शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

चांदूरबाजार तालुक्यात शतकोटी वृक्ष लागवड योजनेचा बट्ट्याबोळ

By admin | Updated: June 19, 2015 00:41 IST

शतकोटी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत लावण्यात आलेली झाडे आता माना खाली टाकू लागले आहेत.

चांदूरबाजार : शतकोटी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत लावण्यात आलेली झाडे आता माना खाली टाकू लागले आहेत. या वृक्षांना आता जीवनदान देण्यासाठी पाण्याची गरज आहे. अन्यथा लावण्यात आलेली झाडे वाळून शासनाचे कोट्यवधी रुपयांचे खर्च व्यर्थ जाणार. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने शतकोटी वृक्ष लागवड योजना अमलात आणली. या योजनेसाठी राज्यात अभियान राबविण्यात आले. या योजने अंतर्गत प्रत्येक गावात शासकीय कार्यालय, शाळा महाविद्यालयांत अधिकाधिक झाडे लावण्यासाठी जागृती करण्यात आली. प्रत्येक ग्रामपंचायतीला निश्चित उद्दिष्ट्य देण्यात आले. तसेच ध्येयपूर्तीसाठी व झाडे लावण्यासाठी अनुदान दिले गेले. झाडे लावण्यासाठी खड्डे खोदण्यापासून झाडे लावणे, झाडांना काटेरी कुंपण लावणे, पाणी टाकणे व देखभालीसाठी अनुदान स्वरुपात खर्च देण्यात आला. योजना अतिशय चांगली असतानां सुरुवातीलाच या योजनेला तालुक्यात काही मोजक्या गावात प्रतिसाद मिळाला तर ७० ते ८० टक्के ही योजना बोगसरित्या कागदोपत्री राबविण्याचे दाखविले.शतकोटी वृक्ष लागवड योजने अंतर्गत तालुक्यात ३० ते ४० टक्के पर्यंत राबविण्यात आलेल्या योजना अंतर्गत लावण्यात आलेल्या अनेक झाडांनी आता माना खाली टाकल्या आहे. या झाडांना जीवनदान मिळण्यासाठी पाण्याची अत्यंत गरज आहे. पाण्याअभावी लावलेली झाडे वाळू लागली आहे. काही ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा झाडे ही चांगली मोठी आहेत. मोठी झालेली झाडे भर उन्हाळ्यात आतापर्यंत तग धरुन आहेत. परंतु आता मात्र या झाडांना पाण्याची सक्त आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत संबंधित विभागाने व शासनाने याकडे लक्ष देऊन कमी अधिक प्रमाणात पाणीपुरवठा करावा व झाडांना जीवनदान द्यावे, अन्यथा कोट्यवधी रुपये खर्च करुन शतकोटी योजनेअंतर्गत काही प्रमाणात जिवंत असणारी झाडे मात्र आता दमतोडत असल्याने शासनाच्या कोट्यवधींचा खर्च हा व्यर्थ जाणार, हे निश्चित. दुसरीकडे मात्र ज्या उद्देशाने शासनाने ही योजना अमलात आणली तो उद्देश फोल ठरणार आहे. तालुक्यात कागदोपत्रीच योजना राबवून फक्त शासनाला चुना लावण्याचे काम सर्वांनी केले आहे.(तालुका प्रतिनिधी)