शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

सीताफळाचे भाव कडाडले, विक्रेते ग्राहक अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2019 01:51 IST

अचलपूर मतदारसंघातील अचलपूर आणि चांदूरबाजार तालुक्यात सातपुड्याच्या पायथ्याशी जंगल माळरानावर व चंद्रभागा, पूर्णा, शहानूर, सपन न बिच्छन नदीकाठावरील आणि नदीकाठच्या परिसरातील गावराण सीताफळाचा गोडवा काही औरच आहे. या सीताफळांना परराज्यासह स्वराज्यात अधिक मागणी आहे. उल्लेखनीय अशी नैसर्गिकरीत्या बनलेली सीताफळाची अनेक बने आहेत. या सीताफळांना स्वतंत्र ओळख आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । सततच्या पावसाचा फटका; सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या सीताफळाचा गोडवा न्याराच

अनिल कडू।लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : सततच्या पावसामुळे सीताफळांच्या बनातील फळांना पाहिजे तसा उत्तम दर्जाचा आकार आलाच नाही.त्यामुळे सीताफळाचे भाव चांगलेच कडाडले आहे. यात विक्रेत्यांसह ग्राहकही अडचणीत आले आहेत.अचलपूर मतदारसंघातील अचलपूर आणि चांदूरबाजार तालुक्यात सातपुड्याच्या पायथ्याशी जंगल माळरानावर व चंद्रभागा, पूर्णा, शहानूर, सपन न बिच्छन नदीकाठावरील आणि नदीकाठच्या परिसरातील गावराण सीताफळाचा गोडवा काही औरच आहे. या सीताफळांना परराज्यासह स्वराज्यात अधिक मागणी आहे. उल्लेखनीय अशी नैसर्गिकरीत्या बनलेली सीताफळाची अनेक बने आहेत. या सीताफळांना स्वतंत्र ओळख आहे. यातून गरीब आदिवासींसह भूमिहीम शेतमजुरांना रोजगार उपलब्ध झाला आहे. सीताफळाचे व्यापारी ही नैसर्गिक सीताफळाची बनं, परिसर हर्रासात संबंधित विभागाकडून विकत घेतात. त्याची मालकी मिळवितात. यानंतर या सीताफळ बनांची राखन करून वेळोवेळी त्यातील फळांची तोड करतात. तोडलेल्या फळांची छाटणी करून ग्रेडींग करून फळांच्या डब्यात पॅक करतात. ही उत्तम दर्जाची, एक नंबरची फळ मोठमोठ्या शहरात विक्रीकरिता पाठवतात. सोबतच कॅरेटमध्ये भरूनही फळ बाजार विक्रीकरिता पाठविली जातात. परतवाडा-बैतूल रोडवरील बहिरम, काशी तलाव व फॉरेस्ट आणि जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जागेतील सिताफळांच्या बनांचा, झाडांचा हर्रास यावर्षी व्यापाऱ्यांनी केवळ सव्वाचार लाखालाच घेतला. पावसामुळे या बनात मालच बनलेला नाही, असे त्या व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. खर्चासह बरोबरी होते की नाही याबाबत हे व्यापारी साशंक आहे. याच व्यापाºयांनी काही शेतकºयांचे सिताफळाचे बगीचेही विकत घेतले आहेत.अति पाऊसयावर्षी सुरूवातीला पाऊस लांबला; नंतर लागून पडलेला पाऊस ऑक्टोबरच्या शेवटापर्यंतही थांबायचे नाव घेत नाही. सततच्या पावसामुळे झाडांना सिताफळ लागलेत नाही. फळाअभावी वृक्ष विरळ झाले आहेत. यात भाव कडाडले असून शंभर ते एकशे वीस रूपये किलो दराने सिताफळ विकल्या जात आहेत. एका किलोत केवळ चार ते पाच फळ बसत आहेत. तर आदिवासींसह गोरगरीब शेतमजुरांकडून बाजारात विकायला आणल्या जाणाऱ्या सिताफळांच्या टोपल्यांची संख्याही रोडावली आहे.संशोधन केंद्रांची गरजसातपुडा पर्वताच्या पायथ्याशी डोंगर माळराणावर व नदीकाठी गावरान सीताफळे मधाळ आहेत. शेतकरीही सीताफळ लागवडीकडे वळला आहे. यात प्रक्रिया उद्योग, संशोधन केंद्र झाल्यास रोजगाराची दुहेरी संधी उपलब्ध होऊ शकेल.