शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

अपहरणप्रकरणी सहा जणांना तीन वर्षांचा कारावास

By admin | Updated: January 17, 2015 00:50 IST

अपहरण प्रकरणात शुक्रवारी न्यायालयाने सहा आरोपींना तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली असून यामध्ये नगरसेवक विलास इंगोले ...

अमरावती : अपहरण प्रकरणात शुक्रवारी न्यायालयाने सहा आरोपींना तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली असून यामध्ये नगरसेवक विलास इंगोले व त्यांचा भाऊ नितीन इंगोले यांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. ४ फेबु्रवारी २०१० रोजी शहर कोतवाली ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली होती. सुबोध कॉलनीतील रहिवासी तत्कालीन उपशिक्षणाधिकारी पुडंलिक बापू तुरखेडे यांचे २ फेब्रुुवारी २०१० मध्ये अपहरण करुन आरोपींनी त्यांच्याकडून खंडणी वसुलीचा प्रयत्न केला. या घटनेची तक्रार ४ फेब्रुवारी २०१० रोजी पुंडलिक तुरखेडे यांनी शहर कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल केली. तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी १० आरोपींविरुध्द भादंविच्या १२० (ब), ३४२, ३५५, ४५२, ३८६, ३८७, ३८८, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली होती. त्यावेळी तत्कालीन पोलीस निरीक्षक वसंत शिरभाते यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सीमा दाताळकर यांच्याकडे तपासाची सूत्रे होती. पोलिसांनी एप्रिल २०१० मध्ये न्यायालयात चार्जशिष्ट दाखल केल्यावर न्यायालयाने २४ साक्षीदार तपासले. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून शुक्रवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.एम. भोसले यांच्या न्यायालयाने विलास महादेव इंगोले, नितीन इंगोले (दोन्ही राहणार बुधवारा), अश्विनी भास्कर देशमुख (२९,रा. नंदनवन कॉलनी), व आशिष प्रकाश वानखड े(२६,रा. आमला विश्वेश्वर) यांची निर्दोष सुटका केली आहे. तर आरोपी अफसर खा मीय्या खा (४२,रा. पठाणपुरा) नंदकिशोर मधुकर राऊत (३५,रा. नंदनवन कॉलनी), विशाळ पंजाब भंडागे(२५,रा. घाटलाडकी), अमोल बाबाराव रिठे (२५, रा. वरुडा), संदीप ऊर्फ पप्पू नंदलाल बंग (३८,रा. जुना कॉटन मार्केट रोड) व सचिन नामदेव भागवत (३०, रा. निरुळ गंगामाई) यांना ३ वर्षांची शिक्षा तसेच प्रत्येकी २२ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक वर्षांचा कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सरकारी पक्षातर्फे अमर देशमुख यांनी युक्तिवाद केला असून त्यांचे सहकारी महावीर भंडारी यांनी सहकार्य केले आहे. (प्रतिनिधी)