शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

व्यक्तिमत्त्वातील सहजता हीच यशाची परिभाषा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 23:35 IST

गोड वाणी ओठांमधून प्रतिध्वनित होत असली तरी तिची निर्मिती आपुलकीच्या भावनेत होते. आपुलकीचा जन्म हा व्यक्तिमत्त्वातील सहजतेमुळे होतो, असे सूत्र सुनील झोंबाडे यांनी 'लोकमत'च्या वाचकांसाठी उलगडले.

ठळक मुद्देसुनील झोंबाडे : रतन टाटा रांगेत उभे असतात तेव्हा

अमरावती : गोड वाणी ओठांमधून प्रतिध्वनित होत असली तरी तिची निर्मिती आपुलकीच्या भावनेत होते. आपुलकीचा जन्म हा व्यक्तिमत्त्वातील सहजतेमुळे होतो, असे सूत्र सुनील झोंबाडे यांनी 'लोकमत'च्या वाचकांसाठी उलगडले.विदर्भाला पोल्ट्री क्षेत्र अपरिचित असताना, पहिला पोल्ट्री ब्रिडिंग फार्म अमरावतीत सुरू करण्याचे धाडस करून ती संकल्पना विदर्भाच्या मातीत रुजविणारे, पशुखाद्यनिर्माते आणि पंचतारांकित नांदगावपेठ एमआडीसी असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष सुनील झोंबाडे सांगतात, सत्ता; पैसा; ताकद यामुळे जे साध्य होऊ शकत नाही, ते केवळ आपुलकीने संवाद साधल्यामुळे साध्य होते. गोड बोलण्याचे दोन प्रकार असतात. केवळ औपचारीकता नि सभ्यता म्हणून गोड बोलणे आणि मनापासून संवाद साधणे. दोन्ही प्रकार लाभप्रदच. परंतु, मला आकर्षित करतो तो दुसरा प्रकार. यशासोबत सहजता जपण्याचे कायम भान ठेवले की, इतरांप्रति आपुलकी बाळगणे सहजसाध्य असल्याचे नोंदवून विठ्ठल वाघ यांच्या कवितेच्या ओळींची ते आठवण करून देतात, ''जरी आले चंद्र सूर्य हाती, माणसाने विसरू नये पायाखालची माती''यशाच्या उत्तुंग शिखरावरही सहजतेने जगण्याचे अतुल्य उदाहरण सुनील झोंबाडे यांनी दिले. ते म्हणतात, मागच्या आठवड्यात मी दिल्ली विमानतळावर इकॉनॉमी श्रेणीच्या रांगेतील प्रक्रियेतून जात असताना बाजूच्या रांगेत चक्क रतन टाटा दिसले. विमान बाळगण्याच्या ऐपतीचा थोर उद्योजक इकॉनॉमी क्लासच्याच रांगेत उभा राहतो तीच सहजता, तेच यश...