शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक; भूजल पातळीत दोन मीटरने तूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 00:02 IST

यंदाच्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा ३२.६१ टक्के पाऊस कमी झाल्याचे साइड इफेक्ट आता जाणवायला लागले आहे.

ठळक मुद्देधोक्याची घंटा : अचलपुरात सर्वाधिक ५.६६, चांदूर बाजारात ४.१० मीटरने कमी

गजानन मोहोड ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदाच्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा ३२.६१ टक्के पाऊस कमी झाल्याचे साइड इफेक्ट आता जाणवायला लागले आहे. जिल्ह्यातील १४४ निरीक्षण विहिरींच्या सर्वेक्षणाअंती भूजल सर्वेक्षण विभागाचे निरीक्षण धक्कादायक आहे. पावसाळ्यानंतर सर्वच तालुक्यातील पाच वर्षांची सरासरी भूजल पातळी ५.१० मीटर होती. यंदा मात्र ही पातळी ६.९८ मीटर आढळून आली. म्हणजेच यंदा जिल्ह्यातील भूजल पातळीत १.८६ मीटरची तूट आहे. यामध्ये सर्वाधिक अचलपूर तालुक्यात ५.६६, तर चांदूर बाजार तालुक्यात ४.१० मीटरपर्यंत तूट आढळून आली. आगामी काळासाठी ही धोक्याची घंटाच आहे.जिल्ह्याचा ७५ टक्के भूभाग बसॉल्ट खडकाचा व २५ टक्के पूर्णा नदीच्या गाळाने व्यापला असल्याने सरासरी १० ते १२ मीटरपर्यंतची खोली भूजल पुनर्भरणास योग्य आहे. यंदा जिल्ह्यात ३२.६१ टक्क्यांनी पाऊस कमी झाल्याने अपेक्षित पुनर्भरण झालेले नाही. चांदूर बाजार, चांदूर रेल्वे, वरूड, मोर्शी व तिवसा या पाणलोट क्षेत्रात ७५ ते ७८ टक्के पाऊस झाला. उर्वरित लघुपाणलोट क्षेत्रातील (रनआॅफ झोन मधील) निरीक्षण विहिरींच्या पाणीपातळीत मोठी तूट दिसून आली. येथे आगामी काळात पाणीटंचाईचे सावट आहे. या गावांत महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) अधिनियम २००९ मधील ८ (१) च्या तरतुदीनुसार पिण्याचे पाण्याचे स्रोत संरक्षित करण्यासाठी कार्यवाही होणे आवश्यक असल्याचा अहवाल भूजल विभागाने जिल्हाधिकाºयांना दिला आहे.चिखलदरा व धारणी तालुक्यात डोंगराळ भागात गावे आहेत. भूस्तर जलग्रहण क्षमता कमी असल्याने येथील भूजल पातळीत झपाट्याने घट होत आहे. वरूड-मोर्शी अतिविकसित पाणलोट क्षेत्रात समाविष्ट असल्याने व बारमाही सिंचन जास्त असल्याने विहिरी व विंधन विहिरीद्वारे भूजलाचा उपसा मोठ्या प्रमाणात होत आहे. या तालुक्यांतील उपशावर निर्बंध आणावे लागणार असल्याचे विभागाने जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले.उन्हाळ्यात १२९ गावांत पाणीटंचाईभूजल पातळीमधील तूट दिवसेंदिवस वाढत असल्याने जिल्ह्यातील ८४ गावांना आॅक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत, ८० गावांना जानेवारी ते मार्च २०१८ दरम्यान, तर एप्रिल ते जून २०१८ या कालावधीत ११ तालुक्यांमधील १२९ गावांना पाणीटंचाईचे चटके जाणवणार आहेत. उपाययोजनांसाठी आताच नियोजन करावयास हवे.पाणलोट क्षेत्रात नव्या विहिरीस ना!वरूड व मोर्शी तालुका हा अतिविकसित पाणलोट क्षेत्र आहे. या तालुक्यांत मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या भूजल उपशावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. या पाणलोट क्षेत्रात नवीन विहीर खोदण्यास महाराष्ट्र भूजल (विकास आणि व्यवस्थापन) अधिनियम २००८ मधील आठ (१) तरतुदीनुसार बंदी घालणे आवश्यक असल्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आलेला आहे.जिल्ह्यात सरासरीच्या ३६ टक्के प्रमाणात पाऊस कमी झाल्यानेच भूजलातील पाण्याची पातळी सरासरी १.८६ मीटरने कमी झाली आहे. रबीचे सिंचन सुरू झाल्यानंतर ही तूट आणखी वाढणार आहे.- विजय खरड, वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण विभाग