शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

कातडी व्यवसायावर अवकळा

By admin | Updated: April 5, 2015 00:24 IST

शासनाने गोेवंश हत्याबंदी कायदा लागू केल्यामुळे कातडी व्यवसायावर अवकळा आली आहे.

गोवंश हत्याबंदीचा परिणाम : बेलोरा येथील बाजारपेठेत शुुकशुुकाटअमरावती : शासनाने गोेवंश हत्याबंदी कायदा लागू केल्यामुळे कातडी व्यवसायावर अवकळा आली आहे. विदर्भात सर्वात मोठी कातड्याची बाजारपेठ असलेल्या बेलोरा (विमानतळ) येथे शुकशुकाट पसरला आहे. कातडे व्यावसायिक हतबल झाले असून ते पर्यायी व्यवसायाच्या शोधात असल्याचे दिसून येत आहे.गोवंश हत्याबंदी कायदा लागू होण्यापूर्वी कातडी व्यवसाय भरभराटीवर होता. मात्र, राज्यात या कायद्याची अंमलबजावणी सुरु होताच पशुची कटाई कमी झाली आहे. बैल, रेडा आदींवर अंकुश लागल्याने कातडी व्यवसायावर याचा मोठा परिणाम झाला आहे. हजारो कोटी रुपयांची उलाढाल होणाऱ्या कातडी व्यवसायाचे प्रमुख केंद्र हे कोलकाता असून पशुंची कत्तली थांबल्याने अनेक व्यावसायिकांनी राज्याकडे पाठ फिरवली आहे. कातडी व्यवसायाशी निगडित असलेल्या व्यावसायिकांनी पर्यायी व्यवसायाची शोधमोहीम सुरु केली आहे. बेलोरा येथील कातड्याच्या बाजारपेठेत दर रविवारी कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असताना कातडे विक्रीकरिता येणे बंद झाले आहे. दुसरीकडे कुरेशी समाजाने कायदा सर्वश्रेष्ठ माणून मांसविक्री बंद केल्यामुळे पशुंची कत्तल थांबविली आहे. या सर्व बाबींमुळे कातडी व्यवसायावर अवकळा आल्याचे सध्याच्या बाजारपेठेतील स्थितीवरून दिसून येत आहे. हल्ली शेळी, मेंढी यांच्याच कातड्याची विक्री होत असून या कातड्यांना कमी प्रमाणात मागणी असल्याने खरेदीदार फिरकत नसल्याचे दिसून येते. हा प्रकार राज्यभरात सुरु असून आता पशुंच्या कत्तली करुन मांस विक्री करता येणे ही बाब अशक्य झाली आहे. (प्रतिनिधी)गोहत्या बंदी असलीच पाहिजे. मात्र, ज्या समूहाचा परंपरागत व्यवसाय हा कातडी, मांस विकणे आहे त्यांना रोजगारापासून वंचित ठेवणे संयुक्तिक नाही. काही समूहाचे खाद्यदेखील मांस असून नवीन गोवंश हत्याबंदी कायद्याने त्यांच्यावर गंडांतर आले आहे. - सलीम कुरेशी, कातडी व्यावसायिक, बडनेरा.हिंदू धर्मात गायीला अनन्य साधारण महत्त्व आहे. गाय, बैलाचे मांस खाण्यापेक्षा मांसाहार करणाऱ्यांनी शासन पुरस्कृत कोंबडी, शेळी, मेंढीचे मांस खाऊन उपजिविका भागवावी. गोवंश हत्याबंदी कायद्याने गाय, बैल, रेडा आदी पशुंना संरक्षण दिले आहे.- अरुण मोंढे, शहराध्यक्ष, विहिंप.