शहरं
Join us  
Trending Stories
1
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
2
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
3
सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
4
भारतात दर दिवसाला १ लाख गाड्या विकल्या जात होत्या...! तो 'काळ' पाहून म्हणाल... अद्भूत!
5
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
6
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
7
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
8
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
9
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
10
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?
11
'चांगल्यापैकी पोटगी मिळतेय'; मासिक १० लाख मिळवण्यासाठी हसीन जहाँ सुप्रीम कोर्टात, मोहम्मद शमीला नोटीस
12
'तुमच्या मुलाचा दोष नाही', एअर इंडिया विमान अपघातातील पायलटच्या वडिलांची सर्वोच्च न्यायालयात धाव
13
Supreme Court: भटक्या कुत्र्यांवरील निर्णय ऐकून महिला वकील कोर्टातच ढसाढसा रडली, म्हणाली...
14
‘काँग्रेस म्हणजेच मुस्लिम आणि मुस्लिम म्हणजेच काँग्रेस’, रेवंत रेड्डीच्या विधानावरून वाद 
15
घर नावावर कर म्हणत युट्यूबरने आईला मारहाण केली; व्हिडीओही झाला व्हायरल! कोण आहे वंशिका हापूर?
16
Lenskart IPO: लिस्टिगपूर्वी लेन्सकार्टचा GMP तोडावर आपटला; १०८ रुपयांवरुन आला १० वर, IPO चे 'बुरे दिन' येणार?
17
Samudra Shastra: दातात फट असणारे श्रीमंत असतात? दाताच्या ठेवणीवरून वाचा भाकीत!
18
नवरदेवाने फोटोग्राफरला मारली कानाखाली; नवरीचा लग्नास नकार, २ वर्षांच्या लव्हस्टोरीचा शेवट
19
धक्कादायक! "तो जवळ यायचा अन्...." बांगलादेशी महिला क्रिकेटरचा निवडकर्त्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप
20
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'

धक्कादायक; भूजल पातळीत दोन मीटरने तूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 00:02 IST

यंदाच्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा ३२.६१ टक्के पाऊस कमी झाल्याचे साइड इफेक्ट आता जाणवायला लागले आहे.

ठळक मुद्देधोक्याची घंटा : अचलपुरात सर्वाधिक ५.६६, चांदूर बाजारात ४.१० मीटरने कमी

गजानन मोहोड ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदाच्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा ३२.६१ टक्के पाऊस कमी झाल्याचे साइड इफेक्ट आता जाणवायला लागले आहे. जिल्ह्यातील १४४ निरीक्षण विहिरींच्या सर्वेक्षणाअंती भूजल सर्वेक्षण विभागाचे निरीक्षण धक्कादायक आहे. पावसाळ्यानंतर सर्वच तालुक्यातील पाच वर्षांची सरासरी भूजल पातळी ५.१० मीटर होती. यंदा मात्र ही पातळी ६.९८ मीटर आढळून आली. म्हणजेच यंदा जिल्ह्यातील भूजल पातळीत १.८६ मीटरची तूट आहे. यामध्ये सर्वाधिक अचलपूर तालुक्यात ५.६६, तर चांदूर बाजार तालुक्यात ४.१० मीटरपर्यंत तूट आढळून आली. आगामी काळासाठी ही धोक्याची घंटाच आहे.जिल्ह्याचा ७५ टक्के भूभाग बसॉल्ट खडकाचा व २५ टक्के पूर्णा नदीच्या गाळाने व्यापला असल्याने सरासरी १० ते १२ मीटरपर्यंतची खोली भूजल पुनर्भरणास योग्य आहे. यंदा जिल्ह्यात ३२.६१ टक्क्यांनी पाऊस कमी झाल्याने अपेक्षित पुनर्भरण झालेले नाही. चांदूर बाजार, चांदूर रेल्वे, वरूड, मोर्शी व तिवसा या पाणलोट क्षेत्रात ७५ ते ७८ टक्के पाऊस झाला. उर्वरित लघुपाणलोट क्षेत्रातील (रनआॅफ झोन मधील) निरीक्षण विहिरींच्या पाणीपातळीत मोठी तूट दिसून आली. येथे आगामी काळात पाणीटंचाईचे सावट आहे. या गावांत महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) अधिनियम २००९ मधील ८ (१) च्या तरतुदीनुसार पिण्याचे पाण्याचे स्रोत संरक्षित करण्यासाठी कार्यवाही होणे आवश्यक असल्याचा अहवाल भूजल विभागाने जिल्हाधिकाºयांना दिला आहे.चिखलदरा व धारणी तालुक्यात डोंगराळ भागात गावे आहेत. भूस्तर जलग्रहण क्षमता कमी असल्याने येथील भूजल पातळीत झपाट्याने घट होत आहे. वरूड-मोर्शी अतिविकसित पाणलोट क्षेत्रात समाविष्ट असल्याने व बारमाही सिंचन जास्त असल्याने विहिरी व विंधन विहिरीद्वारे भूजलाचा उपसा मोठ्या प्रमाणात होत आहे. या तालुक्यांतील उपशावर निर्बंध आणावे लागणार असल्याचे विभागाने जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले.उन्हाळ्यात १२९ गावांत पाणीटंचाईभूजल पातळीमधील तूट दिवसेंदिवस वाढत असल्याने जिल्ह्यातील ८४ गावांना आॅक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत, ८० गावांना जानेवारी ते मार्च २०१८ दरम्यान, तर एप्रिल ते जून २०१८ या कालावधीत ११ तालुक्यांमधील १२९ गावांना पाणीटंचाईचे चटके जाणवणार आहेत. उपाययोजनांसाठी आताच नियोजन करावयास हवे.पाणलोट क्षेत्रात नव्या विहिरीस ना!वरूड व मोर्शी तालुका हा अतिविकसित पाणलोट क्षेत्र आहे. या तालुक्यांत मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या भूजल उपशावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. या पाणलोट क्षेत्रात नवीन विहीर खोदण्यास महाराष्ट्र भूजल (विकास आणि व्यवस्थापन) अधिनियम २००८ मधील आठ (१) तरतुदीनुसार बंदी घालणे आवश्यक असल्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आलेला आहे.जिल्ह्यात सरासरीच्या ३६ टक्के प्रमाणात पाऊस कमी झाल्यानेच भूजलातील पाण्याची पातळी सरासरी १.८६ मीटरने कमी झाली आहे. रबीचे सिंचन सुरू झाल्यानंतर ही तूट आणखी वाढणार आहे.- विजय खरड, वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण विभाग