शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोटातील १२ दोषींची निर्दोष मुक्तता, राज्य सरकारला दणका
2
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
3
छावा संघटना मारहाण: राष्ट्रवादीचे युवा शाखेचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण फरार; ११ जणांवर गुन्हा दाखल
4
राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण यांच्यासह ११ जणांवर गुन्हा दाखल; छावा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण प्रकरणी कारवाई
5
हा हल्ला पूर्वनियोजित, सुनील तटकरेंच्या सांगण्यावरून...; विजय घाडगे पाटलांचा मोठा दावा
6
भयानक PHOTO's! ११ जुलै २००६ चा मुंबई लोकल बॉम्बस्फोट; आरोपी निर्दोष सुटले पण... जखमा आजही कायम...
7
छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला मारहाण प्रकरणी सूरज चव्हाण यांनी मागितली माफी, म्हणाले...
8
Vi युझर्ससाठी महत्त्वाची बातमी, स्वस्त रिचार्ज प्लान्समध्ये केले बदल; Airtel आणि Jio काय करणार?
9
IndiGo : विमान ४० मिनिटे हवेत फिरत राहिले, तिरुपतीहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग
10
हनी ट्रॅप प्रकरणात भाजपा नेत्याच्या निकटवर्तीयाला मुंबईत अटक; अनेक मोठी नावे उघड होणार
11
Stock Market Today: किरकोळ तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Bank Nifty सुस्साट, 'या' शेअर्समध्ये तेजी
12
ना साईड बिझनेस, ना शेअर बाजाराच्या टीप्स; ४५ व्या वर्षी ₹४.७ कोटींसोबत होऊ शकता रिटायर, काय आहे ‘सिक्रेट प्लान’
13
तयार रहा...! पेट्रोल, डिझेलच्या किंमती ८-१० रुपयांनी वाढण्याची शक्यता; भारत ट्रम्प यांच्या डोळ्यात खुपतोय...
14
सोनिया गांधींना भेटण्यासाठी जात होतात त्याचे काय? योगेश कदम यांचा उद्धव ठाकरेंना टोला
15
Laxman Hake : "फडणवीसांनी अजितदादांच्या कार्यकर्त्यांना आवर घालावा, नाहीतर तुमचं..."; लक्ष्मण हाके संतापले
16
आरोपीची मिरवणूक काढणाऱ्यांचीच ‘वरात’; पोलिसांनी दाखल केला गुन्हा!
17
वसईतील पर्यटनस्थळांवर पोलिसांचा मनाई आदेश; चिंचोटी, देवकुंडी धबधब्यात जाण्यास पर्यटकांना मज्जाव
18
चातुर्मासातील सलग दुसरा भौम प्रदोष: ‘या’ मंत्रांचा अवश्य जप करा; व्रतातील शिवपूजन कसे कराल?
19
मंगला एक्स्प्रेसमध्ये पकडले ३६ कोटींचे ड्रग्ज; मेथाफेटामाईनसह कोकेनही आढळले!
20
पुण्यात शेजारी शेजारी दोन मॉल, दोन्हींत मुकेश अंबानींच्या रिलायन्स ट्रेन्डस्; यामागचे प्लॅनिंग नेमके असते तरी काय...

शेतकऱ्यांना ७/१२ वर अल्पदरात गहू, तांदूळ

By admin | Updated: August 23, 2015 00:37 IST

अमरावती व भातकुली तालुक्यातील शेतकरी-शेतमजुरांना शासनांच्या अन्न सुरक्षा योजनेमध्ये प्रत्येक शेतकऱ्याला ७/१२वर शासनातर्फे दोन रुपये किलो गहू व तीन रुपये किलो तांदुळ

अमरावती : अमरावती व भातकुली तालुक्यातील शेतकरी-शेतमजुरांना शासनांच्या अन्न सुरक्षा योजनेमध्ये प्रत्येक शेतकऱ्याला ७/१२वर शासनातर्फे दोन रुपये किलो गहू व तीन रुपये किलो तांदुळ अशाप्रमाणे दिले जाईल. या योजनेचा शुभारंभ नुकताच आमदार रवि राणा यांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये अमरावती व भातकुली तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांनी सहभाग दर्शवीला. यावेळी आमदार रवि राणा यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी हितगुज करुन व त्यांची मते जाणून या संपूर्ण योजनेची विस्तारपूर्वक माहिती दिली. तसेच या योजनेचा लाभ प्रत्येक शेतकऱ्याला तातडीने मिळावा. याकरीता तहसिलदार, तलाठी व मंडळ अधिकारी यांना गावा-गावात जाऊन शेतकऱ्यांना ७/१२ वाटून हि योजना घरा घरात पोहचविण्याकरीता १५ दिवसाच्या आत राबविण्याचे आदेश दिले. जर १५ दिवसाच्या आत ही योजना राबविली तरच खऱ्या अर्थाने या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळेल असे सुध्दा स्पष्ट केले आहे. वरुन राजा व देवाच्या कृपेने पाऊस पडल्याबद्दल त्यांचे आभार म्हणून आमदार रवि राणा यांनी संपूर्ण शेतकऱ्यांच्या उपस्थितीत जलपुजन सुध्दा केले. शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये यासाठी शासनाने शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात रेशन देण्याचा निर्णय घेतला आहे. जे शेतकरी अन्न सुरक्षा योजना २०१३ या अंतर्गत समाविष्ट होऊ शकले नाही, अशा शेतकऱ्यांना व कुटुंबातील सर्व सदस्यांना प्रतिमाह पाच किलो धान्य सवलतीच्या दरात देण्याची १५ आॅगस्ट रोजी पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी जिल्ह्यात शुभारंभ केला होता. आता सर्व तालुकास्तरावर संबंधित लोकप्रतिनिधींच्या हस्ते लाभार्थी शेतकऱ्यांना रेशन धान्याचे वाटप करण्यात येत आहे.याप्रसंगी गोकुलदास उपाध्याय, हर्षद वाचासुंदर, संजय चुनकिकर, राजू तेलमोरे, प्रकाश खर्चान, राजू हरणे, मिलींद अवघड, शंकर डोंगरे, किरण भोपसे, अनिल तिडके, प्रदिप मोहोड, चंदु पाटील, रामदास रंगारी, श्रीकृष्ण पाटील, सुमित गुल्हाने, महेंद्र सिरसाट, दिनेश इंगळे, गुरुदास दुर्गे, पद्माकर गुल्हाणे, राजु रोडगे, देवानंद इंगळे व आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.