शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

‘शिवाजी’ची निवडणूक रविवारी; ‘पाटील’ की ‘देशमुख’, बाप्पा कोणाला पावणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2022 13:44 IST

आजीवन सभासदांच्या पाल्यांना नोकरी, कुटुंबातील सभासदाचा मुद्दा गाजणार

अमरावती : येथील श्री. शिवाजी शिक्षण संस्थेची पंचवार्षिक निवडणूक रविवार, दि. ११ सप्टेंबर रोजी होऊ घातली आहे. शिवाजीचा रणसंग्राम गणेशोत्सवाच्या काळात चांगलाच रंगत असून, यंदा ‘पाटील की देशमुख’ कोणाला बाप्पा पावणार, हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होणार आहे. मात्र, यंदाची निवडणूक आजीवन सभासदांच्या पाल्यांना कायमस्वरूपी नोकरी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना नव्याने ‘शिवाजी’त सभासदत्वाचा मुद्दा गाजणार आहे. नरेशचंद्र ठाकरे आणि हर्षवर्धन देशमुख यांच्यात काट्याची लढत असल्याचे चित्र आहे.

श्री शिवाजी शिक्षण संस्थेला आतापर्यंत बाबासाहेब घारफळकर, दादासाहेब काळमेघ, रावसाहेब इंगोले, वसंतराव धोत्रे, अरुण शेळके अशा अध्यक्षांचे नेतृत्व लाभले आहे. आता हर्षवर्धन देशमुख यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ नुकताच संपुष्टात आला आहे. मागील निवडणुकीत अरुण शेळकेंच्या विरोधात विविध गटांनी एकत्र येऊन हर्षवर्धन देशमुखांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ घातली होती. मात्र यंदाच्या निवडणुकीत ‘पाटील’ ‘देशमुख’ वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. त्यामुळे मतदार आता कुठला निर्णय घेतात? हे ११ तारखेचा निकाल अवलंबून राहणार आहे.

मागील निवडणुकीत अरुण शेळके आणि हर्षवर्धन देशमुख यांच्यात ७० मतांच्या जवळपास अंतर होते. आता सपकाळ गट प्रामुख्याने ठाकरेंच्या विकास पॅनलसोबत असल्याने त्यांच्याकडे मजबूत पाठिंबा आहे. मात्र यंदा शेळके गटाची भूमिका ‘वेट ॲण्ड वॉच’ असली तरी शेळकेंचा लाभ विकास पॅनेललाच होईल, असे प्रथमदर्शनी दिसून येते. काहीही असले तरी यंदा ‘शिवाजी’ची निवडणूक आजीवन सभासदांच्या पाल्यांना कायमस्वरूपी नोकरी आणि त्यांच्या कुटुंबात नव्याने सभासदत्व बहाल करणे या दोन प्रमुख मुद्द्यावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे हे दोनही मुद्दे जी व्यक्ती सोडवू शकेल, ज्यांच्याकडे निर्णय घेण्याची क्षमता आहे, त्यांच्याच पाठीशी आजीवन सभासद उभे राहतील, हे वास्तव आहे. गत पाच वर्षांचा सत्तापक्षाचा अनुभव आजीवन सभासदांनी घेतला आहे. आता पुढे काय करावे, हे दि. ११ सप्टेंबर रोजी मतपेटीतून ते दाखवून देतील, अशीही चर्चा जोर धरू लागली आहे.

शिवाजी संस्थेत अशी आहे मतदार संख्या

श्री शिवाजी शिक्षण संस्थेत साधारणपणे देशमुख मतदारांची संख्या ८०च्या घरात असून, इतर एकूण १५० मते तर उर्वरित सर्व ४८०च्या वर मते ही पाटलांची आहेत. त्यामुळे संख्याबळ लक्षात घेता, प्रत्येक पॅनलमध्ये पाटील उमेदवारांची संख्याच अधिक असते. यंदाची निवडणूक पहिल्यांदाच आजीवन सभासदांच्या पाल्यांना नोकरी आणि त्यांच्या कुटुंबातील नव्याने सभासदत्व यावर ‘फोकस’ झाली आहे. त्यामुळे बाजी कोण मारणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणHarshvardhan Deshmukhहर्षवर्धन देशमुखAmravatiअमरावती