शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

‘शिवाजी’ची निवडणूक रविवारी; ‘पाटील’ की ‘देशमुख’, बाप्पा कोणाला पावणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2022 13:44 IST

आजीवन सभासदांच्या पाल्यांना नोकरी, कुटुंबातील सभासदाचा मुद्दा गाजणार

अमरावती : येथील श्री. शिवाजी शिक्षण संस्थेची पंचवार्षिक निवडणूक रविवार, दि. ११ सप्टेंबर रोजी होऊ घातली आहे. शिवाजीचा रणसंग्राम गणेशोत्सवाच्या काळात चांगलाच रंगत असून, यंदा ‘पाटील की देशमुख’ कोणाला बाप्पा पावणार, हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होणार आहे. मात्र, यंदाची निवडणूक आजीवन सभासदांच्या पाल्यांना कायमस्वरूपी नोकरी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना नव्याने ‘शिवाजी’त सभासदत्वाचा मुद्दा गाजणार आहे. नरेशचंद्र ठाकरे आणि हर्षवर्धन देशमुख यांच्यात काट्याची लढत असल्याचे चित्र आहे.

श्री शिवाजी शिक्षण संस्थेला आतापर्यंत बाबासाहेब घारफळकर, दादासाहेब काळमेघ, रावसाहेब इंगोले, वसंतराव धोत्रे, अरुण शेळके अशा अध्यक्षांचे नेतृत्व लाभले आहे. आता हर्षवर्धन देशमुख यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ नुकताच संपुष्टात आला आहे. मागील निवडणुकीत अरुण शेळकेंच्या विरोधात विविध गटांनी एकत्र येऊन हर्षवर्धन देशमुखांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ घातली होती. मात्र यंदाच्या निवडणुकीत ‘पाटील’ ‘देशमुख’ वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. त्यामुळे मतदार आता कुठला निर्णय घेतात? हे ११ तारखेचा निकाल अवलंबून राहणार आहे.

मागील निवडणुकीत अरुण शेळके आणि हर्षवर्धन देशमुख यांच्यात ७० मतांच्या जवळपास अंतर होते. आता सपकाळ गट प्रामुख्याने ठाकरेंच्या विकास पॅनलसोबत असल्याने त्यांच्याकडे मजबूत पाठिंबा आहे. मात्र यंदा शेळके गटाची भूमिका ‘वेट ॲण्ड वॉच’ असली तरी शेळकेंचा लाभ विकास पॅनेललाच होईल, असे प्रथमदर्शनी दिसून येते. काहीही असले तरी यंदा ‘शिवाजी’ची निवडणूक आजीवन सभासदांच्या पाल्यांना कायमस्वरूपी नोकरी आणि त्यांच्या कुटुंबात नव्याने सभासदत्व बहाल करणे या दोन प्रमुख मुद्द्यावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे हे दोनही मुद्दे जी व्यक्ती सोडवू शकेल, ज्यांच्याकडे निर्णय घेण्याची क्षमता आहे, त्यांच्याच पाठीशी आजीवन सभासद उभे राहतील, हे वास्तव आहे. गत पाच वर्षांचा सत्तापक्षाचा अनुभव आजीवन सभासदांनी घेतला आहे. आता पुढे काय करावे, हे दि. ११ सप्टेंबर रोजी मतपेटीतून ते दाखवून देतील, अशीही चर्चा जोर धरू लागली आहे.

शिवाजी संस्थेत अशी आहे मतदार संख्या

श्री शिवाजी शिक्षण संस्थेत साधारणपणे देशमुख मतदारांची संख्या ८०च्या घरात असून, इतर एकूण १५० मते तर उर्वरित सर्व ४८०च्या वर मते ही पाटलांची आहेत. त्यामुळे संख्याबळ लक्षात घेता, प्रत्येक पॅनलमध्ये पाटील उमेदवारांची संख्याच अधिक असते. यंदाची निवडणूक पहिल्यांदाच आजीवन सभासदांच्या पाल्यांना नोकरी आणि त्यांच्या कुटुंबातील नव्याने सभासदत्व यावर ‘फोकस’ झाली आहे. त्यामुळे बाजी कोण मारणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणHarshvardhan Deshmukhहर्षवर्धन देशमुखAmravatiअमरावती