शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
3
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
4
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
5
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
6
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
7
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
8
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
9
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
10
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
11
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
12
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
13
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
14
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
15
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
16
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
17
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
18
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
19
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
20
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली

उन्हाळ्याच्या प्रारंभीच लघु प्रकल्प तहानले

By admin | Updated: March 11, 2017 00:11 IST

यंदा उन्हाळ्याच्या प्रारंभीच जिल्ह्यातील ४६ लघु प्रकल्पांतील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत आहे.

२९ टक्के जलसाठा : मुख्य, मध्यम प्रकल्पांचा मात्र दिलासा अमरावती : यंदा उन्हाळ्याच्या प्रारंभीच जिल्ह्यातील ४६ लघु प्रकल्पांतील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत आहे. अशीच स्थिती राहिल्यास दोन महिन्यांत हे प्रकल्प कोरडे पडण्याची शक्यता आहे. मात्र जिल्ह्यात एकमेव उर्ध्व वर्धा व चार मध्यम प्रकल्पांत सध्या पुरेसा जलसाठा आहे. जिल्ह्यातील उर्ध्व वर्धा या मुख्य प्रकल्पात आज तारखेत ६५२ दलघमी साठा आहे. ही ४२.९७ टक्केवारी आहे. मध्यम प्रकल्पांमध्ये शहानूर प्रकल्पात ४६.०४ दलघमी साठ्याच्या तुलनेत २९.७८ दलघमी साठा आहे. ही ६४.६८ टक्केवारी आहे. चंद्रभागा प्रकल्पात ४१.२५ दलघमीच्या तुलनेत २८.८२ दलघम म्हणजेच ६९.८७, पूर्णा प्रकल्पात ३५.३७ दलघमीच्या तुलनेत १५.३८ दलघमीच्या तुलनेत २६.५७ दलघमी जलसाठा आहे. ही ६८.८३ टक्केवारी आहे. जिल्ह्यात एकूण १२१ मध्यम व लघु प्रकल्प आहेत. यापैकी ५० प्रकल्पांची नोंद जलसंपदा विभागाद्वारा घेतली जाते. यामध्ये ४६ लघु प्रकल्पात ९७.९८ दलघमी पूर्ण संचय पातळीच्या तुलनेत आजच्या स्थितीत २८.४२ दलघमी जलसाठा आहे. ही २९.०१ टक्केवारी आहे. लघुप्रकल्पामध्ये अमरावती तालुक्यात मालेगाव ४२.५० टक्के, घाटखेड ३०.३८, केकतपूर ५१.९३, खनिजापूर २४.९३, गोंडवाघोली २२, सावरपाणी २४.५९, साखळी २१.३७, मालखेड ३१.३६, बसलापूर ४१.५५, सरस्वती ४७.५६, टाकळी २५.६२, सूर्यगंगा ३२.१६, जमालपूर २३.४७, खारी २७.३९, साद्राबाडी २९.५५, मांडवा २४.८२, बोबडो ३०.६३, लवादा २४.१४, बेरडा २१.६५, ज्युटपाणी २१.५५, मोगर्दा २५.४७, पुसली ३३.३९, नादुरी ४०.५७ व चारगढ प्रकल्पात सद्यस्थितीत ४९.७५ टक्के जलसाठा आहे. (प्रतिनिधी)या प्रकल्पात अत्यल्प साठा सद्यस्थितीत दस्तापूर ४.३९ टक्के, गोंडविहीर १५.२४, टोंगलफोडी १९.८३, पिंपळगाव १६.६७, दाभेरी ८.३३, पंढरी ६.९०, जामगाव १५.६३, गावलानडोह १७.४२, सावलीखेडा १७.८०, रभांग १८.९८, सालई २०, गंभेरी १४.७९ टक्के जलसाठा आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर ही धोक्याची घंटा आहे. प्रकल्पांचा तुलनात्मक जलसाठा लघुप्रकल्पात सद्यस्थितीत २९ टक्के जलसाठा आहे. याच दिनांकात २०१२ मध्ये २२.०९ टक्के, २०१३ मध्ये २५.४८ टक्के जलसाठा होता. यंदा मात्र उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच या प्रकल्पांच्या पातळीत झपाट्याने घट होत आहे.