शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
3
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
4
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
5
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
6
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
7
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
8
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
9
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
10
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
11
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
12
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
13
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
14
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
15
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
16
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
17
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
18
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
19
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
20
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं

झोपडपट्टी दादा एक वर्षासाठी तुरुंगात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 22:23 IST

कुख्यात गुन्हेगार अशोक उत्तम सरदार (३४, रा.जेवडनगर) याच्याविरुद्ध एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. त्याला एक वर्षासाठी तुरुगांत स्थानबद्ध केले आहे.

ठळक मुद्देझोपडपट्टी दादा एक वर्षासाठी तुरुंगात

xलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कुख्यात गुन्हेगार अशोक उत्तम सरदार (३४, रा.जेवडनगर) याच्याविरुद्ध एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. त्याला एक वर्षासाठी तुरुगांत स्थानबद्ध केले आहे.राजापेठ हद्दीत दादागिरी करणारा अशोक सरदार हा सन २००५ पासून गुन्हेगारीत सक्रिय आहे. शस्त्रासह प्राणघातक हल्ले, गैरकायद्याची मंडळी जमवून हल्ले करणे, हत्या, गंभीर दुखापत करणे, अश्लील शिवीगाळ करून मारण्याची धमकी देणे, शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे, घरफोडी, जबरी चोरी, जुगार, अवैध दारूची विक्री अशाप्रकारचे अशोक सरदारविरुद्ध १७ गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. राजापेठसह फ्रेजरपुरा व बडनेरा हद्दीतील हे गुन्हे आहेत. अशोक सरदारविरुद्ध अनेकदा प्रतिबंधक कारवाया करण्यात आल्या आहेत. मात्र, त्यालाही जुमानत नसल्याचे पोलिसांना आढळून आले आहे. यापूर्वी त्याला तडीपार करण्यात आले होते. मात्र त्यात कोणताही बदल झाला नाही. त्याच्या दहशतीमुळे सर्वसामान्य नागरिक दहशतीत आले होते. त्याच्यासंदर्भात अनेक नागरिकांच्या तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने राजापेठचे ठाणेदार किशोर सूर्यवंशी यांनी पोलीस शिपाई पे्रम रावत यांच्या मदतीने अशोर सरदारविरुद्ध एमपीडीए कारवाईचा प्रस्ताव तयार केला. त्या प्रस्तावाची आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंजाब वंजारी व विधी अधिकारी विश्वास वैद्य यांच्यामार्फत पूर्तता करण्यात आली. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अशोक सरदारविरुद्ध एमपीडीएची कारवाईची शिफारस पोलीस उपायुक्त शशिकांत सातव यांनी पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांच्याकडे केली. त्यानुसार पोलीस आयुक्तांनी शनिवारी १६ मार्च रोजी अशोक सरदारच्या स्थानबद्धचे आदेश पारीत केले. त्यानुसार पोलीस निरीक्षक किशोर सूर्यवंशी यांनी अशोक सरदारची जिल्हा मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली. अशोक सरदारला आता वर्षभर जेलमध्ये राहावे लागणार आहे.दहशतीतून सुटकाझोपडपट्टी दादा अशोक सरदार तुरुगांत गेल्याने राजापेठ ठाण्याच्या हद्दीतील नागरिकांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. मद्यप्राशन करून नागरिकांना नाहक त्रास देणे, मारहाण करून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणारा अशोक सरदारने तुरुगांत गेल्याने नागरिकांनी या दहशतीतून सुटका झाल्याचे समाधान व्यक्त केले