शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

कुटुंब गमावल्याचे दु:ख घेऊन ‘ती’ न्यायाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 22:28 IST

लग्नानंतर माहेरची माणसे दुरावली, तर सासरी असूयेपोटी भीषण परिस्थिती ओढवली. वडिलांचे घरही इतरांनी ताब्यात घेतले.

ठळक मुद्देअमरावतीत माहेर : सुखवस्तू कुटुंबातील, तरीही रेल्वे स्टेशनच्या आडोशाला आश्रय

इंदल चव्हाण ।आॅनलाईन लोकमतअमरावती : लग्नानंतर माहेरची माणसे दुरावली, तर सासरी असूयेपोटी भीषण परिस्थिती ओढवली. वडिलांचे घरही इतरांनी ताब्यात घेतले. त्यामुळे माहेरी आल्यावर रेल्वे स्थानकाच्या प्रांगणात आश्रय घेण्याची वेळ एका वृद्धेवर येऊन ठेपली आहे. आपले प्रकरण न्यायदरबारी मांडण्यासाठी सुहृद व्यक्तीने पुढे यावे, अशी तिची अपेक्षा आहे.सदर वृद्धा आपले नाव आशाबाई भवलाल बडगुजर असल्याचे सांगते. तिचे अंदाजे वय ५५ वर्षांच्या आरपास आहे. तिच्या म्हणण्यानुसार, शहरातील रेल्वे स्टेशन ते इर्विन चौक मार्गातील काही घरे ही तिच्या भावांच्या मालकीची होती. प्रभाकर सदावर्ते, दिवाकर सदावर्ते, नारायण पहिलवान अशी नावे तिच्या बोलण्यातून पुढे आली. ते कंत्राटदार होते आणि सुखवस्तू होते. या कुटुंबातील ती एकमेव वारस असल्याचे वृद्धेने सांगितले.दरम्यान, आशाबाईचे लग्न खंडवा येथे झाले. तेथेही बडगुजर कुटुंब सुखवस्तू होते. त्यांना दोन मुले व दोन मुलगी होत्या. मात्र, पतीचे हृदयविकाराने निधन झाले. दोन्ही मुलं नोकरी मिळविण्याच्या बेतात पैसे घेऊन घराबाहेर पडले नि त्यांचा अपघात होऊन ते दगावले. संपत्तीच्या हव्यासापोटी गावातील काही व्यक्तींनी लुटमारीचा बनाव करीत राखीला आलेली मुलगी व तिच्या मुलांचा खून घडवून आणला. हे प्रकरण न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. यानंतर काही वर्षे परागंदा राहिलेल्या आशाबार्इंनी अमरावती शहर गाठले.दरम्यानच्या काळात भावांची जुनी घरेही इतरांनी बळकावली होती. त्यामुळे आपली व्यथा मांडत त्यांनी या घरापुढील अमरावती रेल्वे स्थानक गाठले आणि तेथे १५ दिवसांपासून बस्तान मांडले. माहेर दुरावलेले, पती-मुलांचा वियोग आणि विचित्र दैवयोगाने झालेली विपरीत परिस्थिती याचा ताण पडल्याचे त्यांच्या स्थितीवरून जाणवते. तरीही आपली व्यथा कायद्याचे ज्ञान व सामाजिक भान असलेला कुणी तरी ऐकेल व न्याय मिळवून देईल, अशी आशा त्यांना आहे. ही भाबडी आशा ठरू नये, अशी अपेक्षा तिने व्यक्त केली.रस्त्यावरचे जिणे अन् अनंत वेदनाआशाबार्इंना परिस्थितीने रस्त्यावरचे जिणे आणले आहे. गेल्या १५ दिवसांपासून अमरावती रेल्वे स्थानकावर ती या अवस्थेत आढळून येत आहे. या काळात अमरावती येथील एकाही नातेवाईकाने त्यांच्याशी संपर्क करण्याची वा त्यांची विचारपूस करण्याची तसदी घेतली नाही.