शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

सहा तालुक्यांत दुष्काळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 22:01 IST

सरासरीपेक्षा कमी पाऊस व तीन आठवड्यांचा खंड यामुळे जिल्ह्यातील सहा तालुक्यांना दुष्काळाचा प्रथम ट्रिगर लागू झाला. मात्र, दुष्काळाच्या दुसऱ्या ट्रिगरनंतर तालुकास्तरावर १० गावे रँडम पद्धतीने निवडून विहित मापदंडानुसार सत्यापन करावे लागणार आहे. यासाठी क्षेत्रीय व तालुका समितीला अहवाल जिल्हा समित्यांना पाठवावा लागणार आहे.

ठळक मुद्देमोबाईल अ‍ॅपद्वारे छायाचित्र अन् विश्लेषण : कृषी आयुक्तांचे सर्वेक्षणाचे आदेश

गजानन मोहोड ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सरासरीपेक्षा कमी पाऊस व तीन आठवड्यांचा खंड यामुळे जिल्ह्यातील सहा तालुक्यांना दुष्काळाचा प्रथम ट्रिगर लागू झाला. मात्र, दुष्काळाच्या दुसऱ्या ट्रिगरनंतर तालुकास्तरावर १० गावे रँडम पद्धतीने निवडून विहित मापदंडानुसार सत्यापन करावे लागणार आहे. यासाठी क्षेत्रीय व तालुका समितीला अहवाल जिल्हा समित्यांना पाठवावा लागणार आहे.शासनाने आता दुष्काळ घोषित करण्यासाठी ७ आॅक्टोबर २०१७ च्या निकषाप्रमाणे नवी कार्यपद्धती निश्चित केली आहे. त्यानुसार खरिपाचा दुष्काळ ३१ आॅक्टोबरला शासन जाहीर करणार आहे.जिल्ह्यातील सहा तालुक्यांत अद्यापही ७५ टक्क्यांच्या आत पावसाची नोंद आहे. यामध्ये सर्वात कमी मोर्शी ६५.२ टक्के, वरुड ६५.४, भातकुली ७१.९, अंजनगाव सुर्जी ७३, अचलपूर ७४.३ व चिखलदरा तालुक्यात ६६.१ टक्के पावसाची नोंद झाली. त्यामुळे या तालुक्यांत आता सर्वेक्षण/सत्यापन होणार आहे.दुष्काळाची दुसरी कळ लागू झालेल्या सहा तालुक्यातील १० गावे जिल्हाधिकारी रँडम पद्धतीने निश्चित करतील. या गावामधील प्रमुख पिकांची निवड करताना प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या प्रमुख पीक ठरविण्याच्या व्याख्येनुसार गावात एकूण पीकपेरणी झालेल्या क्षेत्रापैकी २५ टक्के ज्या पिकाचे क्षेत्र आहे, ते पीक प्रमुख पीक ठरविण्यात येणार आहे.निवड केलेल्या गावातील प्रमुख पिकांचा सर्व्हे/गट नंबर ठरविताना गावातील एकूण सव्हे /गट नंबरची संख्या विचारात घेतली जाणार आहे व या संख्येमधून रँडम पद्धतीने हा गट निवडण्यात येणार आहे आणि हे पीक एक हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर असल्याची खात्री करण्यात येणार आहे. या गटामधील पीक, शेतकºयांची माहिती, पिकाची सद्यस्थिती, पिकाचे छायाचित्र याविषयीची माहिती मोबाइल अ‍ॅपवर अपलोड करावी लागणार आहे. खरीप हंगामातील पिकांची कापणी करण्यापूर्वी अशाप्रकारे सर्वेक्षण/सत्यापन करावे लागणार आहे.सत्यापनासाठी मोबाईल अ‍ॅपमहाराष्ट्र सुदूर सर्वेक्षण यंत्रणा (एमआरएसएसी) यांच्यामार्फत सत्यापनासाठी मोबाइल अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. तूर्तास पीक विमा योजनेसाठी वापरात येणाºया अ‍ॅपद्वाराच सत्यापन करण्याच्या सूचना आहेत. अशा क्षेत्रातील पिकांचे सद्यस्थिती दर्शविणारे छायाचित्र व सर्वेक्षण करणारे क्षेत्र येईल अशा प्रकारचे छायाचित्र घ्यावे लागणार आहे व संगणकीय प्रणालीमध्ये अपलोड करून त्याचे विश्लेषण करावे लागेल.जिल्ह्याचाच समावेश करावाअलीकडच्या पावसाचा फायदा तूर पिकाला झाला. मात्र, पावसाचे १२० दिवसापैकी ११० दिवस टक्केवारी ही ७५ टक्क्यांच्या आतच राहिली व खरिपावर संकट ओढवले. याचा विचार जिल्हा समितीने करावा व कृषी आयुक्तालयास अहवाल सादर करावा, अशी शेतकºयांची मागणी आहे.

अशी आहे क्षेत्रीय व तालुका समितीरँडम पद्धतीने निवडलेल्या गावातील सत्यापनासाठी आता मंडळ कृषी अधिकारी, कृषी अधिकारी (पंचायत), व मंडळ अधिकारी (महसूल) यांची क्षेत्रीय स्तरावर समिती आहे. यांचा अहवाल तालुक्याला गेल्यावर तहसीलदार, गट विकास अधिकारी,व तालुका कृषी अधिकारी यांची तालुका समिती रॅण्डम पद्धतीने एका गावाची तपासणी करून अहवाल जिल्हा समितीला पाठविणार आहे.सहा तालुक्यात अपुऱ्या पावसाअभावी दुष्काळस्थिती आहे. या ठिकाणी रँडम पद्धतीने १० गावांची निवड करून ‘एमआरएसएसी’च्या मोबाइल अ‍ॅपद्वारे छायाचित्र व त्याचे विश्लेषण करून जिल्हा समितीला अहवाल पाठविली जाईल.- अनिल इंगळेजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी