शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
4
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
6
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
7
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
8
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
9
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
10
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
11
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
12
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
13
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
14
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
15
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
16
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
17
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
18
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
19
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
20
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस

शिवाजी महाराज लोकहिताचे मूल्य जपणारे राजे; शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने शिवटेकडीवर व्याख्यान

By उज्वल भालेकर | Updated: February 19, 2024 18:38 IST

बालवख्याती आराध्या गजाननराव ठाकरे व राधा मनोज जुमळे यांचे देखील व्याख्यान झाले.

अमरावती: राजेशाही काळात शेतीविषयक धोरण आखून पावसाच्या पाण्याचे नियोजन करणे, शेतकऱ्यांसाठी सहकारी बँकांची निर्मिती करणे, शेतकऱ्यांना कर्ज पुरवण्याची योजना करणे, दुष्काळी वर्षात शेतसारा वसूल न करणे या धोरणामुळेच छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे स्वराज्य निर्माण करू शकले. त्यामुळेच लोकहिताची मूल्य जोपासणारे राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख असल्याचे मत रवी मानव यांनी सोमवारी शिवटेकडी येथे आयोजित व्याख्यान कार्यक्रमात व्यक्त केले.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विविध उपक्रम व स्पर्धांनी युक्त अशी शिवजयंतीचा उत्सव शिवटेकडी अमरावती येथे सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीतर्फे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मनपा चे आयुक्त देविदास पवार, तुषार भारतीय, मराठा सेवा संघाचे प्रदेश उपाध्यक्ष अरविंद गावंडे, माजी महापौर विलास इंगोले, दर्यापूरचे आमदार बळवंत वानखडे, काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस किशोर बोरकर, माजी नगरसेवक बबलू शेखावत, युवक काँग्रेसचे भैय्या पवार, माजी नगरसेवक बंडू हिवसे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रमोद इंगोले, शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्राचार्य अंजली ठाकरे, जिजाऊ ब्रिगेडच्या मनाली तायडे, महात्मा फुले को-ऑपरेटिव्ह बँकेचे माजी संचालक राजू भेले, डॉक्टर पंजाबराव देशमुख को-ऑपरेटिव बँकेचे संचालक राजेंद्र महल्ले, नितीन पवित्रकार, गजानन राजगुरे उपस्थित होते. 

यावेळी बालवख्याती आराध्या गजाननराव ठाकरे व राधा मनोज जुमळे यांचे देखील व्याख्यान झाले. शिवजयंती घराघरात शिवराय मनामनात अशा विचाराद्वारे शिवजयंतीसाठी लोकांची उपस्थिती वाढवण्यासाठी विविध उपाय योजना करून लोकांना शिवरायांचे चरित्र सांगून सुसंस्कृत समाज निर्माण करता येईल असे विचार कार्यक्रमाचे अध्यक्ष मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये बोलताना अश्विन चौधरी यांनी व्यक्त केले. यावेळी शिवटेकडी येथील दर्ग्याचे मुजाहिर अन्वर भाई यांचा पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

टॅग्स :AmravatiअमरावतीShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज