शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
2
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले
3
India Pakistan Conflict : भारत-पाकिस्तान युद्धबंदी, एआयएमआयएमच्या वारिस पठाण यांचे सवाल, म्हणाले, 'धर्माबद्दल विचारून...'
4
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
5
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
6
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
7
UPI व्यवहारात अशी होते फसवणूक; आर्थिक नुकसान टाळण्यासाठी 'या' टीप्स फोलो करा
8
"मी तुझ्यासोबत काम करणार नाही", बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा निर्णय! पाकिस्तानी अभिनेत्री दुखावली, म्हणाली-
9
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
10
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
11
IND W vs SL W Final : फायनलमध्ये स्मृती मानधनाचा तोरा! तिच्या भात्यातून आली सलग दुसरी फिफ्टी
12
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
13
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
14
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
16
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
17
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
18
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
19
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
20
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”

जेरबंद करता येत नसेल तर ‘शूट’ करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 01:24 IST

नरभक्षक वाघाने मंगरूळ दस्तगीर व अंजनसिंगी येथे दोन नागरिकांना ठार केल्यानंतर गुरुवारी पहाटे तिवसा तालुक्यातील रघुनाथपूर येथे एका वासराला ठार केले. नागरिक प्रचंड दहशतीखाली आहेत.

ठळक मुद्देयशोमती ठाकूर यांची वनमंत्र्यांकडे मागणी

तिवसा तालुक्यात प्रचंड दहशतलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नरभक्षक वाघाने मंगरूळ दस्तगीर व अंजनसिंगी येथे दोन नागरिकांना ठार केल्यानंतर गुरुवारी पहाटे तिवसा तालुक्यातील रघुनाथपूर येथे एका वासराला ठार केले. नागरिक प्रचंड दहशतीखाली आहेत. याच मार्गाने शेकडो पालख्या व हजारो नागरिक राष्ट्रसंतांच्या पुण्यतिथी महोत्सवाला जाणार आहेत. त्यामुळे ‘त्या’ नरभक्षक वाघाला तात्काळ जेरबंद करा अथवा ठार मारण्याचे आदेश द्या, अशी मागणी आ. यशोमती ठाकूर यांनी गुरुवारी सकाळी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे दूरध्वनीद्वारे केली.गुरुवारी पहाटे या वाघाने रघुनाथपूर येथील प्रभाकर वानखडे या शेतकऱ्याचे वासरू ठार केल्याची बाब कळताच आ. यशोमती ठाकूर यांनी तात्काळ घटनास्थळी घाव घेतली. चार दिवसांवर असलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्यातील मौन श्रद्धांजलीच्या पार्श्वभूमीवर लाखो नागरिकांचा वावर या ठिकाणी राहणार असल्याने त्यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी संवाद साधला. यवतमाळ येथे १३ नागरिकांना ठार केल्यानंतर त्या वाघिणीला मारण्याचे आदेश देण्यात आले. येथेही शासनाला १३ नागरिकांचे बळींची प्रतीक्षा आहे काय, असा संतप्त सवाल त्यांनी वनमंत्र्यांकडे केला. या वाघाने पाच दिवसांत दोन नागरिक, गाय, म्हैस, वासरांना ठार केले. यामुळे कुºहा, तिवसा, वºहा, मोझरी, अनकवाडी, रघुनाथपूर, मालधूर, माळेगाव, घोटा, अंजनसिंगी परिसरात प्रचंड दहशत आहे. वाघाच्या भीतीने नागरिक शेतात जायची हिंमत करीत नसल्याने पिकेदेखील धोक्यात आलेली आहेत. शासनाने गंभीर दखल न घेतल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू, असा इशारा आ. ठाकूर यांनी दिला.कायदा हाती घेतल्यास शासन जबाबदारआठ दिवसांपासून नरभक्षक वाघाचा धुमाकूळ सुरू आहे. नागरिकांचे जीव जाताहेत. तिवसा तालुक्यात प्रचंड दहशत आहे. या पार्श्वभूमीवर आ. यशोमती ठाकूर यांनी नागपूर येथील प्रधान मुख्य वनसंरक्षक ए.के. मिश्रा व जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्याशीदेखील संवाद साधला. वाघाला त्वरित जेरबंद करा अथवा ठार तरी करा, अन्यथा नागरिकांनी कायदा घेतल्यास ही जबाबदारी शासनाची राहील, अशा इशारा आ. यशोमती ठाकूर यांनी दिला.

टॅग्स :Tigerवाघ