शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

कालवा परिसरात झाडांची कत्तल

By admin | Updated: January 20, 2016 00:30 IST

नजीकच्या खतिजापूर येथील लघु प्रकल्पाच्या कॅनलवरील झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल करून कार्यालयातील मजुराने ती झाडे परस्पर विकली, अशी तक्रार शेतकऱ्याने केली आहे.

शेतकऱ्याच्या तक्रारीला केराची टोपली : कार्यालयीन मजुराचा प्रतापनरेंद्र जावरे परतवाडानजीकच्या खतिजापूर येथील लघु प्रकल्पाच्या कॅनलवरील झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल करून कार्यालयातील मजुराने ती झाडे परस्पर विकली, अशी तक्रार शेतकऱ्याने केली आहे. परसापूर ते टेंब्रुसोंडा रस्त्यावरील खतिजापूर ग्रामपंचायतींतर्गत लघुसिंचन प्रकल्प आहे. खतिजापूर, परसापूर व टवलार परिसरातील जवळपास पाचशे हेक्टर शेतजमिनीला ओलीत देण्यासाठी याचा वापर करण्यात येतो. १९६५ मध्ये तयार करण्यात आलेल्या या लघु प्रकल्पातून शेतकऱ्यांना सिंचनाची व्यवस्था व्हावी, हा उद्देश होता. मात्र, पाणीवाटप संस्थांचा मनमर्जी कारभारामुळे शेतकऱ्यांचीपिके वाळत असल्याचा गंभीर आरोप देखील शेतकऱ्यांनी केलवा आहे. खतिजापूर लघु प्रकल्पातून शेतात पाणी पोेहोचविण्यासाठी कॅनल तयार करण्यात आले. मागील ५० वर्षांत त्यावर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले. आता ती झाडे मोठी झाली आहेत. तर कॅनलमध्ये मात्र झुडुपांचे साम्राज्य वाढले आहे. या संपूर्ण प्रकरणाची तक्रार झाल्यावर अचलपूर येथील तहसीलदारांनी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात करण्याचे आदेश दिले होते, असे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.उपविभागीय अभियंत्याची टोलवाटोलवीया संपूर्ण प्रकरणाबाबत अमरावती येथील पाटबंधारे उपविभागातील उप अभियंता बी.बी. तिनखेडे यांच्याशी लोकमतने याबाबत संपर्क केला असता त्यांनी केवळ तीन झाडे वाऱ्याने पडली होती. त्यांचा लिलाव करण्यात आल्याचे सांगितले. प्रारंभी त्यांनी या संपूर्ण प्रकरणाबाबत अनभिज्ञता दर्शविली. सदर मजूर गेल्या अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी असल्याने त्याचे मनोबल वाढल्याचे तक्रारकर्त्याचे म्हणणे आहे. लिलाव न करताच विल्हेवाट खतिजापूर प्रकल्पाच्या कॅनलच्या देखरेखीची जबाबदारी सुरेश पडोळे नामक कार्यालयीन मजुरावर आहे. हा मजूर येथील शासकीय निवासस्थानात राहतो. मात्र, त्याने जवळपास ५० पेक्षा अधिक झाडांची विनापरवानगी कत्तल केल्याची तक्रार कार्यकारी अभियंता, उपविभागीय अभियंता, तहसीलदार यांच्याकडे शेतकरी महेंद्र माधव रोडे यांनी केली आहे. इतकेच नव्हे तर या झाडांचा लिलाव न करता त्यांची परस्परच विल्हेवाटही लावल्याचे तक्रारीत म्हटले आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी या बाबीची कोणतीच दखल घेतलेली नाही, असेही त्यांचे म्हणणे आहे. या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेऊन अवैध वृक्षतोड कोणी व कधी केली याची चौकशी करण्यात येईल तर पंचवीसशे रूपयांमध्ये वन विभागाकडून परवानगी घेऊन तीन झाडांचा लिलाव करण्यात आला. बी.बी. तिनखेडे, उपविभागीय अभियंता, पाटबंधारे उप-विभाग, अमरावती.