शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

ब्रिटिशकालीन बैलबाजाराला घाणीचा वेढा

By admin | Updated: June 23, 2015 00:52 IST

येथील ब्रिटिशकालीन बैलबाजार, आठवडी बाजार, कोंडवाडा आदी परिसराला घाणीचा वेढा पडला असून...

कारवाई शून्य : प्रशासन कागदी घोडे नाचविण्यात व्यस्तसतीश बहुरुपी राजुराबाजारयेथील ब्रिटिशकालीन बैलबाजार, आठवडी बाजार, कोंडवाडा आदी परिसराला घाणीचा वेढा पडला असून ग्रामपंचायत प्रशासनाचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. साचलेल्या डबक्यांमध्ये निर्माण होणाऱ्या जंतुंमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. सन २०१० मध्ये तापाच्या उदे्रकाने वरूड तालुका ढवळून निघाला होता़ सन २०११-१२ मध्येसुध्दा देऊतवाडा, राजुराबाजार, वाडेगाव, जरुड परिसरात विषाणूजन्य तापामुळे अनेकांचा मृत्यू झाला. दरवर्षी आरोग्य विभागासह महसूल आणि पंचायत प्रशासनाकडून अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांच्या बैैठका घेऊन ग्रामीण व शहरी भागातील शेणाचे उकिरडे, पिण्याच्या पाण्याचे शुध्दीकरण करणे, तसेच साचलेले डबके, धूर फवारणी, घाणीचे साम्राज्य होऊ न देण्याच्या सूचना देण्यात येतात. परंतु दिलेल्या निर्देशाचे तालुक्यात कुठेही पालन होताना दिसत नाही. ग्रामीण भागात आजही उकिरडे जैसे थे पडून आहेत. घाणीचे साम्राज्य आहे. मात्र ग्रामपंचायत प्रशासन आजही याबाबत अनभिज्ञच आहे. गत चार वर्षांपासून तालुक्यावर साथीच्या आजाराचे थैैमान असल्याने अनेकांना विषाणूजन्य, जलजन्य, कीटकजन्य आजाराने ग्रासले होते. सोबतच डायरिया, हिवताप, मलेरिया, टाईफाईड, डेंग्यू आदी आजार तोंड वर काढत असल्याचे सांगण्यात येते. परंतु यावर कायमस्वरुपी उपायोजना अद्यापही करण्यात आलेले नाही. दोन वर्षांपूर्वी राजुराबाजार परिसरात स्वाईनफ्ल्यू, डेंग्यूने काही लोकांचा मृत्यू झाला. पावसाळा सुरु झाल्याने कॉलरा, अतिसार, कावीळ, विषमज्वर, मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनीया, चंडीपुरा, लेप्टोस्पायरोसिस, स्वाईन फ्लू या आजारावर नियंत्रण कसे आणता येईल याबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजनेबाबत मार्गदर्शन करण्यात येते. मात्र प्रत्यक्षात अंमलबजावणीचा अभाव असल्याने केवळ कागदी घोडे नाचविण्यात प्रशासकीय यंत्रणा गुंतलेली असते. प्रत्यक्षात कामगिरी बजावली जात नसल्याने निष्पाप लोकांना बळी पडावे लागते. आरोग्य विभाग दक्ष असला तरी स्थानिक प्रशासन मात्र दखल घेत नाही ही शोकांतिका आहे. ग्रामीण भागात ठिकठिकाणी असलेले शेणखताचे ढिगारे उचलणे, डबके वाहते करणे, पाण्याचे नमुने तपासून घेणे, ब्लिचिंग पावडर टाकून पाणी स्वच्छ करणे, कोरडा दिवस पाळणे यासह आदी सूचनांचे पालन झाले तरच साथीच्या आजारावर प्रतिबंध घालता येईल, असे तज्ज्ञांचे मत आहे. कोंडवाडा, पोलीस चौकी परिसरासह आदी वस्त्यांमध्ये घाणीचे साम्राज्य आहे. आठवडी बाजार, ब्रिटिशकालीन बैैल बाजारात तसेच मडघ्या शेजारी घाण पसरल्याने वराहांची वसाहतच निर्माण झाली आहे. मोठमोठी डबके साचली असल्याने डासांच्या उत्पत्तीचे ठिकाण बनले आहे. बाहेरगावाहून येणारे शेतकरी, पशुधन खरेदी करणाऱ्या नागरिकांच्यासुध्दा आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. परंतु याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याची चर्चा आहे. -तर त्वरित वैद्यकीय उपचार घ्या तापाची साथ, डायरियाची साथ येऊ नये म्हणून सार्वजनिक स्वच्छतेकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. याकरिता साफसफाई, घाणीचे साम्राज्य, डबक्यातील पाणी वाहते करणे, उकिरडे उचलून गावाबहोर नेणे, आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळणे, पाणी स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. आरोग्य विभाग रुग्णांना सेवा देण्याकरिता सज्ज असून साथीचे आजार उद्भवल्यास किंवा तशी लक्षणे दिसून आल्यास त्वरित आरोग्य विभागाशी संपर्कसाधावा, असे आवाहन राजुराबाजार प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी संजय टाकरखेडे यांनी सांगितले. पाणी उकळून पिणे गरजेचे तापाच्या साथीने कहर केला असून बालकांमध्ये अधिक प्रमाण आहे. याकरिता पाणी उकळून प्यावे, साफसफाई, घाणीचे साम्राज्य नष्ट करणे, ताप आल्यास वेळीच वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. सर्दी, ताप, खोकल्यासह डायरियाच्या रुग्णांची संख्या अधिक असून बालरुग्णालयात गर्दी वाढल्याचे बाल रोगतज्ज्ञ प्रवीण चौधरी यांनी सांगितले. यामुळे साथरोगाचा उद्रेक होण्यापूर्वीच नगरपरिषद, ग्रामपंचायत प्रशासनाने स्वच्छता मोहीम राबवावून प्रतिबधांत्मक उपायोजना करणे गरजेचे आहे.