शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

शिवाजी महाराज लोकहिताचे मूल्य जपणारे राजे; शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने शिवटेकडीवर व्याख्यान

By उज्वल भालेकर | Updated: February 19, 2024 18:38 IST

बालवख्याती आराध्या गजाननराव ठाकरे व राधा मनोज जुमळे यांचे देखील व्याख्यान झाले.

अमरावती: राजेशाही काळात शेतीविषयक धोरण आखून पावसाच्या पाण्याचे नियोजन करणे, शेतकऱ्यांसाठी सहकारी बँकांची निर्मिती करणे, शेतकऱ्यांना कर्ज पुरवण्याची योजना करणे, दुष्काळी वर्षात शेतसारा वसूल न करणे या धोरणामुळेच छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे स्वराज्य निर्माण करू शकले. त्यामुळेच लोकहिताची मूल्य जोपासणारे राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख असल्याचे मत रवी मानव यांनी सोमवारी शिवटेकडी येथे आयोजित व्याख्यान कार्यक्रमात व्यक्त केले.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विविध उपक्रम व स्पर्धांनी युक्त अशी शिवजयंतीचा उत्सव शिवटेकडी अमरावती येथे सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीतर्फे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मनपा चे आयुक्त देविदास पवार, तुषार भारतीय, मराठा सेवा संघाचे प्रदेश उपाध्यक्ष अरविंद गावंडे, माजी महापौर विलास इंगोले, दर्यापूरचे आमदार बळवंत वानखडे, काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस किशोर बोरकर, माजी नगरसेवक बबलू शेखावत, युवक काँग्रेसचे भैय्या पवार, माजी नगरसेवक बंडू हिवसे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रमोद इंगोले, शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्राचार्य अंजली ठाकरे, जिजाऊ ब्रिगेडच्या मनाली तायडे, महात्मा फुले को-ऑपरेटिव्ह बँकेचे माजी संचालक राजू भेले, डॉक्टर पंजाबराव देशमुख को-ऑपरेटिव बँकेचे संचालक राजेंद्र महल्ले, नितीन पवित्रकार, गजानन राजगुरे उपस्थित होते. 

यावेळी बालवख्याती आराध्या गजाननराव ठाकरे व राधा मनोज जुमळे यांचे देखील व्याख्यान झाले. शिवजयंती घराघरात शिवराय मनामनात अशा विचाराद्वारे शिवजयंतीसाठी लोकांची उपस्थिती वाढवण्यासाठी विविध उपाय योजना करून लोकांना शिवरायांचे चरित्र सांगून सुसंस्कृत समाज निर्माण करता येईल असे विचार कार्यक्रमाचे अध्यक्ष मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये बोलताना अश्विन चौधरी यांनी व्यक्त केले. यावेळी शिवटेकडी येथील दर्ग्याचे मुजाहिर अन्वर भाई यांचा पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

टॅग्स :AmravatiअमरावतीShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज