शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
3
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
4
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
5
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
6
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
7
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
8
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
9
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
10
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
11
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
12
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
13
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
14
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
15
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
16
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
17
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
18
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
19
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
20
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!

अपहरणप्रकरणी सहा जणांना तीन वर्षांचा कारावास

By admin | Updated: January 17, 2015 00:50 IST

अपहरण प्रकरणात शुक्रवारी न्यायालयाने सहा आरोपींना तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली असून यामध्ये नगरसेवक विलास इंगोले ...

अमरावती : अपहरण प्रकरणात शुक्रवारी न्यायालयाने सहा आरोपींना तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली असून यामध्ये नगरसेवक विलास इंगोले व त्यांचा भाऊ नितीन इंगोले यांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. ४ फेबु्रवारी २०१० रोजी शहर कोतवाली ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली होती. सुबोध कॉलनीतील रहिवासी तत्कालीन उपशिक्षणाधिकारी पुडंलिक बापू तुरखेडे यांचे २ फेब्रुुवारी २०१० मध्ये अपहरण करुन आरोपींनी त्यांच्याकडून खंडणी वसुलीचा प्रयत्न केला. या घटनेची तक्रार ४ फेब्रुवारी २०१० रोजी पुंडलिक तुरखेडे यांनी शहर कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल केली. तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी १० आरोपींविरुध्द भादंविच्या १२० (ब), ३४२, ३५५, ४५२, ३८६, ३८७, ३८८, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली होती. त्यावेळी तत्कालीन पोलीस निरीक्षक वसंत शिरभाते यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सीमा दाताळकर यांच्याकडे तपासाची सूत्रे होती. पोलिसांनी एप्रिल २०१० मध्ये न्यायालयात चार्जशिष्ट दाखल केल्यावर न्यायालयाने २४ साक्षीदार तपासले. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून शुक्रवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.एम. भोसले यांच्या न्यायालयाने विलास महादेव इंगोले, नितीन इंगोले (दोन्ही राहणार बुधवारा), अश्विनी भास्कर देशमुख (२९,रा. नंदनवन कॉलनी), व आशिष प्रकाश वानखड े(२६,रा. आमला विश्वेश्वर) यांची निर्दोष सुटका केली आहे. तर आरोपी अफसर खा मीय्या खा (४२,रा. पठाणपुरा) नंदकिशोर मधुकर राऊत (३५,रा. नंदनवन कॉलनी), विशाळ पंजाब भंडागे(२५,रा. घाटलाडकी), अमोल बाबाराव रिठे (२५, रा. वरुडा), संदीप ऊर्फ पप्पू नंदलाल बंग (३८,रा. जुना कॉटन मार्केट रोड) व सचिन नामदेव भागवत (३०, रा. निरुळ गंगामाई) यांना ३ वर्षांची शिक्षा तसेच प्रत्येकी २२ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक वर्षांचा कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सरकारी पक्षातर्फे अमर देशमुख यांनी युक्तिवाद केला असून त्यांचे सहकारी महावीर भंडारी यांनी सहकार्य केले आहे. (प्रतिनिधी)