शहरं
Join us  
Trending Stories
1
छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
2
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
3
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
6
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
7
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
8
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
9
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
10
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
11
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
12
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
13
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
14
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
15
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
16
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
17
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
18
'बंकरमध्ये लपण्याची वेळ आलेली...', ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानी राष्ट्रपती झरदारींचा मोठा खुलासा
19
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
20
"गिरीजा ओकला पाहून इम्रान हाश्मीही झालेला दंग", प्रसिद्ध निर्मातीने सांगितला 'तो' किस्सा
Daily Top 2Weekly Top 5

श्रावणी खांडे जिल्ह्यात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2022 05:00 IST

होलिक्रॉस इंग्लिश हायस्कूलची विद्यार्थिनी श्रावणी खांडे हिने ग्रेस गुण वगळता ९९.२० टक्केवारी मिळवित जिल्ह्यातून ‘अव्वल’ येण्याचा बहुमान पटकावला आहे. तिने ४९६ गुण मिळविले आहेत. अमरावती येथील मणीबाई गुजराती हायस्कुलची सृष्टी भारती हिने ग्रेसगुणांसह ९९.६० टक्के गुण पटकावले असून, ती दुसऱ्यास्थानी आहे. अंबापेठस्थित मदर्स पेठ स्कूलचा तारक गुल्हाने, तर अंजनगाव सुर्जी येथील सीताबाई संगई कन्याशाळेची सुरभी पटेल या तिघांनीही कलागुणांसह ९९.२० टक्के गुण मिळवत जिल्हाभरातून तिसऱ्यास्थानी आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अमरावती : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च, एप्रिल २०२२ या महिन्यात घेण्यातआलेल्या इयत्ता दहावीचा निकाल शुक्रवारी ऑनलाईन घोषित करण्यात आला. यात येथील होलिक्रॉस इंग्लिश हायस्कूलची विद्यार्थिनी श्रावणी खांडे हिने ग्रेस गुण वगळता ९९.२० टक्केवारी मिळवित जिल्ह्यातून ‘अव्वल’ येण्याचा बहुमान पटकावला आहे. तिने ४९६ गुण मिळविले आहेत. अमरावती येथील मणीबाई गुजराती हायस्कुलची सृष्टी भारती हिने ग्रेसगुणांसह ९९.६० टक्के गुण पटकावले असून, ती दुसऱ्यास्थानी आहे. अंबापेठस्थित मदर्स पेठ स्कूलचा तारक गुल्हाने, तर अंजनगाव सुर्जी येथील सीताबाई संगई कन्याशाळेची सुरभी पटेल या तिघांनीही कलागुणांसह ९९.२० टक्के गुण मिळवत जिल्हाभरातून तिसऱ्यास्थानी आहे. कोरोना काळानंतर पहिल्यांदाच दहावीच्या ऑफलाइन परीक्षा घेण्यात आल्या. त्यामुळे आपसूकच जे विद्यार्थी हुशार, गुणी होते, ते निकालात झळकले. मात्र, यंदा काही नामांकित शाळांचाही निकाल घसरल्याचे वास्तव आहे.

अमरावती जिल्ह्याचा निकाल ९६.३९ टक्केयंदा जिल्ह्यात दहावीत उन्हाळी परीक्षेसाठी ३९ हजार १११ विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले होते. त्यापैकी ३८ हजार ४२४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून, ३७ हजार ४० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालाची टक्केवारी ९६.३९ टक्के एवढी आहे. जिल्ह्यात इयत्ता दहावीपर्यंतच्या ७४५ शाळा आहेत. मुलांपेक्षा मुलींनीच निकालात बाजी मारल्याचे टक्केवारीवरून स्पष्ट झाले आहे.

कोरोनानंतर पहिल्यांदाच ऑफलाइन परीक्षाकोरोनानंतर पहिल्यांदाच यंदा दहावीची परीक्षा ऑफलाइन झाली. शिक्षणाचा कंटाळा आलेल्या विद्यार्थ्यांना ऑफलाइन परीक्षा नकोशी होती. त्यामुळे नामंवत शाळांचा निकाल घसरला आहे. मात्र, ज्या शाळांनी निकालाची टक्केवारी कायम ठेवण्याचे लक्ष्य होते, ३०८ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला.

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन सेवा सुरूनिकालानंतर काही विद्यार्थी नकारात्मक विचाराने मानसिक दडपणात येण्याची शक्यता पाहता शिक्षण मंडळ स्तरावरुन अशा विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन समुपदेशन सेवा आठ दिवस सकाळी ८ ते रात्री ८  या वेळेत भ्रमणध्वनीद्वारे निशुल्क केले जाईल.

 

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकाल