शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

सैराट झालं जी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 23:57 IST

वडाळी स्थित बांबू गार्डन प्रेमीयुगुलांचा अड्डाच बनला आहे. येथे तैनात पोलीस ‘वॉच’ ठेवून दररोज चार ते पाच प्रेमीयुगुलांना पकडून फ्रेजरपुरा ठाण्यात आणतात. ठाण्याच्या आवारात प्रेमीयुगुलासह त्यांच्या नातेवाइकांची गर्दी जमली की, त्यांच्याकडे पाहूनच ठाण्यात येणारे पोलीस असो की नागरीक, प्रत्येकाच्या तोंडी 'सैराट आहे का?' हा प्रश्न येतो.

ठळक मुद्देचार महिन्यांत २५९ प्रेमीयुगुलांना पकडलेबांबू गार्डन बनले ‘लव्ह स्पॉट’

वैभव बाबरेकर।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : वडाळी स्थित बांबू गार्डन प्रेमीयुगुलांचा अड्डाच बनला आहे. येथे तैनात पोलीस ‘वॉच’ ठेवून दररोज चार ते पाच प्रेमीयुगुलांना पकडून फ्रेजरपुरा ठाण्यात आणतात. ठाण्याच्या आवारात प्रेमीयुगुलासह त्यांच्या नातेवाइकांची गर्दी जमली की, त्यांच्याकडे पाहूनच ठाण्यात येणारे पोलीस असो की नागरीक, प्रत्येकाच्या तोंडी 'सैराट आहे का?' हा प्रश्न येतो. संबंधित पोलीससुद्धा 'सैराट झालं जी...’ असे सूचक उत्तर स्मितहास्यासह दिल्याशिवाय राहत नाहीत.‘सैराट’ या गाजलेल्या चित्रपटाने तरुणाईसोबतच अल्पवयीन मुला-मुलींमध्ये आगळीवेगळी छबी तयार केली आहे. या चित्रपटानंतर कोठेही प्रेमीयुगुल दिसले की, 'सैराट आहेत ते' अशी प्रतिक्रिया हमखास ऐकायला मिळते. प्रेम आंधळ असतं, प्रेमासाठी वाटेल ते करायला आजची युवा पिढी तयारच असते, लपूनछपून प्रेम करण्याचा काही आगळावेगळाच अनुभव असतो. सार्वजनिक ठिकाणी प्रेम व्यक्त करण्यास मुभा नाही. त्यामुळे बरेचसे प्रेमीयुगुल एकमेकांच्या सान्निध्यात काही क्षण राहण्यासाठी जागा शोधतात. ती जागा जर निसर्गरम्य असेल, तर अशा वातावरणात प्रेमालाप करण्याची संधी प्रेमीयुगुलांना मिळते. त्यामुळे प्रेमीयुगुलांचा सर्वाधिक वावर असणारा परिसर फे्रजरपुरा ठाण्याच्या हद्दीत वडाळीतील बांबू गार्डन, मालटेकडी, सुपर एक्स्प्रेस हायवेकडील निवांत रस्ते व परिसर आहे. याच ठाण्याच्या हद्दीत प्रेमीयुगुलांना सैरसपाटा सर्वाधिक आहे. मागील चार महिन्यातील आकडेवारीवर लक्ष दिल्यास, नववर्षात ८ मेपर्यंत तब्बल २५९ प्रेमीयुगुलांना फ्रेजरपुरा पोलिसांनी पोलिसांनी पकडून ठाण्यात आणले आहे. यामध्ये सर्वाधिक प्रेमीयुगुल हे बांबू गार्डनमधून पकडण्यात आले.शहरात महिला सुरक्षेच्या दृष्टीने तयार केलेल्या चिडीमार पथक व दामिनी पथकाने या प्रेमीयुगुलांना पकडले आहे. या प्रेमीयुगुलांना ठाण्यात आणल्यानंतर त्यांच्या पालकांना किंवा परिचित व्यक्तींना बोलावून त्यांना कल्पना दिली जाते तसेच त्या प्रेमीयुगुलांना सक्त ताकीद देऊन पुन्हा असे न करण्याची समज देण्यात येते. निवांत ठिकाणी बसणाऱ्या प्रेमीयुगुलांवर संकट येऊ शकते, हे पोलिसांकडून स्पष्ट केले जाते. या प्रेमीयुगुलांचे पालक किंवा परिचीत जोपर्यंत ठाण्यात येत नाही, तोपर्यंत त्यांना ठाण्यातच बसून ठेवले जाते. त्यांचे नाव, पत्ता, मोबाइल क्रमांक अशी इत्थंभूत माहिती पोलीस घेतात आणि त्यांच्यावर सीआरपीसी कलम ११० व ११७ प्रमाणे कारवाई केली जाते. फ्रेजरपुरा ठाण्यात दररोज प्रेमीयुगुलांचा राबता असल्यामुळे ‘सैराट झालं जी...’ हा परवलीचा शब्द झाला आहे.अशी कारवाई योग्य आहे का?प्रेमीयुगुल प्रेमालापासाठी बांबू गार्डनमध्ये जातात. निसर्गरम्य वातावरण बघून गप्पांना सुरुवात होते तोच पोलीस कारवाईसाठी हजर होतात. मग प्रेमीयुगुलाने जावे तरी कुठे, असा प्रश्न तरुणाईला पडला आहे. निसर्गाच्या सान्निध्यात बसणारी ही तरुणाई पोलिसांच्या अशा कारभाराला त्रस्त झालेली आहे. त्यामुळे पोलिसांची ही कारवाई योग्य आहे का, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.