शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
आजचे राशीभविष्य १९ मे २०२५ : वृश्चिकला आर्थिक लाभ, नशिबाची साथ...
3
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
4
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
5
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
6
 ‘किती’ जगलो, यापेक्षा ‘कसे’ जगलो हे महत्त्वाचे...
7
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
8
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
9
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
10
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
11
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
12
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
13
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
14
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
15
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
16
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
17
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
18
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
19
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
20
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?

- हे तर शेळकेंना अभय !

By admin | Updated: August 20, 2016 23:56 IST

पिंपळखुटा येथील शंकर महाराजांच्या आश्रम परिसरात नरबळीचा प्रयत्न करणाऱ्या सुरेंद्र मराठे, नीलेश ऊके आणि त्यांच्या एका अल्पवयीन साथीदाराने गुन्हा कबूल केल्यानंतरही....

ठाणेदाराचा हेतू काय ? : आरोपींना सोडलेच कसे ?गणेश देशमुखअमरावती : पिंपळखुटा येथील शंकर महाराजांच्या आश्रम परिसरात नरबळीचा प्रयत्न करणाऱ्या सुरेंद्र मराठे, नीलेश ऊके आणि त्यांच्या एका अल्पवयीन साथीदाराने गुन्हा कबूल केल्यानंतरही मंगरूळ दस्तगीरचे ठाणेदार शैलेश शेळके यांनी तिघांनाही सोडून दिले. आरोपींवर गुन्हा दाखल न करणे, फरार होण्याची, पुरावे नष्ट करण्याची पूर्ण संधी उपलब्ध करून देणे या दोषांसाठी शैलेश शेळके यांना निलंबित का करण्यात येऊ नये?प्रथमेश हा इमारतीवरून पडला असावा, त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला असावा- अशा कारणांमागे लपून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्या ग्रामीण पोलिसांनी 'लोकमत'च्या शोधमोहिमेनंतर गांभीर्याने तपास सुरू केला. पाचवीतील प्रथमेश स्वत:चा गळा कापणे कसे शक्य नाही, याबाबत 'लोकमत'ने लोकदरबारात भूमिका मांडल्यावर पोलिसांनी तो हल्लाच असल्याचे कबूल केले. सात आॅगस्टच्या घटनेनंतर चार-पाच दिवस टोलवाटोलवी केल्यानंतर १२ आॅगस्ट रोजी पोलिसांना सुरेंद्र मराठे, नीलेश ऊके आणि एका अल्पवयीन मुलाने हे कृत्य केल्याचा गुन्हा मान्य केला. आश्रम परिसरात संबंधितांनी हा गुन्हा मान्य केल्यानंतर आश्रमातील पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना पाचारण केले. ठाणेदार शैलेश शेळके यांच्यासमोर तिघांना पेश करण्यात आले. ठाणेदारासमोर तिघांनीही पुन्हा गुन्हा कबूल केला. गुन्हा कबूल केल्यावर ठाणेदार शेळके हे तिघांनाही दुपारी ३ च्या सुमारास आश्रमातून मंगरूळ दस्तगीर पोलीस ठाण्यात घेऊन गेले. त्यांना मारहाण केली. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास त्यांनी तिघांनाही पुन्हा आश्रम परिसरात आणून सोडले. नरबळीचा गंभीर गुन्हा कबूल करूनदेखील शेळके यांनी गुन्हा दाखल न केल्याने त्यांच्या हेतुबाबत शंका निर्माण होते. गुन्हा कबूल करणारे तिन्ही आरोपी खोटे बोलतात. आश्रम व्यवस्थापनाने खऱ्या आरोपींना लपविण्यासाठी यांना मोहरे बनविले, अशी शंका शेळके यांना येऊ शकते.