शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
3
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
4
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
5
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
6
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
7
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
8
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
9
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
10
एरोड्रोम परवान्याने अडविले नवी मुंबईतील विमानोड्डाण; सप्टेंबरचा मुहूर्तही हुकणार?
11
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
12
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
13
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
14
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
15
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
16
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
17
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
18
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
19
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
20
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...

चांदूरबाजार तालुक्यात शतकोटी वृक्ष लागवड योजनेचा बट्ट्याबोळ

By admin | Updated: June 19, 2015 00:41 IST

शतकोटी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत लावण्यात आलेली झाडे आता माना खाली टाकू लागले आहेत.

चांदूरबाजार : शतकोटी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत लावण्यात आलेली झाडे आता माना खाली टाकू लागले आहेत. या वृक्षांना आता जीवनदान देण्यासाठी पाण्याची गरज आहे. अन्यथा लावण्यात आलेली झाडे वाळून शासनाचे कोट्यवधी रुपयांचे खर्च व्यर्थ जाणार. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने शतकोटी वृक्ष लागवड योजना अमलात आणली. या योजनेसाठी राज्यात अभियान राबविण्यात आले. या योजने अंतर्गत प्रत्येक गावात शासकीय कार्यालय, शाळा महाविद्यालयांत अधिकाधिक झाडे लावण्यासाठी जागृती करण्यात आली. प्रत्येक ग्रामपंचायतीला निश्चित उद्दिष्ट्य देण्यात आले. तसेच ध्येयपूर्तीसाठी व झाडे लावण्यासाठी अनुदान दिले गेले. झाडे लावण्यासाठी खड्डे खोदण्यापासून झाडे लावणे, झाडांना काटेरी कुंपण लावणे, पाणी टाकणे व देखभालीसाठी अनुदान स्वरुपात खर्च देण्यात आला. योजना अतिशय चांगली असतानां सुरुवातीलाच या योजनेला तालुक्यात काही मोजक्या गावात प्रतिसाद मिळाला तर ७० ते ८० टक्के ही योजना बोगसरित्या कागदोपत्री राबविण्याचे दाखविले.शतकोटी वृक्ष लागवड योजने अंतर्गत तालुक्यात ३० ते ४० टक्के पर्यंत राबविण्यात आलेल्या योजना अंतर्गत लावण्यात आलेल्या अनेक झाडांनी आता माना खाली टाकल्या आहे. या झाडांना जीवनदान मिळण्यासाठी पाण्याची अत्यंत गरज आहे. पाण्याअभावी लावलेली झाडे वाळू लागली आहे. काही ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा झाडे ही चांगली मोठी आहेत. मोठी झालेली झाडे भर उन्हाळ्यात आतापर्यंत तग धरुन आहेत. परंतु आता मात्र या झाडांना पाण्याची सक्त आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत संबंधित विभागाने व शासनाने याकडे लक्ष देऊन कमी अधिक प्रमाणात पाणीपुरवठा करावा व झाडांना जीवनदान द्यावे, अन्यथा कोट्यवधी रुपये खर्च करुन शतकोटी योजनेअंतर्गत काही प्रमाणात जिवंत असणारी झाडे मात्र आता दमतोडत असल्याने शासनाच्या कोट्यवधींचा खर्च हा व्यर्थ जाणार, हे निश्चित. दुसरीकडे मात्र ज्या उद्देशाने शासनाने ही योजना अमलात आणली तो उद्देश फोल ठरणार आहे. तालुक्यात कागदोपत्रीच योजना राबवून फक्त शासनाला चुना लावण्याचे काम सर्वांनी केले आहे.(तालुका प्रतिनिधी)