शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

शेंदूरजनाघाटच्या रुग्णाचा १०८ रुग्णवाहिकेअभावी मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 22:51 IST

तालुक्यातील शेंदूरजनाघाट येथील ५५ वर्षीय इसमाला ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. परंतु प्रकृती गंभीर असल्याने नागपूर किंवा अमरावतीला पाठवायचे होते. मात्र, वेळीच १०८ रुग्णवाहिकेच्या कॉल सेंटरला फोन लावला असता सदर रुग्णवाहिका नादुरुस्त असल्याचे सांगण्यात आले. मोर्शीहून येण्यात दोन तास लागेल, असे सांगण्यात आले.

ठळक मुद्देसेवा निष्फळ : तणावपूर्ण वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्कवरुड : तालुक्यातील शेंदूरजनाघाट येथील ५५ वर्षीय इसमाला ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. परंतु प्रकृती गंभीर असल्याने नागपूर किंवा अमरावतीला पाठवायचे होते. मात्र, वेळीच १०८ रुग्णवाहिकेच्या कॉल सेंटरला फोन लावला असता सदर रुग्णवाहिका नादुरुस्त असल्याचे सांगण्यात आले. मोर्शीहून येण्यात दोन तास लागेल, असे सांगण्यात आले. सदर रुग्णवाहिका दवाखान्यातच उभी असताना नादुरुस्त कशी किंवा मोर्शीहून ३५ किमी अंतर कापण्यास दोन तास कसे लागतात, हा प्रश्न अनुत्तरित आहे. मृताच्या नातेवाईकाने जोपर्यंत १०८ रुग्णवाहीकेच्या संबंधितातवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही अशी भूमिका घेतल्याने काही काळ तणावाचे वातावरण होते.प्राप्त माहितीनुसार, शेंदूरजनाघाट (मलकापूर) येथील रुग्ण सुरेश सिताराम दवंडे ५० हे अचानक आजारी झाल्याने ही प्राथमिक आरोग्य केंद्रातून ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आले. येथील डॉक्टरांनी उपचार करून रुग्णाला नागपूर किंवा अमरावती येथे पुढील उपचारासाठी नेण्यास सांगितले. यावेळी संबंधित रूग्णाच्या नातेवाईकांनी १०८ रुग्णवाहिकेला संपर्कसाधला तेव्हा वरुड येथे कार्यरत रूग्णवाहिका नादुरुस्त असल्याचे मोर्शीहून येण्यास दोन तास लागतील, असे सांगितले. रुग्णाचे नातेवाईक सेंकदागणिक वाट पाहत होते. परंतु रूग्णवाहिका आली नाही. अखेर सुरेश सिताराम दवंडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कदाचित १०८ रूग्णवाहिका वेळेवर आली असती तर त्यांचे प्राण वाचले असते.