शहरं
Join us  
Trending Stories
1
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
2
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
3
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
4
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
5
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
6
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
7
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
8
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
9
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
10
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
11
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
12
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
13
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
14
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
15
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
16
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
17
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
18
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
19
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
20
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय

तूर खरेदीच्या मापात पाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 22:12 IST

आॅनलाईन लोकमतअमरावती : जिल्ह्यात सुरू असलेल्या १२ तूर खरेदी केंद्रांवरील नवनवीन किस्से बाहेर येत आहेत. येथे सॅम्पलच्या नावाखाली ग्रेडरद्वारा चक्क किलोभर तूर काढण्याचा प्रकार होत असल्याच्या शेतकºयांच्या तक्रारी आहेत. बारदाना वजनाच्या नावाखाली हा प्रकार करणाऱ्या अंजनगाव सुर्जी येथील ग्रेडरची शेतकऱ्यांनी सामूहिक तक्रार केल्याने शासकीय खरेदीच्या मापातील पाप उघड झाले आहे.तूर खरेदीच्या ...

ठळक मुद्देशेतकऱ्यांची लूट : सॅम्पलच्या नावावर काढतात किलोभर तुरी

आॅनलाईन लोकमतअमरावती : जिल्ह्यात सुरू असलेल्या १२ तूर खरेदी केंद्रांवरील नवनवीन किस्से बाहेर येत आहेत. येथे सॅम्पलच्या नावाखाली ग्रेडरद्वारा चक्क किलोभर तूर काढण्याचा प्रकार होत असल्याच्या शेतकºयांच्या तक्रारी आहेत. बारदाना वजनाच्या नावाखाली हा प्रकार करणाऱ्या अंजनगाव सुर्जी येथील ग्रेडरची शेतकऱ्यांनी सामूहिक तक्रार केल्याने शासकीय खरेदीच्या मापातील पाप उघड झाले आहे.तूर खरेदीच्या शासकीय केंद्रावर शेतकऱ्यांची लूट करण्यासाठी नवनवीन फंडे वापरले जात असल्याचा प्रकार आता उघडकीस येत आहे. यंदा जिल्ह्यात डीएमओची नऊ, तर व्हीसीएमएफची तीन अशा बारा केंद्रांद्वारा खरेदी सुरू आहे. ५० किलोच्या काट्यामागे बारदानाच्या नावावर वेगवेगळ्या केंद्रावर ५०० ते ७०० ग्रॅमपर्यंत तूर जास्त घेतली जाते किंवा वजनात कपात केली जाते. वास्तविक, ५० किलोच्या कट्ट्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बारदान्याचे वजन ३०० ते ४०० ग्रॅम असते.तूर खरेदीसाठी अगोदर चाळणी व आता आर्द्रतेचे निकष लावले जात आहेत, शिवाय सॅम्पलच्या नावावर वेगवेगळ्या केंद्रावर गे्रडरद्वारा किमान किलोभर तूर काढली जात आहे. या शेतकऱ्यांना उघडउघड लुटण्याच्या प्रकाराबाबत मस्तवाल अधिकाऱ्यांवर कारवाई होत नसल्याने नवनवे फंडे पुढे येत आहेत. यासंदर्भात जिल्हा विपणन अधिकारी यांच्या संपर्क साधला असता ते उपलब्ध झाले नाही.ग्रेडिंगमध्येही भरडला जातोय शेतकरीशासकीय खरेदी केंद्रावर ग्रेडिंगचे काम करणाऱ्या एका कंपनीच्या ग्रेडरद्वारा खरेदी केलेली तूर मोजमापानंतर गोदामात ठेवण्यासाठी आणल्यानंतर गोदामावरील अन्य कंपनीच्या ग्रेडरद्वारा अडविली जाते व येथेही पुन्हा सॅम्पलच्या नावावर किलोपेक्षा जास्त तूर काढली जाते व कधीकधी रिजेक्ट केली जाते. विशेष म्हणजे, गोदामावर नाकारलेल्या तुरीचे पेमेंट रोखल्या जाते. या यंत्रणामध्ये समन्वय व सुसंवाद नसल्यामुळे शेतकरी नाहक भरडला जात आहे.उत्पादकतेच्या २५ टक्केच खरेदीनाफेडसोबत महाराष्ट्र स्टेट को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनचा (एमएससीएमएफ) तूर खरेदीचा करारनामा झाला. त्यानुसार जिल्ह्यात एकूण तूर उत्पादकतेच्या २५ टक्के प्रमाणातच तूर खरेदी करावी, असे स्पष्ट निर्देश मुंबई स्थित सरव्यवस्थापकांनी सर्व जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांना दिलेत. यामुळे नाफेडद्वारा आधारभूत किमतीने तूर खरेदी होत असली तरी कुठल्या ना कुठल्या कारणामुळे खरेदीची प्रक्रिया मंदगतीने राबविण्यात येत आहे.४३ हजार नोंदणी, १४ हजार शेतकऱ्यांची खरेदीजिल्ह्यातील १२ केंद्रावर सद्यस्थितीत ४३ हजार १८१ शेतकऱ्यांनी आॅनलाइन नोंदणी केली असली तरी खरेदी मात्र १४ हजार ५३३ शेतकऱ्यांकडून झालेली आहे. हेक्टरी सरासरी उत्पादकता १२ क्विंटल ग्राह्य धरण्यात आलेली आहे. जिल्ह्यात यंदा १२ लाख क्विंटल उत्पादन होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच उत्पादकतेच्या २५ टक्के म्हणजेच चार लाख क्विंटल तूर खरेदी करण्याचा शासनाचा डाव असल्यामुळे केंद्रांवरील खरेदीची गती मंदावली आहे.