शहरं
Join us  
Trending Stories
1
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
2
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
3
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
4
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
5
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
6
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
7
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
8
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
9
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
10
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
11
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
12
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
14
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
15
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
16
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
17
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
18
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
19
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
20
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे

शिवसेचा जिल्हा कचेरीवर मोर्चा

By admin | Updated: August 9, 2014 00:37 IST

राज्यातील आघाडी सरकार विविध पातळयावर अपयशी ठरले असल्याने जिल्ह्यातील विविध प्रश्नांच्या पुर्ततेसाठी शुक्रवारी इर्विन चौकातून शिवसेनेने जिल्हा कचेरीवर मोर्चा काढून शासन व प्रशासनाचे लक्ष वेधले.

अमरावती : राज्यातील आघाडी सरकार विविध पातळयावर अपयशी ठरले असल्याने जिल्ह्यातील विविध प्रश्नांच्या पुर्ततेसाठी शुक्रवारी इर्विन चौकातून शिवसेनेने जिल्हा कचेरीवर मोर्चा काढून शासन व प्रशासनाचे लक्ष वेधले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसमोर महत्त्वाचे प्रश्न मांडून ते निकाली काढण्याची मागणी शिवसेनेच्या पुढाऱ्यांनी केली. शिवसेनेच्या प्रमुख मागण्यामध्ये अतिवृष्टी व गारपीठग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यात यावी, पुरामुळे वाहुन गेलेल्या घरांचे पुनर्वसन व आर्थिक मदत देण्यात यावी, महावितरण कंपनीचा गलथान कारभार व शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे प्रकार थांबवावे, मागील वर्षी झालेली पिकांची नुकसान भरपाई अद्यापपर्यंत मिळालेली नाही. ती त्वरित देण्यात यावी, ज्या गावांना पुराचा धोका संभवतो अशा ठिकाणी पूरसंरक्षक भिंतीची व्यवस्था करावी, किंवा सुरक्षित ठिकाणी नागरीकांचे पुनर्वसन करण्यात यावे, तसेच तूर व हरभऱ्याचे नाफेडव्दारा मिळणारे पैसे अद्याप शेतकऱ्यांना मिळाले नाहीत ते त्वरित द्यावे, सुपरस्पेशालिटी, जिल्हा सामान्य रूग्णालय तसेच स्त्री रूग्णालयासह संपूर्ण जिल्ह्याची आरोग्य सेवा कोलमडली आहे ती सुधारावी, अशा विविध मागण्या करीत शहरातील घरकुलाचे प्रलंबित प्रश्न सोडवून गोरगरीब लाभार्थ्यांना लाभ द्यावा, विलासनगर येथील झोपडपट्टीतील रहिवाशांना घरे व वीज पुरवठा करावा, शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करताना राष्ट्रीयीकृत बँकांकडून शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक, महापुरामुळे निर्माण होणारा धोका टाळण्यासाठी डीसीपीने मंजूर केलेला निधी जिल्हा परिषदेला वळता करून कामे मार्गी लावावे, अशा विविध मागण्या जिल्हाधिकारी किरण गीते यांच्याकडे करण्यात आल्या. दरम्यान यासंदर्भात स्थानिक स्तरावरील प्रश्न त्वरित निकाली काढले जातील आणि जे प्रश्न शासनाकडे पाठविण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिले.यावेळी खा आंनदराव अडसुळ, संजय बंड,अंनत गुढे,अभिजीत अडसुळ,प्रशांत वानखडे, बाळासाहेब हिंगणीकर, बाळासाहेब भागवत, दिनेश वानखडे, सुधीर सुर्यवंशी, दिगंबर डहाके, नाना नागमोते अमोल निस्ताने बाळा तळोकार, प्रविण हरमकर,भैय्या बरवट, आशिष सहारे, प्रकाश मंचलवार, नितीन हटवार विजय होटे, राजेंद्र तायडे,प्रविण अडसपुरे,नितीन तारेकर, आशिष धर्माळे, बंडु साऊत,विकास येवले नरेद्रपडोळे, महेंद्र दिप्टे, लक्ष्मी शर्मा याच्यासह मोठया संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)