शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
3
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
4
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
7
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
8
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
9
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
10
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
12
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
13
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
14
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
15
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
16
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
17
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
18
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
19
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी महाराज लोकहिताचे मूल्य जपणारे राजे; शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने शिवटेकडीवर व्याख्यान

By उज्वल भालेकर | Updated: February 19, 2024 18:38 IST

बालवख्याती आराध्या गजाननराव ठाकरे व राधा मनोज जुमळे यांचे देखील व्याख्यान झाले.

अमरावती: राजेशाही काळात शेतीविषयक धोरण आखून पावसाच्या पाण्याचे नियोजन करणे, शेतकऱ्यांसाठी सहकारी बँकांची निर्मिती करणे, शेतकऱ्यांना कर्ज पुरवण्याची योजना करणे, दुष्काळी वर्षात शेतसारा वसूल न करणे या धोरणामुळेच छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे स्वराज्य निर्माण करू शकले. त्यामुळेच लोकहिताची मूल्य जोपासणारे राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख असल्याचे मत रवी मानव यांनी सोमवारी शिवटेकडी येथे आयोजित व्याख्यान कार्यक्रमात व्यक्त केले.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विविध उपक्रम व स्पर्धांनी युक्त अशी शिवजयंतीचा उत्सव शिवटेकडी अमरावती येथे सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीतर्फे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मनपा चे आयुक्त देविदास पवार, तुषार भारतीय, मराठा सेवा संघाचे प्रदेश उपाध्यक्ष अरविंद गावंडे, माजी महापौर विलास इंगोले, दर्यापूरचे आमदार बळवंत वानखडे, काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस किशोर बोरकर, माजी नगरसेवक बबलू शेखावत, युवक काँग्रेसचे भैय्या पवार, माजी नगरसेवक बंडू हिवसे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रमोद इंगोले, शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्राचार्य अंजली ठाकरे, जिजाऊ ब्रिगेडच्या मनाली तायडे, महात्मा फुले को-ऑपरेटिव्ह बँकेचे माजी संचालक राजू भेले, डॉक्टर पंजाबराव देशमुख को-ऑपरेटिव बँकेचे संचालक राजेंद्र महल्ले, नितीन पवित्रकार, गजानन राजगुरे उपस्थित होते. 

यावेळी बालवख्याती आराध्या गजाननराव ठाकरे व राधा मनोज जुमळे यांचे देखील व्याख्यान झाले. शिवजयंती घराघरात शिवराय मनामनात अशा विचाराद्वारे शिवजयंतीसाठी लोकांची उपस्थिती वाढवण्यासाठी विविध उपाय योजना करून लोकांना शिवरायांचे चरित्र सांगून सुसंस्कृत समाज निर्माण करता येईल असे विचार कार्यक्रमाचे अध्यक्ष मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये बोलताना अश्विन चौधरी यांनी व्यक्त केले. यावेळी शिवटेकडी येथील दर्ग्याचे मुजाहिर अन्वर भाई यांचा पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

टॅग्स :AmravatiअमरावतीShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज