शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
3
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
4
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
5
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
6
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
7
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
8
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
9
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
10
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
11
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
12
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
13
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
14
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
15
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
16
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
17
पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
18
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
19
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
20
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!

विद्यापीठाच्या निकालात सावळागोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 23:08 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षेच्या निकालात सावळागोंधळ कायम आहे. अभियांत्रिकी, विधी, फार्मसी निकालाचा पत्ता नाही. अशातच एमसीएचे निकाल केव्हा लागणार, या विंवचनेत विद्यार्थी आहेत. त्यामुळे विद्यापीठाचा कारभार खरेच आॅनलाइन झाला काय, असा सवाल उपस्थित होत आहे.

ठळक मुद्देएमसीएचे निकाल नाहीच : अभियांत्रिकी, विधी, फार्मसीला प्रतीक्षाच

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षेच्या निकालात सावळागोंधळ कायम आहे. अभियांत्रिकी, विधी, फार्मसी निकालाचा पत्ता नाही. अशातच एमसीएचे निकाल केव्हा लागणार, या विंवचनेत विद्यार्थी आहेत. त्यामुळे विद्यापीठाचा कारभार खरेच आॅनलाइन झाला काय, असा सवाल उपस्थित होत आहे.विद्यापीठाने परीक्षा विभागाचा कारभार आॅनलाइन केला आहे. मूल्यांकन, निकाल, प्रश्नपत्रिका आदी बाबी आॅनलाइन झाल्या आहेत. मात्र, निकालाची घसरगुंडी कायम आहे. हिवाळी परीक्षा आटोपून कधीचेच ४५ दिवस ओलांडले. फेब्रुवारी महिना उजाडला तरीही हिवाळी परीक्षांचे निकाल जाहीर झाले नाही. त्यामुळे उन्हाळी परीक्षांचे फार्म कधी भरावे, या विवंचनेत विद्यार्थी आहेत. ३० नोव्हेंबर २०१८ रोजी आॅनलाईन, आॅफलाइन अशा दोन्ही प्रकारच्या हिवाळी परीक्षांना प्रारंभ झाला. ३ जानेवारी २०१९ रोजी शेवटचा पेपर आटोपला. यादरम्यान एकूण ५८७ अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेण्यात आल्यात. मात्र, नव्या विद्यापीठ कायद्यानुसार ४५ दिवसांतच निकाल जाहीर होणे अनिवार्य असताना त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष चालविले आहे. एमसीए अभ्यासक्रमाचे विद्यार्थी विद्यापीठात येरझारा मारून थकले आहे. निकाल कधी जाहीर होणार, हे परीक्षा विभाग ठामपणे सांगू शकत नाही, अशी एमसीए विषयाच्या विद्यार्थ्यांची ओरड आहे. गुरुवारी बी.ई.च्या पेपर ४ विषयांचे निकाल जाहीर होतील, अशी माहिती आहे. निकालात विलंब टाळता यावा, यासाठी सिनेट सभेने माइंड लॉजिककडून परीक्षेशी संबंधित कामे काढण्याचा निर्णय घेतला. आता नवी एजन्सी नियुक्त झाली असली तरी निकालात सुधारणा होत नसल्याचे चित्र आहे. निकालात सावळागोंधळ असल्यामुळे विद्यार्थीदेखील त्रस्त झाले आहेत. हिवाळी परीक्षांचे निकाल प्रलंबित असल्याने विद्यार्थ्यांनी केव्हा परीक्षा अर्ज सादर करावा, अभ्यास कसा करावा, हा मोठा गंभीर प्रश्न आहे. एका एजन्सीकडे असलेला डेटा दुसऱ्या एजन्सीकडून ट्रान्सफर करण्यास किती काळ लागेल, हा बिकट प्रश्न आहे.अभियांत्रिकीचे निकाल जाहीर होत आहे. पुढच्या टप्प्यात एमसीएचे निकाल लावले जातील. काही तांत्रिक अडचणी असल्याने निकाल जाहीर करण्यास विलंब होत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची काळजी घेत आहोत.- हेमंत देशमुखसंचालक, परीक्षा व मूल्यांकन विभाग, अमरावती विद्यापीठ