शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

सांस्कृतिक भवन अपहार प्रकरणी सहा जणांवर फौजदारी

By admin | Updated: April 28, 2015 00:22 IST

येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात भाड्याची रक्कम वसूल करुन ती तिजोरीत जमा न करता ...

आयुक्तांचे आदेश : २० लाखांची रक्कम झाली होती गहाळअमरावती : येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात भाड्याची रक्कम वसूल करुन ती तिजोरीत जमा न करता झालेल्या २० लाख रुपयांच्या अपहारप्रकरणी महापालिकेतील सहा कर्मचाऱ्यांवर फौजदारी दाखल करण्याचे आदेश आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी दिले आहेत. पोलिसांत तक्रार करण्याची जबाबदारी उपायुक्तांवर सोपविली आहे. सुटीवरुन परत येताच आयुक्तांनी कारवाईचा बडगा उचलला आहे. फौजदारीच्या कारवाईने अन्य कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.तत्कालीन बाजार परवाना अधीक्षक एस. ए. भागवत यांच्यासह आर. एन. वाकपांजर, श्रीराम आगासे, सतीश देशमुख, अनिकेत मिश्रा, पंकज डोनारकर या सहा जणांवर फौजदारी कारवाईचे आदेश देण्यात आले आहे. उपायुक्त चंदन पाटील यांनी सोमवारी सामान्य प्रशासन विभागाला सोबत घेत शहर कोतवाली पोलीस ठाण्यात २० लाखांचा अपहार झाल्याप्रकरणी फौजदारी दाखल करण्याची तयारी चालविली होती. संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनाचा अपहार प्रदीप बाजड यांनी उघडकीस आणला आहे.सांस्कृतिक भवनाची देखभाल, दुरुस्ती ही यापूर्वी महापालिका प्रशासनाकडे होती. पर्यायाने महापालिकेचा बाजार परवाना विभाग सांस्कृतिक भवनाचे कामकाज बघायचे. मात्र, १३ जुलै २०११ ते ३१ मार्च २०१२ या दरम्यान सांस्कृतिक भवनात झालेल्या कार्यक्र माच्या नोंदी पुस्तकात घेतल्या नाहीत. परंतु भाड्याची रक्कम वसूल केल्याची बाब तपासादरम्यान उघडकीस आली. वीज रिडींग, चालान पुस्तकात तफावत आढळली असून भाडे वसूल केले असताना त्याचा पावती फाडल्या नाहीत. अपहार सतत होत असताना याकडे वरिष्ठांनी दुर्लक्ष केल्याचे सुद्धा स्पष्ट झाले आहे. विवरणपत्रात भाड्याची रक्कम नमूद नसल्याचे निदर्शनास आले आहे. सांस्कृतिक भवनाच्या अपहाराची चौकशी व्हावी, ही मागणी सदस्यांनी सातत्याने रेटून धरली. असे आले अपहार प्रकरण उघडकीस!संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात अपहार झाल्याचे प्रकरण नगरसेवक प्रदीप बाजड यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे. बाजड हे सन- २०१२ मध्ये निवडून आल्यानंतर ते एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सांस्कृतिक भवनात गेले होते. मात्र नाटक, लग्न सोहळे आदी कार्यक्रम झाल्यानंतरही नोंद कोठेही बाजड यांना दिसली नाही. तेव्हा काहीतरी गडबड आहे, ही शंका त्यांना आली. परिणामी बाजड यांनी अपहाराचा विषय प्रारंभी स्थायी समिती त्यानंतर आमसभेत प्रस्तावाच्या रुपाने मांडला. सांस्कृतिक भवनात अपहार झाल्याप्रकरणीची फाईल सर्वप्रथम पुढे आली तेंव्हा मलाच धक्का बसला. कसा कारभार सुरु होता, याचे आश्चर्य वाटले. ज्यावेळी भाडे वसूल केले नंतर ती रक्कम जमा करण्यात आली नाही, तेंव्हाच हे प्रकरण पोलिसात दिले पाहिजे होते. मात्र, उशिरा का होईना दोषींवर फौजदारी कारवाई होईल.-चंद्रकांत गुडेवारआयुक्त, महापालिका