शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमादरम्यान झाला गोळीबार  
3
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
4
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
5
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
6
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
7
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
8
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
9
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
10
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
11
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
12
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
13
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
14
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
15
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
16
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
17
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
18
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
19
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
20
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता

शेतकऱ्यांना ७/१२ वर अल्पदरात गहू, तांदूळ

By admin | Updated: August 23, 2015 00:37 IST

अमरावती व भातकुली तालुक्यातील शेतकरी-शेतमजुरांना शासनांच्या अन्न सुरक्षा योजनेमध्ये प्रत्येक शेतकऱ्याला ७/१२वर शासनातर्फे दोन रुपये किलो गहू व तीन रुपये किलो तांदुळ

अमरावती : अमरावती व भातकुली तालुक्यातील शेतकरी-शेतमजुरांना शासनांच्या अन्न सुरक्षा योजनेमध्ये प्रत्येक शेतकऱ्याला ७/१२वर शासनातर्फे दोन रुपये किलो गहू व तीन रुपये किलो तांदुळ अशाप्रमाणे दिले जाईल. या योजनेचा शुभारंभ नुकताच आमदार रवि राणा यांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये अमरावती व भातकुली तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांनी सहभाग दर्शवीला. यावेळी आमदार रवि राणा यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी हितगुज करुन व त्यांची मते जाणून या संपूर्ण योजनेची विस्तारपूर्वक माहिती दिली. तसेच या योजनेचा लाभ प्रत्येक शेतकऱ्याला तातडीने मिळावा. याकरीता तहसिलदार, तलाठी व मंडळ अधिकारी यांना गावा-गावात जाऊन शेतकऱ्यांना ७/१२ वाटून हि योजना घरा घरात पोहचविण्याकरीता १५ दिवसाच्या आत राबविण्याचे आदेश दिले. जर १५ दिवसाच्या आत ही योजना राबविली तरच खऱ्या अर्थाने या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळेल असे सुध्दा स्पष्ट केले आहे. वरुन राजा व देवाच्या कृपेने पाऊस पडल्याबद्दल त्यांचे आभार म्हणून आमदार रवि राणा यांनी संपूर्ण शेतकऱ्यांच्या उपस्थितीत जलपुजन सुध्दा केले. शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये यासाठी शासनाने शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात रेशन देण्याचा निर्णय घेतला आहे. जे शेतकरी अन्न सुरक्षा योजना २०१३ या अंतर्गत समाविष्ट होऊ शकले नाही, अशा शेतकऱ्यांना व कुटुंबातील सर्व सदस्यांना प्रतिमाह पाच किलो धान्य सवलतीच्या दरात देण्याची १५ आॅगस्ट रोजी पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी जिल्ह्यात शुभारंभ केला होता. आता सर्व तालुकास्तरावर संबंधित लोकप्रतिनिधींच्या हस्ते लाभार्थी शेतकऱ्यांना रेशन धान्याचे वाटप करण्यात येत आहे.याप्रसंगी गोकुलदास उपाध्याय, हर्षद वाचासुंदर, संजय चुनकिकर, राजू तेलमोरे, प्रकाश खर्चान, राजू हरणे, मिलींद अवघड, शंकर डोंगरे, किरण भोपसे, अनिल तिडके, प्रदिप मोहोड, चंदु पाटील, रामदास रंगारी, श्रीकृष्ण पाटील, सुमित गुल्हाने, महेंद्र सिरसाट, दिनेश इंगळे, गुरुदास दुर्गे, पद्माकर गुल्हाणे, राजु रोडगे, देवानंद इंगळे व आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.