शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
2
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
3
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
4
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
5
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
6
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
7
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
8
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
9
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
10
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
Daily Top 2Weekly Top 5

कुटुंब गमावल्याचे दु:ख घेऊन ‘ती’ न्यायाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 22:28 IST

लग्नानंतर माहेरची माणसे दुरावली, तर सासरी असूयेपोटी भीषण परिस्थिती ओढवली. वडिलांचे घरही इतरांनी ताब्यात घेतले.

ठळक मुद्देअमरावतीत माहेर : सुखवस्तू कुटुंबातील, तरीही रेल्वे स्टेशनच्या आडोशाला आश्रय

इंदल चव्हाण ।आॅनलाईन लोकमतअमरावती : लग्नानंतर माहेरची माणसे दुरावली, तर सासरी असूयेपोटी भीषण परिस्थिती ओढवली. वडिलांचे घरही इतरांनी ताब्यात घेतले. त्यामुळे माहेरी आल्यावर रेल्वे स्थानकाच्या प्रांगणात आश्रय घेण्याची वेळ एका वृद्धेवर येऊन ठेपली आहे. आपले प्रकरण न्यायदरबारी मांडण्यासाठी सुहृद व्यक्तीने पुढे यावे, अशी तिची अपेक्षा आहे.सदर वृद्धा आपले नाव आशाबाई भवलाल बडगुजर असल्याचे सांगते. तिचे अंदाजे वय ५५ वर्षांच्या आरपास आहे. तिच्या म्हणण्यानुसार, शहरातील रेल्वे स्टेशन ते इर्विन चौक मार्गातील काही घरे ही तिच्या भावांच्या मालकीची होती. प्रभाकर सदावर्ते, दिवाकर सदावर्ते, नारायण पहिलवान अशी नावे तिच्या बोलण्यातून पुढे आली. ते कंत्राटदार होते आणि सुखवस्तू होते. या कुटुंबातील ती एकमेव वारस असल्याचे वृद्धेने सांगितले.दरम्यान, आशाबाईचे लग्न खंडवा येथे झाले. तेथेही बडगुजर कुटुंब सुखवस्तू होते. त्यांना दोन मुले व दोन मुलगी होत्या. मात्र, पतीचे हृदयविकाराने निधन झाले. दोन्ही मुलं नोकरी मिळविण्याच्या बेतात पैसे घेऊन घराबाहेर पडले नि त्यांचा अपघात होऊन ते दगावले. संपत्तीच्या हव्यासापोटी गावातील काही व्यक्तींनी लुटमारीचा बनाव करीत राखीला आलेली मुलगी व तिच्या मुलांचा खून घडवून आणला. हे प्रकरण न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. यानंतर काही वर्षे परागंदा राहिलेल्या आशाबार्इंनी अमरावती शहर गाठले.दरम्यानच्या काळात भावांची जुनी घरेही इतरांनी बळकावली होती. त्यामुळे आपली व्यथा मांडत त्यांनी या घरापुढील अमरावती रेल्वे स्थानक गाठले आणि तेथे १५ दिवसांपासून बस्तान मांडले. माहेर दुरावलेले, पती-मुलांचा वियोग आणि विचित्र दैवयोगाने झालेली विपरीत परिस्थिती याचा ताण पडल्याचे त्यांच्या स्थितीवरून जाणवते. तरीही आपली व्यथा कायद्याचे ज्ञान व सामाजिक भान असलेला कुणी तरी ऐकेल व न्याय मिळवून देईल, अशी आशा त्यांना आहे. ही भाबडी आशा ठरू नये, अशी अपेक्षा तिने व्यक्त केली.रस्त्यावरचे जिणे अन् अनंत वेदनाआशाबार्इंना परिस्थितीने रस्त्यावरचे जिणे आणले आहे. गेल्या १५ दिवसांपासून अमरावती रेल्वे स्थानकावर ती या अवस्थेत आढळून येत आहे. या काळात अमरावती येथील एकाही नातेवाईकाने त्यांच्याशी संपर्क करण्याची वा त्यांची विचारपूस करण्याची तसदी घेतली नाही.