शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

शकुंतलेचे गरम पाणी, कोळशाची चोरी अन् फुकटात प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 21:58 IST

शकुंतला वाफेच्या इंजिनवर चालायची. अचलपूर रेल्वे स्थानकावर आली की परिसरातील सर्व नागरिक बकेट घेऊन तिथे धावायचे. थंडीच्या दिवसांत शकुंतलेच्या डब्यातून गरम पाणी नागरिक घेऊन जात होते आणि त्याने अंघोळ करायचे.

ठळक मुद्देआठवणींना उजाळा

परतवाडा : शकुंतला वाफेच्या इंजिनवर चालायची. अचलपूर रेल्वे स्थानकावर आली की परिसरातील सर्व नागरिक बकेट घेऊन तिथे धावायचे. थंडीच्या दिवसांत शकुंतलेच्या डब्यातून गरम पाणी नागरिक घेऊन जात होते आणि त्याने अंघोळ करायचे. काही तर कोळसा नेऊन स्वयंपाकाची सोय लावायचे. मात्र, आम्ही शिक्षणासाठी पैसे नसल्याने अनेकदा फुकट प्रवास केल्याचा अनुभव रविवारी शकुंतला रेल्वेत कविसंमेलनासाठी प्रमुख अतिथी म्हणून आलेल्या नेत्यांनी सांगून आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.शिक्षणासाठी अचलपूर परतवाडा शहरात यावे लागत होते. खेडेगावांतून ये-जा करण्यासाठी बसगाडी खासगी वाहने नव्हत्या. रस्ते नव्हते. त्यामुळे सर्वांच्या प्रवासाचे साधन म्हणजे शकुंतला रेल्वे. या शकुंतलेतून प्रवास करण्याची मौज काही औरच होती. सातेगावहून पायी निघाल्यावर बैलगाडीने तेथून अचलपूरचा प्रवास केल्याचा अनुभव जि.प. सदस्य प्रताप अभ्यंकर यांनी सांगितला. शिक्षणासोबतच तालुक्याच्या ठिकाणी ये-जा करायला परिसरातील नागरिकांना शकुंतलेचा प्रवास सोयीस्कर होता. बालवयात अचलपूर पं.स.चे सभापती देवेंद्र पेठकर यांनी 'लोकमत'शी बोलताना कथन केला. परतवाडा, अचलपुरात ये -जा करण्यासाठी पैसे नसल्याने अनेकांनी तिचा विनातिकीट प्रवास केल्याचे सांगितले.नागरिकांची झुंबडकापूस सागवान कृषिमालविदर्भातील पांढरे सोने व सागवान साठी शासक इंग्रजांनी शकुंतला रेल्वे मूर्तिजापूर ते अचलपूर सुरू केली होती. त्यासाठी सहा माल डब्बे आणि प्रवाशांसाठी सात डब्बे शकुंतलेला होते. दिवसातून अपडाऊनच्या चार फेऱ्या शकुंतला करायची. पर्याय नसल्याने शकुंतला प्रवाशांची झुंबड होत असल्याचा अनुभव सेवानिवृत्त स्टेशन मास्तर रियाज मोहम्मद शेर मोहम्मद यांनी सांगितला. अंजनगाव परिसरातून संत्री, शेतमालसुद्ध शकुंतला रेल्वेमध्ये शेतकरी नेत होते.दोन बकेट गरम पाण्याने परिवाराची आंघोळदिवसातून चार फेºया करणाºया शकुंतला रेल्वेत वाफेचे इंजिन असल्याने पाण्याचे चेंबर होते. हिवाळा व पावसाळ्याच्या दिवसांत मिल कॉलनी व परिसरातील नागरिक शकुंतला येताच बादल्या घेऊन यायचे दोन-दोन पातेल्यात गरम पाणी आंघोळीसाठी घेऊन जात असे. स्वयंपाकासाठी कोळसाही येत असल्याचा अनुभव विदर्भ मिलचे सेवानिवृत्त कामगार प्रकाश पुसदकर यांनी सांगितला.