शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

कातडी व्यवसायावर अवकळा

By admin | Updated: April 5, 2015 00:24 IST

शासनाने गोेवंश हत्याबंदी कायदा लागू केल्यामुळे कातडी व्यवसायावर अवकळा आली आहे.

गोवंश हत्याबंदीचा परिणाम : बेलोरा येथील बाजारपेठेत शुुकशुुकाटअमरावती : शासनाने गोेवंश हत्याबंदी कायदा लागू केल्यामुळे कातडी व्यवसायावर अवकळा आली आहे. विदर्भात सर्वात मोठी कातड्याची बाजारपेठ असलेल्या बेलोरा (विमानतळ) येथे शुकशुकाट पसरला आहे. कातडे व्यावसायिक हतबल झाले असून ते पर्यायी व्यवसायाच्या शोधात असल्याचे दिसून येत आहे.गोवंश हत्याबंदी कायदा लागू होण्यापूर्वी कातडी व्यवसाय भरभराटीवर होता. मात्र, राज्यात या कायद्याची अंमलबजावणी सुरु होताच पशुची कटाई कमी झाली आहे. बैल, रेडा आदींवर अंकुश लागल्याने कातडी व्यवसायावर याचा मोठा परिणाम झाला आहे. हजारो कोटी रुपयांची उलाढाल होणाऱ्या कातडी व्यवसायाचे प्रमुख केंद्र हे कोलकाता असून पशुंची कत्तली थांबल्याने अनेक व्यावसायिकांनी राज्याकडे पाठ फिरवली आहे. कातडी व्यवसायाशी निगडित असलेल्या व्यावसायिकांनी पर्यायी व्यवसायाची शोधमोहीम सुरु केली आहे. बेलोरा येथील कातड्याच्या बाजारपेठेत दर रविवारी कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असताना कातडे विक्रीकरिता येणे बंद झाले आहे. दुसरीकडे कुरेशी समाजाने कायदा सर्वश्रेष्ठ माणून मांसविक्री बंद केल्यामुळे पशुंची कत्तल थांबविली आहे. या सर्व बाबींमुळे कातडी व्यवसायावर अवकळा आल्याचे सध्याच्या बाजारपेठेतील स्थितीवरून दिसून येत आहे. हल्ली शेळी, मेंढी यांच्याच कातड्याची विक्री होत असून या कातड्यांना कमी प्रमाणात मागणी असल्याने खरेदीदार फिरकत नसल्याचे दिसून येते. हा प्रकार राज्यभरात सुरु असून आता पशुंच्या कत्तली करुन मांस विक्री करता येणे ही बाब अशक्य झाली आहे. (प्रतिनिधी)गोहत्या बंदी असलीच पाहिजे. मात्र, ज्या समूहाचा परंपरागत व्यवसाय हा कातडी, मांस विकणे आहे त्यांना रोजगारापासून वंचित ठेवणे संयुक्तिक नाही. काही समूहाचे खाद्यदेखील मांस असून नवीन गोवंश हत्याबंदी कायद्याने त्यांच्यावर गंडांतर आले आहे. - सलीम कुरेशी, कातडी व्यावसायिक, बडनेरा.हिंदू धर्मात गायीला अनन्य साधारण महत्त्व आहे. गाय, बैलाचे मांस खाण्यापेक्षा मांसाहार करणाऱ्यांनी शासन पुरस्कृत कोंबडी, शेळी, मेंढीचे मांस खाऊन उपजिविका भागवावी. गोवंश हत्याबंदी कायद्याने गाय, बैल, रेडा आदी पशुंना संरक्षण दिले आहे.- अरुण मोंढे, शहराध्यक्ष, विहिंप.