शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

शकुंतलेचे ब्रॉडगेज रखडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 22:12 IST

शकुंतलेचे ब्रॉडगेज रखडणार असून, राज्य सरकारने ५० टक्के आर्थिक भार उचलला तरच नॅरोगेज शकुंतलेचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर शक्य आहे. यासाठी रेल्वे मंत्रालय चार वर्षांपासून राज्य सरकारच्या होकाराची वाट बघत आहे.

ठळक मुद्देराज्य सरकारने ५० टक्के भार उचलावा : रेल्वे मंत्रालय अद्याप प्रतीक्षेतच

अनिल कडू।लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : शकुंतलेचे ब्रॉडगेज रखडणार असून, राज्य सरकारने ५० टक्के आर्थिक भार उचलला तरच नॅरोगेज शकुंतलेचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर शक्य आहे. यासाठी रेल्वे मंत्रालय चार वर्षांपासून राज्य सरकारच्या होकाराची वाट बघत आहे.यवतमाळ-मुर्तिजापूर ११३ किलोमीटर, मूर्तिजापूर-अचलपूर ७७ किमी लांबीच्या लोहमार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतराचा सर्वप्रथम १९९२ ला भारतीय रेल्वेने प्रयत्न केला. राज्य सरकार अपेक्षित खर्चापैकी ५० टक्के आर्थिक भार उचलत असेल तरच रूपांतर करावे, या अटीवर त्यास नियोजन आयोगाने मान्यता दिली होती. पण, यासाठी पुरेसा निधी उपलब्ध न झाल्यामुळे हा प्रस्ताव बारगळला. नॅरोगेजचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्याच्या अनुषंगाने सन २००८ मध्ये नव्याने सर्वे करून ४५४ कोटी ७८ लाखांचा अपेक्षित खर्चाचा प्रस्ताव तयार केला गेला. अपेक्षित खर्च बघता परत प्रस्ताव दुर्लक्षित राहिला. याच प्रस्तावात काही बदल करून १ हजार ५५१ कोटींचा प्रस्ताव नव्याने केला गेला. याची ६ मार्च २०१४ ला राज्य सरकारला माहिती दिली गेली. नियोजन आयोगाच्या सूचनेनुसार या प्रस्तावाच्या अनुषंगाने ५० टक्के आर्थिक भार उचलण्यासोबतच विनामूल्य जमीन उपलब्ध करून देण्याची विनंती रेल्वे मंत्रालयाने राज्य सरकारकडे केली. याला राज्य सरकारने प्रतिसाद दिला नाही. दरम्यान तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी १ हजार ५५१ कोटींच्या या प्रस्तावास तत्त्वत: मान्यता व निर्देशही दिलेत. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या सकारात्मक प्रयत्नाकडेही राज्य सरकारने दुर्लक्ष केले. २०१४ पासून रेल्वे मंत्रालय राज्य सरकारच्या होकाराच्या प्रतीक्षेत आहे. ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करताना फॉरेस्ट क्लिअरन्सही आवश्यक आहे. या प्रस्तावाला अद्याप राज्य सरकारने संमती दिली नसल्याने हा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाला नियोजन आयोगापुढे ठेवता आला नाही.धावत्या रेल्वेत आज कविसंमेलनशकुंतलेच्या रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर व्हावे, चांगले दिवस यावेत, यासाठी खासदार भावना गवळी, खासदार आनंदराव अडसूळ, आमदार बच्चू कडू, मायी खासदार अनंत गुढे प्रयत्नशील आहेत. तथापि राज्य सरकारच्या इच्छाशक्तीवरच शकुंतलेचा उद्धार शक्य आहे. राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी साहित्यिक व कवी १६ डिसेंबरला अचलपूर ते दर्यापूरदरम्यान धावत्या शकुंतलेत कविसंमेलन करीत आहेत. शकुंतलेच्या वेदना उजागर करण्याचा हा अभिनव प्रयत्न आहे.