शहरं
Join us  
Trending Stories
1
एलओसीवर ८-९ मेची रात्र! भारताने एवढे बॉम्ब फोडले की, पाकिस्तानी चौकीवर सकाळी पांढरे निशाण फडकले
2
"मी उपलब्ध नाही...", पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यास युसूफ पठाण जाणार नाही, संसदीय शिष्टमंडळाला नकार
3
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल! स्वस्त झाले की महागले? जाणून घ्या आजचे दर
4
Amit Thackeray: "युद्धाचा निकाल स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळावा"; अमित ठाकरेंचं थेट पंतप्रधान मोदींना पत्र
5
पाकचा नापाक इरादा भारताला आधीच लक्षात आला, सुवर्ण मंदिरावरील हल्ला 'अशा' प्रकारे उधळून लावला!
6
EPFO चा धमाका! तुमच्या PF आणि पेन्शनमध्ये मोठे बदल, जाणून घ्या ५ महत्त्वाचे अपडेट्स
7
स्वतंत्र झाल्यावर कसा असेल बलुचिस्तान देश? जाणून घ्या
8
पाकिस्तानचा मंत्री अध्यक्ष असलेल्या आशिया कपमध्ये भारतीय संघ खेळणार नाही; नाव माघारी घेतले... 
9
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्रावर भडकली टीव्ही अभिनेत्री, म्हणाली- "अशा लोकांना..."
10
'ठरलं तर मग' मालिकेत पुन्हा येतेय 'ही' अभिनेत्री, लेकीच्या जन्मानंतर दोन महिन्यात कमबॅक
11
Jyoti Mlhotra : "माझ्या मुलीला फसवलं जातंय, ती पाकिस्तानला..."; ज्योती मल्होत्राच्या वडिलांचा खळबळजनक दावा
12
"माझ्या ११ वर्षांच्या मुलाचं निधन झालं अन् मी देव्हाऱ्यातील मूर्ती काढल्या", अभिनेत्याचा मोठा खुलासा
13
जगबुडी नदी पुन्हा काळ बनली! अंत्ययात्रेला जाणाऱ्या मुंबईकरांची कार नदीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू
14
'सितारे जमीन पर' थिएटरमधून थेट युट्यूबवर होणार प्रदर्शित, आमिर खान आणणार PPV मॉडेल
15
बाजारात संमिश्र कल! 'हे' दिग्गज आयटी शेअर घसरले, बँकिंगमध्ये तेजी; एफपीआयचा विश्वास कायम
16
सख्खे शेजारी बनले पक्के वैरी! दारूच्या नशेत वाद विकोपाला गेला; हाणामारीत ३ जणांचा मृत्यू
17
हैदराबादमध्ये मोठा कट उधळला, ISIS शी संबंधित दोघांना अटक; बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त
18
कैलास मानसरोवर यात्रेसाठी आता जास्त पैसे मोजावे लागणार! चीनशी आहे थेट संबंध
19
Rain Update : रत्नागिरीत सकाळपासूनच जोरदार, मुंबईत तुरळक पाऊस; राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट
20
Joe Biden : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना प्रोस्टेट कॅन्सर! हाडांपर्यंत पोहोचला आजार

शेतकऱ्यांना ७/१२ वर अल्पदरात गहू, तांदूळ

By admin | Updated: August 23, 2015 00:37 IST

अमरावती व भातकुली तालुक्यातील शेतकरी-शेतमजुरांना शासनांच्या अन्न सुरक्षा योजनेमध्ये प्रत्येक शेतकऱ्याला ७/१२वर शासनातर्फे दोन रुपये किलो गहू व तीन रुपये किलो तांदुळ

अमरावती : अमरावती व भातकुली तालुक्यातील शेतकरी-शेतमजुरांना शासनांच्या अन्न सुरक्षा योजनेमध्ये प्रत्येक शेतकऱ्याला ७/१२वर शासनातर्फे दोन रुपये किलो गहू व तीन रुपये किलो तांदुळ अशाप्रमाणे दिले जाईल. या योजनेचा शुभारंभ नुकताच आमदार रवि राणा यांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये अमरावती व भातकुली तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांनी सहभाग दर्शवीला. यावेळी आमदार रवि राणा यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी हितगुज करुन व त्यांची मते जाणून या संपूर्ण योजनेची विस्तारपूर्वक माहिती दिली. तसेच या योजनेचा लाभ प्रत्येक शेतकऱ्याला तातडीने मिळावा. याकरीता तहसिलदार, तलाठी व मंडळ अधिकारी यांना गावा-गावात जाऊन शेतकऱ्यांना ७/१२ वाटून हि योजना घरा घरात पोहचविण्याकरीता १५ दिवसाच्या आत राबविण्याचे आदेश दिले. जर १५ दिवसाच्या आत ही योजना राबविली तरच खऱ्या अर्थाने या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळेल असे सुध्दा स्पष्ट केले आहे. वरुन राजा व देवाच्या कृपेने पाऊस पडल्याबद्दल त्यांचे आभार म्हणून आमदार रवि राणा यांनी संपूर्ण शेतकऱ्यांच्या उपस्थितीत जलपुजन सुध्दा केले. शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये यासाठी शासनाने शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात रेशन देण्याचा निर्णय घेतला आहे. जे शेतकरी अन्न सुरक्षा योजना २०१३ या अंतर्गत समाविष्ट होऊ शकले नाही, अशा शेतकऱ्यांना व कुटुंबातील सर्व सदस्यांना प्रतिमाह पाच किलो धान्य सवलतीच्या दरात देण्याची १५ आॅगस्ट रोजी पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी जिल्ह्यात शुभारंभ केला होता. आता सर्व तालुकास्तरावर संबंधित लोकप्रतिनिधींच्या हस्ते लाभार्थी शेतकऱ्यांना रेशन धान्याचे वाटप करण्यात येत आहे.याप्रसंगी गोकुलदास उपाध्याय, हर्षद वाचासुंदर, संजय चुनकिकर, राजू तेलमोरे, प्रकाश खर्चान, राजू हरणे, मिलींद अवघड, शंकर डोंगरे, किरण भोपसे, अनिल तिडके, प्रदिप मोहोड, चंदु पाटील, रामदास रंगारी, श्रीकृष्ण पाटील, सुमित गुल्हाने, महेंद्र सिरसाट, दिनेश इंगळे, गुरुदास दुर्गे, पद्माकर गुल्हाणे, राजु रोडगे, देवानंद इंगळे व आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.