शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

चैत्यभूमीसाठी रेल्वेच्या सहा विशेष गाड्या

By admin | Updated: November 29, 2015 00:57 IST

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी ६ डिसेंबर रोजी दादर येथील चैत्यभूमीवर ...

६ ते ८ डिसेंबर दरम्यान धावणार : मुंबई, दादर येथून सुरु करण्याचा निर्णयअमरावती : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी ६ डिसेंबर रोजी दादर येथील चैत्यभूमीवर अनुयायांची होणारी गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने नागपूर-मुंबई दरम्यान सहा विशेष गाड्या सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. ६ ते ८ डिसेंबर दरम्यान मुंबईहून या गाड्या सुटणार असल्याची माहिती भुसावळ मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.दादर येथील चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी ठेवण्यात आल्या असून या स्थळाचे दर्शन घेण्यासाठी लाखो अनुयायी जातात. विदर्भातून अनुयायांची चैत्यभूमीवर मोठ्या प्रमाणात गर्दी उसळते. त्यामुळे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मुंबईला ये-जा करणाऱ्या नियमित प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. रेल्वे गाड्यांमध्ये आरक्षणाचे तिकीट घेऊनही नियमित प्रवास करणाऱ्यांना जागा मिळत नाही. त्यामुळे १ ते १० डिसेंबर दरम्यान मुंबईकडे प्रवास करणारे अनेक नियमित प्रवासी रेल्वेने ये-जा करीत नाहीत. परिणामी रेल्वे प्रशासनाने यंदा सहा विशेष गाड्या सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर ते मुंबई दरम्यान या विशेष गाङ्या धावणार आहेत. परतीच्या प्रवासाठी या रेल्वे गाड्यांची व्यवस्था करण्यात आल्याचे भुसावळ मध्ये रेल्वे वाणिज्य विभागाने कळविले. (प्रतिनिधी)मुंबईहून अशा सुटतील रेल्वे गाड्या६ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजून ५ मिनिटांनी छत्रपती शिवाजी टर्मिनस ते नागपूर (गाडी क्र. ०१०६९) ही गाडी सुटेल. ही गाडी नागपूर येथे दुसऱ्या दिवशी ७ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी पोहोचेल. तसेच याच दिवशी गाडी क्र.०१०७१ ही छत्रपती शिवाजी टर्मिनस ते सेवाग्राम दरम्यानची गाडी सायंकाळी ६ वाजून ४० मिनिटांंनी सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी ७ डिसेंबर रोजी सेवाग्राम येथे सकाळी १० वाजून ३० मिनिटांनी पोहोचेल. ७ डिसेंबर रोजी दादर ते नागपूर (गाडी क्र.०१०७३) दुपारी १२ वाजून ४० मिनिटांनी सुटेल. मुंबई ते नागपूर (गाडी क्र.०१०७५) ही दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांनी सुटणार असून ही गाडी दुसऱ्या दिवशी रात्री ३ वाजून ३० मिनिटांनी पोहोचेल. ८ डिसेंबर रोजी दादर ते नागपूर (गाडी क्र. ०१०७३) ही रात्री १२ वाजून ४० मिनिटांनी सुटणार असून नागपूर येथे ९ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता पोहोचणार आहे.येथे थांबतील विशेष गाड्याछत्रपती शिवाजी टर्मिनस (मुंबई), दादर, कल्याण, कसारा, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, जलंब, अकोला, मुर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव, पुलगाव, वर्धा, सेवाग्राम, अजनी, नागपूर.