शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
2
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
3
छगन भुजबळ अचानक कसे चर्चेत आले? आज मंत्रिपदाची शपथ घेणार, असे जाहीर केले...
4
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
5
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
6
भारताने तुर्कस्तानला धडा शिकवला! चॉकलेट, फळं, कपड्यांपासून ते पर्यटन; 'या' गोष्टी झाल्या बॉयकॉट
7
"आत्महत्या करण्यापूर्वी तिने सूरजला फोन करुन.."; जिया खानच्या मृत्यूनंतर १२ वर्षांनी झरीना वहाब यांचा मोठा खुलासा
8
भारत-पाक संघर्षात ड्रॅगनची खेळी, खरा विजय चीनचा झाल्याचा दावा; करणार तगडी कमाई, पण कशी?
9
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
10
बॉलिवूडकर गप्प, पण सई ताम्हणकरने थेट घेतलं पाकिस्तानचं नाव; म्हणाली, "ज्यांना सरळ भाषा..."
11
'तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही...', भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर!
12
'अण्वस्त्रांचा मारा करू, असा इशारा पाकने दिला नव्हता; लढाई पारंपरिक पद्धतीनेच'
13
बंदी असतानाही गुजरातमध्ये दारूचा महापूर; वर्षाला १५,००० कोटींची दारू येतेय तरी कुठून?
14
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."
15
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
16
"पहलगाम हल्ला दहशतवाद्यांची नाही, पर्यटकांची चूक"; पोलिसांसमोर ज्योती काय काय म्हणाली?
17
१२ वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत बोहल्यावर चढणार सई, लग्नाची तारीखही केली जाहीर
18
पाकच्या विजयासाठी चीनने लावता होता पूर्ण जोर, भारताची हेरगिरीही केली; अहवालातून माहिती समोर
19
“अमेरिका तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करू शकते, तर पाक सईद-लख्वी भारताला का देऊ शकत नाही”
20
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस

भातखाचऱ्यांमध्ये शिंगाडा पीक

By admin | Updated: May 21, 2015 00:39 IST

जिल्ह्यातील तलावांमध्ये अतिशय पौष्टिक मूल्य असलेले शिंगाडा पीक घेण्यात येते. मात्र या पारंपारिक पद्धतीला फाटा देत ....

भंडारा : जिल्ह्यातील तलावांमध्ये अतिशय पौष्टिक मूल्य असलेले शिंगाडा पीक घेण्यात येते. मात्र या पारंपारिक पद्धतीला फाटा देत पवनी तालुक्यातील १२ शेतकऱ्यांनी भात खाचऱ्यामध्ये शिंगाडा लागवड करून पडिक राहणाऱ्या भात खाचऱ्यातून उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण केला आहे.भंडारा हा तलावांचा जिल्हा आहे. येथे तलावांमध्ये मासे उत्पादनासोबतच येथील शेतकरी शिंगाड्याचे उत्पादनही घेतात. पवनी तालुक्यात ३४ हजार ६४२ हेक्टर एकूण पीक लागवडीखाील क्षेत्रापैकी ३८.२४ हेक्टर क्षेत्रावर शिंगाडा पीक घेण्यात येते. तालुक्यातील ढिवर-कहार जमातीचे सुमारे २५-३० शेतकरी शिंगाडा लागवड करतात. मात्र शास्त्रशुद्ध माहिती व आधुनिक तंत्रज्ञानाच्या अभावी त्यांचे उत्पादन कमी होत असे.कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) मार्फत २०१३-१४ मध्ये पवनी येथे शिंगाडा शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शेतकऱ्यांना शिंगाडा पिक लागवडीसंदर्भात शास्त्रशुद्ध तांत्रिक माहिती देण्यात आली. सोबतच भातखाचऱ्यामध्ये शेतकऱ्यांनी शिंगाडा पिक घ्यावे यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. कृषि विभागाने २०१४-१५ मध्ये पायाभूत सर्वेक्षण करून शिंगाडा लागवडीसाठी शेतकऱ्यांची निवड केली. यामध्ये कोटनापालार येथील पुंडलीक घ्यार, सुरज वाघमारे, सुदाम वाघधरे, भेंडाळा येथील रमेश मेंढे, विलास पारधी, रनाळा येथील हरिभाऊ घ्यार, रमेश दुधपचारे, हरीचंद्र दुधपचारे, संतोष दुधपचारे, शिरसाळा येथील श्रावण कांबळे, भोजापूर येथील रामाजी शेनमारे आणि पवनी येथील वंगणू शिवरकर या बारा शेतकऱ्यांच्या शेतावर शिंगाडा लागवड करण्यात आली. शेतकऱ्यांच्या शेतावर ६ शेतीशाळेच्या माध्यमातून त्यांना लागवड पद्धती, काढणी, तोडणी, तणाचे नियंत्रण, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, रोग व किडीची ओळख, बाजार व्यवस्थापन इत्यादी माहिती देण्यात आली. धानाच्या लागवडीसाठी खाचरे करण्यात येतात. शेतातील उताराच्या भागातील खाचऱ्यांमध्ये जास्त पाणी जमा होते. त्यात धानाचे पिक बरोबर येत नसल्यामुळे तेवढा भाग पडीत राहतो. याच पडीत व उतारामधील भातखाचऱ्यांचा उपयोग शिंगाडा पिकासाठी करण्यात आला. यातून शेतकऱ्यांना ३५ क्विंटल एकरी उत्पादन मिळाले असून ४० हजार रूपये नफा मिळाला आहे. या बारा शेतकऱ्यांनी शिंगाड्याचे उत्पादन घेवून इतर शेतकऱ्यांना आर्थिक उन्नतीचा मार्ग दाखवला आहे. पुढील दोन वर्षात शिंगाडा लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढवण्याचे प्रयत्न कृषी विभाग व आत्मा मार्फत करण्यात येत आहेत. (प्रतिनिधी)