शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
खात्यात काय सुरु माहिती नाही, निधी वळल्यावर संतापाला काय अर्थ? वडेट्टीवारांचा शिरसाटांवर निशाणा
3
नाशिकमध्ये आणखी एक हत्या! आरोपीने हत्या केल्यानंतर स्वतःच नेले जिल्हा रुग्णालयात, स्वतःहून गेला पोलीस ठाण्यात
4
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
5
हिंदी चित्रपटात का दिसत नाहीत भरत जाधव? सांगितलं महत्त्वाचं कारण, म्हणाले- "एकदा मला नोकराची भूमिका..."
6
भारताच्या भीतीनं कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये भूकंप, असा पडला की आता बाहेर येणंही झालं कठीण
7
Rashid Khan: असा झेल कधीच पाहिला नसेल, गुजरात- हैदराबाद सामन्यात राशीद खानची जबरदस्त फिल्डिंग
8
"दोन पेग मारल्यानंतर सलमान खानने माझ्याशी..."; मिका सिंगने सांगितली भाईजानची कधीही न ऐकलेली गोष्ट
9
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
10
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
11
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
12
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय
13
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
14
नारळ पाण्यामुळे शुगर लेव्हल वाढते का, किती असते नॅचरल शुगर, शरीरावर काय होतो परिणाम?
15
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
16
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
17
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
18
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
19
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
20
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?

धक्कादायक! पूररेषा अस्तित्वातच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 23:47 IST

राज्य शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या नियमानवलीनुसार निळ्या व लाल पूररेषेतील बांधकामांना अधिकृत करता येत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

ठळक मुद्देसुमारे ४० हजार मालमत्ता अनधिकृत : नाल्यावर बेकायदा बांधकाम

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्य शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या नियमानवलीनुसार निळ्या व लाल पूररेषेतील बांधकामांना अधिकृत करता येत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर शहरात नाल्यांच्या ठिकाणी पूररेषाच अस्तित्वात नसल्याची धक्कादायक माहिती आहे. पूररेषा अस्तित्वात नसल्याने अंबा नाल्यासह अन्य नाल्यांच्या काठावर बांधण्यात आलेली सुमारे ३० ते ४० हजार घरे अनधिकृत ठरणार आहेत. या अनधिकृत बांधकामांवर महापालिका कुठली कारवाई करते, याकडे अमरावतीकरांचे लक्ष वेधले गेले आहे.अंबा नाल्याला आॅक्टोबरच्या दुसºया आठवड्यात आलेल्या पुराच्या पार्श्वभूमीवर पूररेषेचा मुद्दा उजेडात आला. पूररेषेच्या ९ ते १५ मीटर अंतरात बांधकाम करता येत नाही. मात्र, शहरात नाल्याच्या खेटून शेकडो इमारती उभ्या राहिल्या आहेत. त्या महापालिकेच्या लेखी अनधिकृत आहेत. मात्र, पूररेषा अस्तित्वात नसल्याने या बेकायदा बांधकामावर नेमकी कुठली कारवाई करावी, याबाबत संभ्रम आहे.अनधिकृतची मोजदादच नाहीअमरावती : तूर्तास नगररचना विभागाकडून शहर विकास आराखडा (डीपी) बनविणे सुरू आहे. याआधी १९९२ मध्ये शहर विकास आराखडा बनावण्यात आला. मात्र त्यावेळी महापालिकेने पुररेषाच आखल नाही. अंबानाल्याचे पाणी नाल्याकाठच्या घरात शिरल्याच्या पार्श्वभूमीवर पुररेषा अस्तित्वात आहे की नाही, याचा धांडोळा घेतला असता त्याचे उत्तर नकारार्थी आले. अर्थात नाल्याच्या कुठल्याही बाजूने एवढा समास सोडन बांधकाम करता येणार नाही किंवा करता येणार, याबाबतची पुररेषा वा मार्किंग करण्यात आले नाही. त्यामुळे नाल्याच्या काठावर नेमके किती बांधकाम करण्यात आली. त्यातील परवानगी घेऊन किती करण्यात आली, अनधिकृत किती आहेत, याचा कुठलाही लेखाजोखा महापालिकेच्या नगररचना विभागाकडे उपलब्ध नाही. आता २०१८ मध्ये प्रस्तावित असलेल्या डीपीमध्ये पुररेषा आखली जाईल, अशी पळवाट महापालिकेने शोधली आहे.

नव्या ‘डीपी’मध्ये फ्लड लाईन१९९२ साली आलेल्या शहर विकास आराखड्यात नाल्याकिनारी निळी व लाल पूररेषा आखण्यातच आली नाही. आता ही चूक लक्षात आल्यानंतर जलसंपदा विभागाकडे पत्रव्यवहार करण्यात आला असून, २०१८ मध्ये प्रस्तावित शहर विकास आराखड्यात पूररेषा अर्थात फ्लड लाईनचा समावेश केला जाणार आहे.पूररेषा बदलण्याचा घाट!राज्य शासनाने नुकतीच बांधकामे अधिकृत करण्याबाबत नियमावली जाहीर केली आहे. त्यात निळ्या व लाल पूररेषेतील बांधकामांना अधिकृत करता येत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे थेट पूररेषा बदलण्याचा घाट काहींकडून रचला जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सन २०१८ च्या मध्यावधीत शहर विकास आराखडा मंजुरीसाठी महापालिका सभागृहात येण्याचे संकेत आहेत.