शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
ना अमेरिकन F-35, ना रशियन Su-57...; या मित्र देशाकडून लढाऊ विमाने खरेदी करून आणखी ताकद वाढवणार भारत! IAF ची मोठी मागणी
3
FD-RD सर्व विसराल; हा आहे LIC चा ‘तरुण’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल The End
4
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
5
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
6
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!
7
१८७७ गावांमध्ये पूर, घराघरांत शिरलं पाणी, ६ लाख बाधित; 'या' राज्यात पावसाचा कहर सुरूच!
8
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
9
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
10
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस
11
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
12
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
13
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
14
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
15
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
16
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
17
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
18
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
19
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
20
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं

शंकर महाराज आश्रमातील वसतिगृहाची मान्यता रद्द !

By admin | Updated: September 2, 2016 00:06 IST

पिंपळखुटा येथील शंकर महाराज आश्रम ट्रस्ट अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या समाजकल्याण मागासवर्गीय मुला-मुलींच्या वसतिगृहाची मान्यता रद्द करण्याची

प्रस्ताव रवाना : औपचारिकता केवळ बाकीअमरावती : पिंपळखुटा येथील शंकर महाराज आश्रम ट्रस्ट अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या समाजकल्याण मागासवर्गीय मुला-मुलींच्या वसतिगृहाची मान्यता रद्द करण्याची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मान्यता रद्द होण्याची औपचारिकता तेवढी बाकी आहे. ‘लोकमत’च्या शोधवृत्त पत्रकारितेमुळे हे शक्य झाले, अशी प्रतिक्रिया खुद्द समाजकल्याण विभागात गुरुवारी उमटत होती. पिंपळखुटा येथे शंकर महाराज यांच्या आश्रमाच्या हद्दीत पाच शाळा-विद्यालय आणि एक वसतिगृह आहे. शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय आश्रमातील समाजकल्याण वसतिगृहात केली जाते. प्रथमेश सगणे या इयत्ता पाचवीतील ११ वर्षीय गोंडस मुलाचा गळा सुरेंद्र मराठे आणि त्याच्या दोन साथिदारांनी आश्रमाच्या हद्दीत चिरला होता. नरबळी देण्यासाठी नागपंचमीच्या दिवशी हा राक्षसी गुन्हा सुरेंद्रने केला होता. ज्या प्रथमेशचा गळा चिरण्यात आला तो आश्रमातील वसतिगृहातच वास्तव्याला होता. अजय वनवे या चांदूररेल्वे तालुक्यातील गरीब चर्मकार समाजाच्या मुलाचा चेहरा सुरेंद्र मराठे याच आरोपीने रात्री दगडाने ठेचला होता. ही घटना वसतिगृहातच घडली होती. वसतिगृहात वास्तव्यास असणारी मुले सुरक्षित नाहीत. आश्रमात कार्यरत कर्मचाऱ्यांना नरबळी देण्यासाठी या वसतिगृहातील विद्यार्थी सहज उपलब्ध होत असल्याचे शासनाच्या लक्षात आले. वसतिगृह मुलांना शिक्षणासाठी पूरक सोय निर्माण करण्याच्या दृष्टीने बहाल केले असताना तेथे चिमुकल्या मुलांचे क्रुरतेने बळी घेतले जात असतील तर ते वसतिगृह चालवायचेच कशासाठी, असा प्रश्न सामाजिक न्याय विभागासमोर निर्माण झाला. सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी प्रथमेशची नागपूर येथे इस्पितळात भेट घेतल्यानंतर झालेल्या वेगवान हालचालींचा परिपाक म्हणजे वसतिगृहाची मान्यता रद्द होणे हा होय. सामाजिक न्याय विभागाने वसतिगृहाची मान्यता का रद्द करुन नये ? नरबळीच्या उद्देशाने हल्ले झाल्यानंतरही वसतिगृहाने, व्यवस्थापनाने संबंधित विभागाला त्याबाबतची माहिती का दिली नाही ? पोलिसांमध्ये या गंभीर घटनांची तक्रार का केली नाही, आदी प्रश्न चौकशीदरम्यान उपस्थित केले होते. आश्रम व्यवस्थापनाकडून देण्यात आलेली उत्तरे शासनाला मान्य झाली नाहीत. आश्रम व्यवस्थापनाने केलेली अंतर्गत चौकशी केवळ देखावा होती. व्यवस्थापनाने अक्षम्य दुर्लक्ष केले आणि कर्तव्यात कसूर केला, असा ठपका ठेवून आणि व्यवस्थापनाचा खुलासा अमान्य करुन या वसतिगृहाची मान्यता रद्दच करण्यात यावी, असा आग्रही अहवाल अमरावती येथील अधिकाऱ्यांनी पुण्याच्या आयुक्तांना ई-मेलद्वारे पाठविला. लवकरच या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होईल.