शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

चैत्यभूमीसाठी रेल्वेच्या सहा विशेष गाड्या

By admin | Updated: November 29, 2015 00:57 IST

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी ६ डिसेंबर रोजी दादर येथील चैत्यभूमीवर ...

६ ते ८ डिसेंबर दरम्यान धावणार : मुंबई, दादर येथून सुरु करण्याचा निर्णयअमरावती : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी ६ डिसेंबर रोजी दादर येथील चैत्यभूमीवर अनुयायांची होणारी गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने नागपूर-मुंबई दरम्यान सहा विशेष गाड्या सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. ६ ते ८ डिसेंबर दरम्यान मुंबईहून या गाड्या सुटणार असल्याची माहिती भुसावळ मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.दादर येथील चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी ठेवण्यात आल्या असून या स्थळाचे दर्शन घेण्यासाठी लाखो अनुयायी जातात. विदर्भातून अनुयायांची चैत्यभूमीवर मोठ्या प्रमाणात गर्दी उसळते. त्यामुळे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मुंबईला ये-जा करणाऱ्या नियमित प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. रेल्वे गाड्यांमध्ये आरक्षणाचे तिकीट घेऊनही नियमित प्रवास करणाऱ्यांना जागा मिळत नाही. त्यामुळे १ ते १० डिसेंबर दरम्यान मुंबईकडे प्रवास करणारे अनेक नियमित प्रवासी रेल्वेने ये-जा करीत नाहीत. परिणामी रेल्वे प्रशासनाने यंदा सहा विशेष गाड्या सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर ते मुंबई दरम्यान या विशेष गाङ्या धावणार आहेत. परतीच्या प्रवासाठी या रेल्वे गाड्यांची व्यवस्था करण्यात आल्याचे भुसावळ मध्ये रेल्वे वाणिज्य विभागाने कळविले. (प्रतिनिधी)मुंबईहून अशा सुटतील रेल्वे गाड्या६ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजून ५ मिनिटांनी छत्रपती शिवाजी टर्मिनस ते नागपूर (गाडी क्र. ०१०६९) ही गाडी सुटेल. ही गाडी नागपूर येथे दुसऱ्या दिवशी ७ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी पोहोचेल. तसेच याच दिवशी गाडी क्र.०१०७१ ही छत्रपती शिवाजी टर्मिनस ते सेवाग्राम दरम्यानची गाडी सायंकाळी ६ वाजून ४० मिनिटांंनी सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी ७ डिसेंबर रोजी सेवाग्राम येथे सकाळी १० वाजून ३० मिनिटांनी पोहोचेल. ७ डिसेंबर रोजी दादर ते नागपूर (गाडी क्र.०१०७३) दुपारी १२ वाजून ४० मिनिटांनी सुटेल. मुंबई ते नागपूर (गाडी क्र.०१०७५) ही दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांनी सुटणार असून ही गाडी दुसऱ्या दिवशी रात्री ३ वाजून ३० मिनिटांनी पोहोचेल. ८ डिसेंबर रोजी दादर ते नागपूर (गाडी क्र. ०१०७३) ही रात्री १२ वाजून ४० मिनिटांनी सुटणार असून नागपूर येथे ९ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता पोहोचणार आहे.येथे थांबतील विशेष गाड्याछत्रपती शिवाजी टर्मिनस (मुंबई), दादर, कल्याण, कसारा, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, जलंब, अकोला, मुर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव, पुलगाव, वर्धा, सेवाग्राम, अजनी, नागपूर.