शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

शिवाजी महाराज लोकहिताचे मूल्य जपणारे राजे; शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने शिवटेकडीवर व्याख्यान

By उज्वल भालेकर | Updated: February 19, 2024 18:38 IST

बालवख्याती आराध्या गजाननराव ठाकरे व राधा मनोज जुमळे यांचे देखील व्याख्यान झाले.

अमरावती: राजेशाही काळात शेतीविषयक धोरण आखून पावसाच्या पाण्याचे नियोजन करणे, शेतकऱ्यांसाठी सहकारी बँकांची निर्मिती करणे, शेतकऱ्यांना कर्ज पुरवण्याची योजना करणे, दुष्काळी वर्षात शेतसारा वसूल न करणे या धोरणामुळेच छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे स्वराज्य निर्माण करू शकले. त्यामुळेच लोकहिताची मूल्य जोपासणारे राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख असल्याचे मत रवी मानव यांनी सोमवारी शिवटेकडी येथे आयोजित व्याख्यान कार्यक्रमात व्यक्त केले.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विविध उपक्रम व स्पर्धांनी युक्त अशी शिवजयंतीचा उत्सव शिवटेकडी अमरावती येथे सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीतर्फे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मनपा चे आयुक्त देविदास पवार, तुषार भारतीय, मराठा सेवा संघाचे प्रदेश उपाध्यक्ष अरविंद गावंडे, माजी महापौर विलास इंगोले, दर्यापूरचे आमदार बळवंत वानखडे, काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस किशोर बोरकर, माजी नगरसेवक बबलू शेखावत, युवक काँग्रेसचे भैय्या पवार, माजी नगरसेवक बंडू हिवसे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रमोद इंगोले, शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्राचार्य अंजली ठाकरे, जिजाऊ ब्रिगेडच्या मनाली तायडे, महात्मा फुले को-ऑपरेटिव्ह बँकेचे माजी संचालक राजू भेले, डॉक्टर पंजाबराव देशमुख को-ऑपरेटिव बँकेचे संचालक राजेंद्र महल्ले, नितीन पवित्रकार, गजानन राजगुरे उपस्थित होते. 

यावेळी बालवख्याती आराध्या गजाननराव ठाकरे व राधा मनोज जुमळे यांचे देखील व्याख्यान झाले. शिवजयंती घराघरात शिवराय मनामनात अशा विचाराद्वारे शिवजयंतीसाठी लोकांची उपस्थिती वाढवण्यासाठी विविध उपाय योजना करून लोकांना शिवरायांचे चरित्र सांगून सुसंस्कृत समाज निर्माण करता येईल असे विचार कार्यक्रमाचे अध्यक्ष मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये बोलताना अश्विन चौधरी यांनी व्यक्त केले. यावेळी शिवटेकडी येथील दर्ग्याचे मुजाहिर अन्वर भाई यांचा पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

टॅग्स :AmravatiअमरावतीShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज