शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

शेंदूरजनाघाटच्या रुग्णाचा १०८ रुग्णवाहिकेअभावी मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 22:51 IST

तालुक्यातील शेंदूरजनाघाट येथील ५५ वर्षीय इसमाला ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. परंतु प्रकृती गंभीर असल्याने नागपूर किंवा अमरावतीला पाठवायचे होते. मात्र, वेळीच १०८ रुग्णवाहिकेच्या कॉल सेंटरला फोन लावला असता सदर रुग्णवाहिका नादुरुस्त असल्याचे सांगण्यात आले. मोर्शीहून येण्यात दोन तास लागेल, असे सांगण्यात आले.

ठळक मुद्देसेवा निष्फळ : तणावपूर्ण वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्कवरुड : तालुक्यातील शेंदूरजनाघाट येथील ५५ वर्षीय इसमाला ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. परंतु प्रकृती गंभीर असल्याने नागपूर किंवा अमरावतीला पाठवायचे होते. मात्र, वेळीच १०८ रुग्णवाहिकेच्या कॉल सेंटरला फोन लावला असता सदर रुग्णवाहिका नादुरुस्त असल्याचे सांगण्यात आले. मोर्शीहून येण्यात दोन तास लागेल, असे सांगण्यात आले. सदर रुग्णवाहिका दवाखान्यातच उभी असताना नादुरुस्त कशी किंवा मोर्शीहून ३५ किमी अंतर कापण्यास दोन तास कसे लागतात, हा प्रश्न अनुत्तरित आहे. मृताच्या नातेवाईकाने जोपर्यंत १०८ रुग्णवाहीकेच्या संबंधितातवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही अशी भूमिका घेतल्याने काही काळ तणावाचे वातावरण होते.प्राप्त माहितीनुसार, शेंदूरजनाघाट (मलकापूर) येथील रुग्ण सुरेश सिताराम दवंडे ५० हे अचानक आजारी झाल्याने ही प्राथमिक आरोग्य केंद्रातून ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आले. येथील डॉक्टरांनी उपचार करून रुग्णाला नागपूर किंवा अमरावती येथे पुढील उपचारासाठी नेण्यास सांगितले. यावेळी संबंधित रूग्णाच्या नातेवाईकांनी १०८ रुग्णवाहिकेला संपर्कसाधला तेव्हा वरुड येथे कार्यरत रूग्णवाहिका नादुरुस्त असल्याचे मोर्शीहून येण्यास दोन तास लागतील, असे सांगितले. रुग्णाचे नातेवाईक सेंकदागणिक वाट पाहत होते. परंतु रूग्णवाहिका आली नाही. अखेर सुरेश सिताराम दवंडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कदाचित १०८ रूग्णवाहिका वेळेवर आली असती तर त्यांचे प्राण वाचले असते.