शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

वाळवंटातील जहाज महाराष्ट्रात भरकटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:10 IST

अमरावती : वाळवटांतील जहाज उंट उन्हाळा लागताच महाराष्ट्रात चारा पाण्याच्या शोधार्थ दाखल होतात. हा प्राणी त्या समुदायासाठी जीव की ...

अमरावती : वाळवटांतील जहाज उंट उन्हाळा लागताच महाराष्ट्रात चारा पाण्याच्या शोधार्थ दाखल होतात. हा प्राणी त्या समुदायासाठी जीव की प्राण, असा सर्वसामान्यात समज रूढ आहे. मात्र, गरज पडल्यास उंट वाटेतच टाकून ते निघून जातात. असे अलीकडच्या दोन घटनांनी स्पष्ट झाले. प्राणी मित्र संघटनानी मागे पडलेल्या व त्यामुळे रस्त्यात भरकटलेल्या अशा दोन उंटाची सुश्रृशा करून पुढील उपचाराकरिता वेगवेगळ्या प्राणी संघटनाकडे सोपविले आहे. चांदूर बाजार ते ब्राम्हणवाडा शिवारात उंट जखमी आणि बेवारस अवस्थेत अभिजित गणोरकर यांना दिसला. तो जखमी आणि बेवारस अवस्थेत असल्याने त्यांनी याची माहिती 'वसा' संस्थेला दिली. वसाचे गणेश अकर्ते, मुकेश वाघमारे, भूषण सायंके, निखिल फुटाणे आणि आकाश वानखडे यांनी ब्राम्हणवाडा शिवारातून जखमी उंटाला रेस्क्यू केले. उंट जखमी अवस्थेत भुकेने व्याकूळ झाल्याने तो जवळ कुणाला येऊ देत नव्हता. जखमी उंटाला अमरावतीत उपचाराकरिता आणण्यासाठी गोरक्षण संस्था अमरावती यांनी मदत केली.

------------------------

प्राण्यांचा उपयोग नसला की त्यांना बेवारस सोडतात

अमरावती : जिल्ह्यातील ही तिसरी घटना आहे. उंटाचा कळप घेऊन येणारे हे राजस्थानी लोक जोपर्यंत उंटाकडून उत्पन्न मिळते तोपर्यंत त्याचा सांभाळ करतात. एकदा तो उंट जखमी झाला किंवा आजारी पडल्यास त्याची सुश्रुषा उपचार न करता त्याला बेवारस सोडून पुढे निघून जातात. मालक आणि इतर संवगड्यापासून दूर झाल्यानंतर हे प्राणी स्ट्रेसमध्ये जातात. आधीच जखमी अवस्थेत असल्याने त्यांना त्यांच्या स्थळापर्यंत परत जाता येत नाही.

---------------------------------------------------------------------------------------

श्री गोरक्षण संस्था आणि वसा घेत आहेत काळजी

ब्राम्हणवाडा शिवारातून रेस्क्यू केलेल्या जखमी उंटाची देखभाल व त्याला आश्रय दस्तुरनगर येथील गोसदन येथे घेण्यात येत आहे.

---------------

अन्य एका गटने सावळापूर, आसेगाव पूर्णा शिवारात ग्रामस्थांनी जखमी उंटाला पाहिले. त्यांनी याची माहिती 'हेल्प फाऊंडेशन' सस्थेला दिली. त्यांनी या उंटाला रेस्क्यू करून अमरावतीच्या 'वऱ्हाड' या संस्थेला पुढील उपचाराकरिता देण्यात आले. काही दिवसांआधी अशा जखमी उंटाबद्दल 'हेल्प फाऊंडेशन'ला माहिती मिळाली होती. तो उंट अत्यवस्थेत होता. त्याला निट उभे राहता येत नव्हते. त्याच्या पायाचे हाड तुटले असावे, असा अंदाज व्यक्त होत होता. उंटाच्या उपचारावर येणारा खर्च अधिक असल्यामुळे हेल्प फाऊंडेशनने तो उंट नागपूर येथील 'माहेश्वरी फाऊंडेशनकडे ऑपरेशनकरिता पाठविला. मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.