शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
5
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
6
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
7
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
8
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
9
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
10
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
11
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
12
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
13
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
14
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
15
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
16
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
17
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
18
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
19
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
20
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!

वसतिगृहातील प्रवेश प्रक्रिया रखडण्याची चिन्हे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:11 IST

समाजकल्याण; शाळा, महाविद्यालये बंदचा परिणाम अमरावती : राज्य शासनाने शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने यावर्षी सामाजिक न्याय विभाग ...

समाजकल्याण; शाळा, महाविद्यालये बंदचा परिणाम

अमरावती : राज्य शासनाने शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने यावर्षी सामाजिक न्याय विभाग (समाज कल्याण) मार्फत चालणाऱ्या मागासवर्गीय वसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया सलग दुसऱ्या वर्षी रखडण्याची चिन्हे आहेत. राज्याच्या शिक्षण विभागाकडून शाळा, महाविद्यालये सुरू करण्यासंदर्भात निर्णय झाल्यावरच वसतिगृहात प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती आहे.

जिल्हा सामाजिक व न्याय विभागामार्फत जिल्ह्यात २४ शासकीय वसतिगृहे चालविण्यात येतात. मुला, मुलींसाठीची ही वसतिगृहे जिल्हा मुख्यालयासह विविध तालुक्यांच्या ठिकाणी सुरू आहेत. जून महिन्यात शाळा, महाविद्यालये सुरू झाल्यानंतर वसतिगृहांची प्रवेश प्रक्रिया सुरू केली जाते. वसतिगृहात अनुसूचित जाती, जमाती, विमुक़्त जाती, भटक्या जमाती, आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग, अनाथ व दिव्यांग प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. या वसतिगृहात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकडून वसतिगृहातच ऑफलाईन अर्ज स्वीकारले जातात. अर्ज स्वीकारल्यानंतर गुणवत्तेप्रमाणे विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. सामाजिक न्याय विभागामार्फत या ठिकाणी विद्यार्थ्यांचे जेवण व राहण्याची व्यवस्था केली जाते तसेच शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी विद्यार्थ्यांना विभागामार्फत रोख रक्कम दिली जाते. यामुळे या वसतिगृहात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांचा अधिक कल असतो. मात्र, यावर्षी सर्वत्र कोरोनाचा संसर्ग वाढल्याने राज्याच्या शिक्षण विभागाने संसर्गाचा धोका लक्षात घेऊन राज्यातील शाळा, महाविद्यालये तूर्तास बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शाळा, महाविद्यालये सुरू झाली तरच या वसतिगृहात नवीन वर्षात शिक्षण घेण्यासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू होते. मात्र, शिक्षण विभागाकडून शाळा, महाविद्यालये सुरू करण्यासंदर्भात ठोस निर्णय होत नसल्याने जिल्ह्यातील सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहाची नवीन प्रवेश प्रक्रिया रखडल्याचे चित्र दिसून येत आहे.

बॉक्स

अशी राबविली जाते प्रक्रिया

वसतिगृहात सातवी उत्तीर्ण झाल्यावर आठवीच्या मुला-मुलींना प्रवेश दिला जातो. या विद्यार्थ्यांच्या दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहात राहण्याची व्यवस्था असते. दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नव्याने प्रवेशासाठी अर्ज करावा लागतो. गुणवत्तेच्या आधारे विद्यार्थ्यांची निवड होते. हे विद्यार्थी बारावीपर्यंत वसतिगृहात राहतात. बारावी पास झाल्यानंतर पदवीच्या शिक्षणासाठी अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील विद्यार्थी वसतिगृहात राहण्यासाठी अर्ज करू शकतात.या विद्यार्थ्यांची निवड ही मिळालेल्या गुणांच्या आधारे केली जाते. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग अनाथ व दिव्यांग विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येतात. त्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड जोडावे लागते. हे अर्ज केलेल्या यादीमधून प्रचलित नियमांप्रमाणे मागासवर्गीय प्रवर्ग आणि रिक्त जागा खास बाब यांच्या अधीन राहून गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जातो.

बॉक्स