शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
2
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
3
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
4
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
5
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
6
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
7
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
8
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
9
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
10
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
11
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
12
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
13
भाजपा नगरसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
14
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
15
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
16
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
17
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
18
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
19
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
20
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...

सैराट झालं जी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 23:57 IST

वडाळी स्थित बांबू गार्डन प्रेमीयुगुलांचा अड्डाच बनला आहे. येथे तैनात पोलीस ‘वॉच’ ठेवून दररोज चार ते पाच प्रेमीयुगुलांना पकडून फ्रेजरपुरा ठाण्यात आणतात. ठाण्याच्या आवारात प्रेमीयुगुलासह त्यांच्या नातेवाइकांची गर्दी जमली की, त्यांच्याकडे पाहूनच ठाण्यात येणारे पोलीस असो की नागरीक, प्रत्येकाच्या तोंडी 'सैराट आहे का?' हा प्रश्न येतो.

ठळक मुद्देचार महिन्यांत २५९ प्रेमीयुगुलांना पकडलेबांबू गार्डन बनले ‘लव्ह स्पॉट’

वैभव बाबरेकर।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : वडाळी स्थित बांबू गार्डन प्रेमीयुगुलांचा अड्डाच बनला आहे. येथे तैनात पोलीस ‘वॉच’ ठेवून दररोज चार ते पाच प्रेमीयुगुलांना पकडून फ्रेजरपुरा ठाण्यात आणतात. ठाण्याच्या आवारात प्रेमीयुगुलासह त्यांच्या नातेवाइकांची गर्दी जमली की, त्यांच्याकडे पाहूनच ठाण्यात येणारे पोलीस असो की नागरीक, प्रत्येकाच्या तोंडी 'सैराट आहे का?' हा प्रश्न येतो. संबंधित पोलीससुद्धा 'सैराट झालं जी...’ असे सूचक उत्तर स्मितहास्यासह दिल्याशिवाय राहत नाहीत.‘सैराट’ या गाजलेल्या चित्रपटाने तरुणाईसोबतच अल्पवयीन मुला-मुलींमध्ये आगळीवेगळी छबी तयार केली आहे. या चित्रपटानंतर कोठेही प्रेमीयुगुल दिसले की, 'सैराट आहेत ते' अशी प्रतिक्रिया हमखास ऐकायला मिळते. प्रेम आंधळ असतं, प्रेमासाठी वाटेल ते करायला आजची युवा पिढी तयारच असते, लपूनछपून प्रेम करण्याचा काही आगळावेगळाच अनुभव असतो. सार्वजनिक ठिकाणी प्रेम व्यक्त करण्यास मुभा नाही. त्यामुळे बरेचसे प्रेमीयुगुल एकमेकांच्या सान्निध्यात काही क्षण राहण्यासाठी जागा शोधतात. ती जागा जर निसर्गरम्य असेल, तर अशा वातावरणात प्रेमालाप करण्याची संधी प्रेमीयुगुलांना मिळते. त्यामुळे प्रेमीयुगुलांचा सर्वाधिक वावर असणारा परिसर फे्रजरपुरा ठाण्याच्या हद्दीत वडाळीतील बांबू गार्डन, मालटेकडी, सुपर एक्स्प्रेस हायवेकडील निवांत रस्ते व परिसर आहे. याच ठाण्याच्या हद्दीत प्रेमीयुगुलांना सैरसपाटा सर्वाधिक आहे. मागील चार महिन्यातील आकडेवारीवर लक्ष दिल्यास, नववर्षात ८ मेपर्यंत तब्बल २५९ प्रेमीयुगुलांना फ्रेजरपुरा पोलिसांनी पोलिसांनी पकडून ठाण्यात आणले आहे. यामध्ये सर्वाधिक प्रेमीयुगुल हे बांबू गार्डनमधून पकडण्यात आले.शहरात महिला सुरक्षेच्या दृष्टीने तयार केलेल्या चिडीमार पथक व दामिनी पथकाने या प्रेमीयुगुलांना पकडले आहे. या प्रेमीयुगुलांना ठाण्यात आणल्यानंतर त्यांच्या पालकांना किंवा परिचित व्यक्तींना बोलावून त्यांना कल्पना दिली जाते तसेच त्या प्रेमीयुगुलांना सक्त ताकीद देऊन पुन्हा असे न करण्याची समज देण्यात येते. निवांत ठिकाणी बसणाऱ्या प्रेमीयुगुलांवर संकट येऊ शकते, हे पोलिसांकडून स्पष्ट केले जाते. या प्रेमीयुगुलांचे पालक किंवा परिचीत जोपर्यंत ठाण्यात येत नाही, तोपर्यंत त्यांना ठाण्यातच बसून ठेवले जाते. त्यांचे नाव, पत्ता, मोबाइल क्रमांक अशी इत्थंभूत माहिती पोलीस घेतात आणि त्यांच्यावर सीआरपीसी कलम ११० व ११७ प्रमाणे कारवाई केली जाते. फ्रेजरपुरा ठाण्यात दररोज प्रेमीयुगुलांचा राबता असल्यामुळे ‘सैराट झालं जी...’ हा परवलीचा शब्द झाला आहे.अशी कारवाई योग्य आहे का?प्रेमीयुगुल प्रेमालापासाठी बांबू गार्डनमध्ये जातात. निसर्गरम्य वातावरण बघून गप्पांना सुरुवात होते तोच पोलीस कारवाईसाठी हजर होतात. मग प्रेमीयुगुलाने जावे तरी कुठे, असा प्रश्न तरुणाईला पडला आहे. निसर्गाच्या सान्निध्यात बसणारी ही तरुणाई पोलिसांच्या अशा कारभाराला त्रस्त झालेली आहे. त्यामुळे पोलिसांची ही कारवाई योग्य आहे का, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.