शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
4
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
5
'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
6
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
8
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
9
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
10
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
11
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
12
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
13
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
14
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
15
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
16
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
17
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
18
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
19
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
20
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी

पश्चिम विदर्भावर शिवसेनेचे लक्ष

By admin | Updated: January 31, 2015 23:11 IST

पश्चिम विदर्भात संघटनेकडे विशेष लक्ष न देणाऱ्या शिवसेनेने आता लक्ष केंद्रित केले आहे. शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती महापालिका निवडणुका

अमरावती : पश्चिम विदर्भात संघटनेकडे विशेष लक्ष न देणाऱ्या शिवसेनेने आता लक्ष केंद्रित केले आहे. शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे.पश्चिम विदर्भ शिवसेनेचा बाल्लेकिल्ला म्हणून मानला जातो. मात्र विधानसभा निवडणुकीत मतदारांनी भाजपाला भरभरून यश मिळवून दिले.यामध्ये शिवसेनेला अमरावती जिल्ह्यात एकही जागा कायम ठेवता आली नाही. त्यामुळे आता पश्चिम विदर्भातील शिवसेनेचा बाल्लेकिला कायम ठेवण्यासाठी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत चित्र बदलावे यासाठी शिवसैनिकांना नव्याने ऊर्जा देण्यासाठी सेना नेते आणि पक्षातीलप्रमुख पदाधिकारी यांच्यावर ही जबाबदारी सोपविली आहे. याचाच एक भाग म्हणून अमरावतीत शुक्रवारी राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि रवींद्र मिर्लेकर यांनी जिल्ह्यातील सेना पदाधिकारी यांच्याशी संघटनात्मक आणि विधानसभा निवडणुकीतील पराभवाची कारणमीमांसा जाणून घेतली. संघटन बांधणीचा कानमंत्र दिला आहे. शासकीय विश्रामगृहात या सेना नेत्यांनी विधानसभा मतदारसंघनिहाय चर्चा केली. यावेळी जिल्हाप्रमुख संजय बंड, प्रशांत वानखडे, बाळासाहेब हिंगणीकर, सुधीर सूर्यवंशी व अन्य प्रमुख सेना पदाधिकारी उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीप्रमाणेच आगामी निवडणुका स्वतंत्र लढविण्याच्या उद्देशाने स्थानिक पातळीवर संघटन मजबूत करताना तरूणाईला फोकस केले जाणार आहे. विधानसभा निवडणूकीत पश्चिम विदर्भात शिवसेनेला अनअपेक्षित होते .यापुर्वी या भागात सर्व निवडणूकीत मतदारांनी उस्फूर्त साथ दिली आहे. त्यामुळे कुठे कमी पडलो पुढील वाटचाल कशी राहील कार्यकर्त्याचे मनोबल कशाप्रकारे उंचावेल यावर या चर्चेत भर देण्यात आला आहे. त्यामुळे आमागी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका साठीही ही संघटनात्मक चर्चा महत्वपूर्ण मानली जात असल्याचे सेनेच्या गोठात बोलले जात आहे. (प्रतिनिधी)