयुक्त गुडेवार यांनी सर्वसमावेशक विचार करून ‘स्मार्ट सिटी’करिता नव्याने प्रस्ताव तयार करताना एकट्याने रथ ओढण्याऐवजी सर्वांना सोबत घेतले पाहिजे. म्हणजे किमान दुसऱ्या टप्प्यात तरी अमरावतीचे नाव यायला हवे. याकरिता काही बाबी लपवून न ठेवल्या तर बरे होईल, असा सूचक सल्ला त्यांनी दिला. केंद्र सरकारने नेमलेल्या एजन्सीमार्फतच डीपीआर तयार करणे अपेक्षित आहे. मात्र, आयुक्तांनी नियम गुंडाळून एजन्सी नेमण्याचा प्रताप केल्याचेही ते म्हणाले. विकासकामे करायचे असतील तर सर्वांना सोबत घ्यावे लागेल. अन्यथा अपयश पदरी पडते. नेमके हेच ‘स्मार्ट सिटी’बाबत झाले आहे. दुसऱ्या टप्प्यात शहराचे नाव आणण्याची आणखी एक संधी आहे अन्यथा ‘स्मार्ट सिटी’पासून अमरावतीकरांना वंचित रहावे लागेल, असेही आ.देशमुख म्हणाले. आयुक्तांनी ‘स्मार्ट सिटी’त जे काही केले ते आपल्या मर्जीनुसार केले आहे. (प्रतिनिधी)‘ताली कप्तान को, तो गाली भी कप्तान को’- सुनील देशमुखअमरावती शहराचे नाव ‘स्मार्ट सिटी’च्या पहिल्या यादीत झळकणार, असा मोठा गाजावाजा करण्यात आला. ‘स्मार्ट सिटी’साठी मी अमूक केले, तमूक केले, अशी बतावणी करून महापालिका आयुक्तांनी शहरवासीयांची दिशाभूल केली. त्यामुळे यादीत नाव का आले नाही, काय चुकले? हे जनतेला कळले पाहिजे. ‘ताली कप्तान को, तो गाली भी कप्तान को’ या म्हणीनुसार आयुक्तांनी अपयशदेखील स्वीकारले पाहिजे, असा प्रहारही आ. सुनील देशमुख यांनी केला.२० शहरांची 'स्मार्ट सिटी'त निवडकेंद्र सरकारने ‘स्मार्ट सिटी’ उपक्रमात पहिल्या टप्प्यात देशातील २० शहरांची निवड केली आहे. यात भुवनेश्वर, पुणे, जयपूर, सुरत, कोची, अहमदाबाद, जबलपूर, विशाखापट्टणम्, सोलापूर, देवनगरी, इंदूर, कोर्इंबतूर, काकिनाडा, बेलगावी, उदयपूर, गुवाहाटी, चेन्नई, लुधियाना, भोपाळ, दिल्ली या शहरांचा समावेश आहे.‘फास्ट ट्रॅक’मध्ये समाविष्ट शहरे४वारंगल, चंदीगड, लखनऊ, न्यू कोलकाता, पणजी, पासीघाट, धर्मशाळा, फरिदाबाद, रायपूर, दीव, भावनगर, शिलाँग, नामची, पोर्ट ब्लेअर, ओलग्रेट, सिल्व्हासा, इंफाल, रांची, अगरतला, कोहिमा, ऐझवल, कर्वटी, देहरादूनचा समावेश आहे.