शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
4
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
5
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
6
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
7
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
8
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
9
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
10
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
11
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
12
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
13
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
14
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
15
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
16
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
17
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
18
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
19
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
20
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?

तूर खरेदीच्या मापात पाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 22:12 IST

आॅनलाईन लोकमतअमरावती : जिल्ह्यात सुरू असलेल्या १२ तूर खरेदी केंद्रांवरील नवनवीन किस्से बाहेर येत आहेत. येथे सॅम्पलच्या नावाखाली ग्रेडरद्वारा चक्क किलोभर तूर काढण्याचा प्रकार होत असल्याच्या शेतकºयांच्या तक्रारी आहेत. बारदाना वजनाच्या नावाखाली हा प्रकार करणाऱ्या अंजनगाव सुर्जी येथील ग्रेडरची शेतकऱ्यांनी सामूहिक तक्रार केल्याने शासकीय खरेदीच्या मापातील पाप उघड झाले आहे.तूर खरेदीच्या ...

ठळक मुद्देशेतकऱ्यांची लूट : सॅम्पलच्या नावावर काढतात किलोभर तुरी

आॅनलाईन लोकमतअमरावती : जिल्ह्यात सुरू असलेल्या १२ तूर खरेदी केंद्रांवरील नवनवीन किस्से बाहेर येत आहेत. येथे सॅम्पलच्या नावाखाली ग्रेडरद्वारा चक्क किलोभर तूर काढण्याचा प्रकार होत असल्याच्या शेतकºयांच्या तक्रारी आहेत. बारदाना वजनाच्या नावाखाली हा प्रकार करणाऱ्या अंजनगाव सुर्जी येथील ग्रेडरची शेतकऱ्यांनी सामूहिक तक्रार केल्याने शासकीय खरेदीच्या मापातील पाप उघड झाले आहे.तूर खरेदीच्या शासकीय केंद्रावर शेतकऱ्यांची लूट करण्यासाठी नवनवीन फंडे वापरले जात असल्याचा प्रकार आता उघडकीस येत आहे. यंदा जिल्ह्यात डीएमओची नऊ, तर व्हीसीएमएफची तीन अशा बारा केंद्रांद्वारा खरेदी सुरू आहे. ५० किलोच्या काट्यामागे बारदानाच्या नावावर वेगवेगळ्या केंद्रावर ५०० ते ७०० ग्रॅमपर्यंत तूर जास्त घेतली जाते किंवा वजनात कपात केली जाते. वास्तविक, ५० किलोच्या कट्ट्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बारदान्याचे वजन ३०० ते ४०० ग्रॅम असते.तूर खरेदीसाठी अगोदर चाळणी व आता आर्द्रतेचे निकष लावले जात आहेत, शिवाय सॅम्पलच्या नावावर वेगवेगळ्या केंद्रावर गे्रडरद्वारा किमान किलोभर तूर काढली जात आहे. या शेतकऱ्यांना उघडउघड लुटण्याच्या प्रकाराबाबत मस्तवाल अधिकाऱ्यांवर कारवाई होत नसल्याने नवनवे फंडे पुढे येत आहेत. यासंदर्भात जिल्हा विपणन अधिकारी यांच्या संपर्क साधला असता ते उपलब्ध झाले नाही.ग्रेडिंगमध्येही भरडला जातोय शेतकरीशासकीय खरेदी केंद्रावर ग्रेडिंगचे काम करणाऱ्या एका कंपनीच्या ग्रेडरद्वारा खरेदी केलेली तूर मोजमापानंतर गोदामात ठेवण्यासाठी आणल्यानंतर गोदामावरील अन्य कंपनीच्या ग्रेडरद्वारा अडविली जाते व येथेही पुन्हा सॅम्पलच्या नावावर किलोपेक्षा जास्त तूर काढली जाते व कधीकधी रिजेक्ट केली जाते. विशेष म्हणजे, गोदामावर नाकारलेल्या तुरीचे पेमेंट रोखल्या जाते. या यंत्रणामध्ये समन्वय व सुसंवाद नसल्यामुळे शेतकरी नाहक भरडला जात आहे.उत्पादकतेच्या २५ टक्केच खरेदीनाफेडसोबत महाराष्ट्र स्टेट को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनचा (एमएससीएमएफ) तूर खरेदीचा करारनामा झाला. त्यानुसार जिल्ह्यात एकूण तूर उत्पादकतेच्या २५ टक्के प्रमाणातच तूर खरेदी करावी, असे स्पष्ट निर्देश मुंबई स्थित सरव्यवस्थापकांनी सर्व जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांना दिलेत. यामुळे नाफेडद्वारा आधारभूत किमतीने तूर खरेदी होत असली तरी कुठल्या ना कुठल्या कारणामुळे खरेदीची प्रक्रिया मंदगतीने राबविण्यात येत आहे.४३ हजार नोंदणी, १४ हजार शेतकऱ्यांची खरेदीजिल्ह्यातील १२ केंद्रावर सद्यस्थितीत ४३ हजार १८१ शेतकऱ्यांनी आॅनलाइन नोंदणी केली असली तरी खरेदी मात्र १४ हजार ५३३ शेतकऱ्यांकडून झालेली आहे. हेक्टरी सरासरी उत्पादकता १२ क्विंटल ग्राह्य धरण्यात आलेली आहे. जिल्ह्यात यंदा १२ लाख क्विंटल उत्पादन होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच उत्पादकतेच्या २५ टक्के म्हणजेच चार लाख क्विंटल तूर खरेदी करण्याचा शासनाचा डाव असल्यामुळे केंद्रांवरील खरेदीची गती मंदावली आहे.