शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

वाळवंटातील जहाज महाराष्ट्रात भरकटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:10 IST

अमरावती : वाळवटांतील जहाज उंट उन्हाळा लागताच महाराष्ट्रात चारा पाण्याच्या शोधार्थ दाखल होतात. हा प्राणी त्या समुदायासाठी जीव की ...

अमरावती : वाळवटांतील जहाज उंट उन्हाळा लागताच महाराष्ट्रात चारा पाण्याच्या शोधार्थ दाखल होतात. हा प्राणी त्या समुदायासाठी जीव की प्राण, असा सर्वसामान्यात समज रूढ आहे. मात्र, गरज पडल्यास उंट वाटेतच टाकून ते निघून जातात. असे अलीकडच्या दोन घटनांनी स्पष्ट झाले. प्राणी मित्र संघटनानी मागे पडलेल्या व त्यामुळे रस्त्यात भरकटलेल्या अशा दोन उंटाची सुश्रृशा करून पुढील उपचाराकरिता वेगवेगळ्या प्राणी संघटनाकडे सोपविले आहे. चांदूर बाजार ते ब्राम्हणवाडा शिवारात उंट जखमी आणि बेवारस अवस्थेत अभिजित गणोरकर यांना दिसला. तो जखमी आणि बेवारस अवस्थेत असल्याने त्यांनी याची माहिती 'वसा' संस्थेला दिली. वसाचे गणेश अकर्ते, मुकेश वाघमारे, भूषण सायंके, निखिल फुटाणे आणि आकाश वानखडे यांनी ब्राम्हणवाडा शिवारातून जखमी उंटाला रेस्क्यू केले. उंट जखमी अवस्थेत भुकेने व्याकूळ झाल्याने तो जवळ कुणाला येऊ देत नव्हता. जखमी उंटाला अमरावतीत उपचाराकरिता आणण्यासाठी गोरक्षण संस्था अमरावती यांनी मदत केली.

------------------------

प्राण्यांचा उपयोग नसला की त्यांना बेवारस सोडतात

अमरावती : जिल्ह्यातील ही तिसरी घटना आहे. उंटाचा कळप घेऊन येणारे हे राजस्थानी लोक जोपर्यंत उंटाकडून उत्पन्न मिळते तोपर्यंत त्याचा सांभाळ करतात. एकदा तो उंट जखमी झाला किंवा आजारी पडल्यास त्याची सुश्रुषा उपचार न करता त्याला बेवारस सोडून पुढे निघून जातात. मालक आणि इतर संवगड्यापासून दूर झाल्यानंतर हे प्राणी स्ट्रेसमध्ये जातात. आधीच जखमी अवस्थेत असल्याने त्यांना त्यांच्या स्थळापर्यंत परत जाता येत नाही.

---------------------------------------------------------------------------------------

श्री गोरक्षण संस्था आणि वसा घेत आहेत काळजी

ब्राम्हणवाडा शिवारातून रेस्क्यू केलेल्या जखमी उंटाची देखभाल व त्याला आश्रय दस्तुरनगर येथील गोसदन येथे घेण्यात येत आहे.

---------------

अन्य एका गटने सावळापूर, आसेगाव पूर्णा शिवारात ग्रामस्थांनी जखमी उंटाला पाहिले. त्यांनी याची माहिती 'हेल्प फाऊंडेशन' सस्थेला दिली. त्यांनी या उंटाला रेस्क्यू करून अमरावतीच्या 'वऱ्हाड' या संस्थेला पुढील उपचाराकरिता देण्यात आले. काही दिवसांआधी अशा जखमी उंटाबद्दल 'हेल्प फाऊंडेशन'ला माहिती मिळाली होती. तो उंट अत्यवस्थेत होता. त्याला निट उभे राहता येत नव्हते. त्याच्या पायाचे हाड तुटले असावे, असा अंदाज व्यक्त होत होता. उंटाच्या उपचारावर येणारा खर्च अधिक असल्यामुळे हेल्प फाऊंडेशनने तो उंट नागपूर येथील 'माहेश्वरी फाऊंडेशनकडे ऑपरेशनकरिता पाठविला. मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.